शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

कार्लेकरांच्या बंडाळीने देशमुख व कांंबळे गटात दरी

By admin | Updated: July 7, 2016 02:12 IST

राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस प्रणित सहकार गटाने रमेश खंडागळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. श्याम कार्लेकर यांनी बंड पुकारत वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती

अविश्वासाच्या हालचाली : बाजार समिती निवडणुकीचे पडसादवर्धा : राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस प्रणित सहकार गटाने रमेश खंडागळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. श्याम कार्लेकर यांनी बंड पुकारत वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतिपदासाठीचे आपले नामांकन कायम ठेवले. यात ते निवडून आले. परिणामी, सुरेश देशमुख व आ. रणजीत कांबळे गटात दरी निर्माण झाली आहे. देशमुख गट म्हणतो, रणजीत कांबळे गटाने आघाडी धर्म पाळला नाही, तर कांबळे गट म्हणतो, देशमुख गटच फुटला. यावरून आता दोन्ही गटात बेबनाव निर्माण झाला असल्याचे चित्र आहे.कुणी विश्वासघात केला, कुणी आघाडी धर्म पाळला नाही, हे सिद्ध करण्यासाठी सत्तेसाठी आघाडीत बंडखोरी करून सभापतिपदी विराजमान झालेले श्याम कार्लेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणावा, यासाठी राष्ट्रवादी सदस्यांकडून गट प्रमुख सुरेश देशमुख यांना साकडे घालणे सुरू आहे. या दृष्टीने देशमुख गटाने हालचालीही सुरू केलेल्या आहेत. यासाठी रणजीत कांबळे गटाची भूमिका काय राहिल, यावरच सभापतिपदाच्या निवडणुकीत काय घडले, यावरुन पडदा उठणार असल्याचे बोलले जात आहे.सुरेश देशमुख आणि आ. रणजित कांबळे यांच्या पुढाकारात सहकार गटाची निर्मिती झाली. सभापती पदाच्या निवडणुकीत कांबळे गट आपण प्रामाणिक राहुन सहकार गटाच्या रमेश खंडागळे यांना मतदान केल्याचे सांगत आहे. परंतु बंडखोर कार्लेकर निवडून आले. देशमुख गटाने कार्लेकर यांच्यावर विश्वासघात केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर अविश्वास आणण्याच्या हालचालीही सुरू केलेल्या आहे. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आ. रणजित कांबळे गटाचे पाच संचालक आहे. हे पाचही संचालक आघाडीत ठरल्याप्रमाणेच रमेश खंडागळे यांना मतदान केल्याचे सांगतानाच राष्ट्रवादीच्याच सदस्यांवर दगाबाजीचे खापर फोडत आहे. मात्र राष्ट्रवादीचे संचालक हा आरोप फेटाळत आहे. सुरेश देशमुख यांनी संचालकांवर टाकलेल्या अतिविश्वासामुळे हा धोका झाला. आ. कांबळे गटाच्या सदस्यांनीच खंडागळे यांना मतदान केले नाही, असा गंभीर आरोपही लावला जात आहे. या एकंदर घडामोडींमुळे देशमुख आणि कांबळे गट अप्रत्यक्षरित्या आमने-सामने आले आहे. या सर्व बाबी स्पष्ट व्हाव्यात. जनतेसमोर सत्य यावे, यासाठी श्याम कार्लेकर यांच्यावर अविश्वास ठराव आणावा, खरे-खोटे काय ते निकालात निघेल, असे सहकार गटातील राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सुरेश देशमुख यांना साकडे घातले आहे. देशमुख यांनीही ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ म्हणून या दिशेने हालचाली सुरू केल्याची माहिती आहे.(जिल्हा प्रतिनिधी)कार्लेकरांचे सभापतिपद अल्पावधित अविश्वासाच्या गर्तेतअविश्वासासाठी १२ सदस्यांची गरज आहे. देशमुख गट सहा व आ. कांबळे गटाचे पाच असे ११ सदस्य होतात. अडते व व्यापारी गटातून दोनपैकी १ सदस्य मिळाला, तर अविश्वास पारीत होऊ शकतो, या दृष्टीने देशमुख गटाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. आ. कांबळे गट देशमुख गटाचा आरोप खोटा ठरविण्यासाठी अविश्वास प्रस्तावासाठी पुढाकार घेते वा यातून आपला काढता पाय घेते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.