शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

कार्लेकरांच्या बंडाळीने देशमुख व कांंबळे गटात दरी

By admin | Updated: July 7, 2016 02:12 IST

राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस प्रणित सहकार गटाने रमेश खंडागळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. श्याम कार्लेकर यांनी बंड पुकारत वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती

अविश्वासाच्या हालचाली : बाजार समिती निवडणुकीचे पडसादवर्धा : राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस प्रणित सहकार गटाने रमेश खंडागळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. श्याम कार्लेकर यांनी बंड पुकारत वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतिपदासाठीचे आपले नामांकन कायम ठेवले. यात ते निवडून आले. परिणामी, सुरेश देशमुख व आ. रणजीत कांबळे गटात दरी निर्माण झाली आहे. देशमुख गट म्हणतो, रणजीत कांबळे गटाने आघाडी धर्म पाळला नाही, तर कांबळे गट म्हणतो, देशमुख गटच फुटला. यावरून आता दोन्ही गटात बेबनाव निर्माण झाला असल्याचे चित्र आहे.कुणी विश्वासघात केला, कुणी आघाडी धर्म पाळला नाही, हे सिद्ध करण्यासाठी सत्तेसाठी आघाडीत बंडखोरी करून सभापतिपदी विराजमान झालेले श्याम कार्लेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणावा, यासाठी राष्ट्रवादी सदस्यांकडून गट प्रमुख सुरेश देशमुख यांना साकडे घालणे सुरू आहे. या दृष्टीने देशमुख गटाने हालचालीही सुरू केलेल्या आहेत. यासाठी रणजीत कांबळे गटाची भूमिका काय राहिल, यावरच सभापतिपदाच्या निवडणुकीत काय घडले, यावरुन पडदा उठणार असल्याचे बोलले जात आहे.सुरेश देशमुख आणि आ. रणजित कांबळे यांच्या पुढाकारात सहकार गटाची निर्मिती झाली. सभापती पदाच्या निवडणुकीत कांबळे गट आपण प्रामाणिक राहुन सहकार गटाच्या रमेश खंडागळे यांना मतदान केल्याचे सांगत आहे. परंतु बंडखोर कार्लेकर निवडून आले. देशमुख गटाने कार्लेकर यांच्यावर विश्वासघात केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर अविश्वास आणण्याच्या हालचालीही सुरू केलेल्या आहे. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आ. रणजित कांबळे गटाचे पाच संचालक आहे. हे पाचही संचालक आघाडीत ठरल्याप्रमाणेच रमेश खंडागळे यांना मतदान केल्याचे सांगतानाच राष्ट्रवादीच्याच सदस्यांवर दगाबाजीचे खापर फोडत आहे. मात्र राष्ट्रवादीचे संचालक हा आरोप फेटाळत आहे. सुरेश देशमुख यांनी संचालकांवर टाकलेल्या अतिविश्वासामुळे हा धोका झाला. आ. कांबळे गटाच्या सदस्यांनीच खंडागळे यांना मतदान केले नाही, असा गंभीर आरोपही लावला जात आहे. या एकंदर घडामोडींमुळे देशमुख आणि कांबळे गट अप्रत्यक्षरित्या आमने-सामने आले आहे. या सर्व बाबी स्पष्ट व्हाव्यात. जनतेसमोर सत्य यावे, यासाठी श्याम कार्लेकर यांच्यावर अविश्वास ठराव आणावा, खरे-खोटे काय ते निकालात निघेल, असे सहकार गटातील राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सुरेश देशमुख यांना साकडे घातले आहे. देशमुख यांनीही ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ म्हणून या दिशेने हालचाली सुरू केल्याची माहिती आहे.(जिल्हा प्रतिनिधी)कार्लेकरांचे सभापतिपद अल्पावधित अविश्वासाच्या गर्तेतअविश्वासासाठी १२ सदस्यांची गरज आहे. देशमुख गट सहा व आ. कांबळे गटाचे पाच असे ११ सदस्य होतात. अडते व व्यापारी गटातून दोनपैकी १ सदस्य मिळाला, तर अविश्वास पारीत होऊ शकतो, या दृष्टीने देशमुख गटाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. आ. कांबळे गट देशमुख गटाचा आरोप खोटा ठरविण्यासाठी अविश्वास प्रस्तावासाठी पुढाकार घेते वा यातून आपला काढता पाय घेते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.