शहरं
Join us  
Trending Stories
1
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
2
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
3
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
4
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
5
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
6
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
7
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
8
Bigg Boss 19: क्रिकेटपटू दीपक चहरच्या बहिणीवर संतापला सलमान खान, सारेच झाले अवाक्, कारण काय? 
9
Diwali Sale: ७०००mAh बॅटरी आणि ३ कॅमेरे असलेला फोन ६७९ रुपयांच्या ईएमआयमध्ये उपलब्ध
10
Viral Video: "दात आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
11
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 
12
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
13
सोमवती अमावस्या आणि लक्ष्मी पूजनाचा दुर्मिळ योग; 'या' ७ राशींच्या आयुष्याला मिळणार कलाटणी
14
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
15
Mohammed Shami: शमीनं निवड समितीची केली बोलती बंद, रणजी स्पर्धेत ७ विकेट्स घेऊन दिला फिटनेसचा पुरावा!
16
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
17
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
18
IAS Ankita Chaudhary : "कधीही हार मानू नका, कारण..."; आईचं स्वप्न हेच आयुष्याचं ध्येय, IAS अंकिताचा मोलाचा सल्ला
19
Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते?
20
शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू

महामार्गावरील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा

By admin | Updated: May 9, 2016 02:08 IST

रस्त्यांचे रुंदीकरण झाले तेवढीच वाहनांची संख्याही वाढली. सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या लक्षात घेता तरुणवर्ग व्यवसायाकडे वळला. महागडी जागा,

अपघात बळावले : वाहनांची संख्या वाढल्याने वारंवार वाहतूक होते ठप्पघोराड : रस्त्यांचे रुंदीकरण झाले तेवढीच वाहनांची संख्याही वाढली. सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या लक्षात घेता तरुणवर्ग व्यवसायाकडे वळला. महागडी जागा, वाढता किराया पाहता रस्त्यालगत व्यवसाय लावून कमाईचा मार्ग त्यांना सोयीचा वाढला. पण ज्या मार्गावर व्यवसाय थाटण्यात आले त्या मार्गांवर आज अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमणामुळे आता रस्त्यांचा श्वास गुदमरतो आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. नागपूर जिल्ह्याची सीमा संपताच वर्धा जिल्ह्यात प्रवेश होतो. सेलडोह पासून वर्धेपर्यंत येणारा हा रस्ता प्रत्येक गावानजीक रस्त्यालगत झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. अपघातास हे अतिक्रमणआता कारणीभूत ठरत आहे. सेलडोहपासून अवघ्या दोन कि.मी. अंतरावर असलेल्या खडकी येथे रस्त्यालगत असणारे हॉटेल पाहता बहुतांश वाहनधारक आपली वाहने रस्त्यावरच उभी ठेवतात. त्यामुळे येथे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. येथे कधीकधीच वाहतूक पोलीस उपस्थिती राहतात. त्यामुळे येथे नेहमीच अपघाताची शक्यता असते. खडकीवरून पुढे जाताना ऐतिहासिक नगरी म्हणून ओळखल्या जात असलेल्या केळझर येथे नेहमीच प्रवाश्यांनी वर्दळ असते. येथील प्रवासी निवाऱ्याजवळ व्यावसायिकांनी रस्त्याच्या कडेपर्यंत आपली दुकाने, हातगाडी व ग्राहकांना बसण्यासाठी खुर्च्या लावल्या आहेत. येथे रस्ता मोठा असल्याने वाहने भरधावपणे ओव्हरटेक करतात. त्यामुळे येथे सर्वाधिक ापघात घडत आहेत. याच गावानजीक बोर प्रकल्पाचा कालवा आहे. या कालव्याजवळ रस्त्यावरच रस्त्याच्या दोनही बाजूने ट्रक चालक आपली वाहने उभी करून ठेवतात. त्यामुळे वाहतुकीचा खो०ळंबा होतो. महाबळा नजीक रस्ता खराब असूनही येथे रस्त्यालगत अतिक्रमण वाढले आहे. सेलू येथील विकास व यशवंत चौकात तर व्यावसायीकांनी अतिक्रमण केल्याने येथे मोठे मार्केटच तयार झाल्याचा भास होतो. त्यातच आॅॅटोचालकाच्या मनमानीने कळस गाठल्याचे प्रवासी सांगतात. त्यामुळे रस्त्यावर उभे राहूनच प्रवाश्यांना बसची प्रतीक्षा करावी लागते. कान्हापूर ते पवनार या दीड कि.मी. रस्त्याच्या रस्त्याला तर फळबाजाराचे स्वरूप आले आहे. ग्राहक आपली वाहने रस्त्यावरच उभी करून फळांची खरेदी करतात. त्यामुळे ही बाजारपेठ रस्त्यावर अपघातास कारणीभूत ठरत आहे. नागपूर जिल्ह्याच्या सिमेपासून ३२ कि.मी. अंतरावर वर्धा शहर आहे. आधी हे अंतर कापावयास फार फार तर ंअर्धा तास लागत असे. पण आता अतिक्रमण आणि वाहनांची वाढलेली संख्या यामुळे हे अंतर पार करण्यात एक तासाचा वर अवधी लागतो. पण वाढत्या अतिक्रमणामुळे रस्त्याच्या कडेला लावलेली दुकाने किती सुरक्षित असा प्रश्न पडत आहे. अतिक्रमणामुळे वाहन धारकांना रस्ता पार करताना होणाऱ्या त्रासाला जबाबदार कोण असा प्रश्नही उपस्थित होत आहे. या मार्गावर झालेले अनेक अपघात पाहता प्रशासनाने सजग होणे आवश्यक आहे. तसेच सदर अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्याची मागणीही प्रवासी वर्गातून होत आहे.(वार्ताहर) अतिक्रमण काढण्याबाबत नोटीस बजावल्या घोराड- वर्धा नागपूर मार्गावर सेलू येथे असणाऱ्या विकास चौकात रस्त्यालगत असणारे अतिक्रमण अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे वृत्त २७ एप्रिलला लोकमतने ‘विकास चौकाला अतिक्रमणाचा विळखा’ या शीर्षकाखाली प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत विकास चौक ते घोराडपर्यंत रस्त्यालगत अतिक्रमण केलेल्यांना अतिक्रमण काढण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीस बजावल्या आहे. बातमी प्रकाशित होताच सेलू तालुका युवा सेनेने अतिक्रमण काढण्यासंदर्भात निवेदन तहसीलदारांना दिले होते. त्यानंतर विकास चौक ते घोराड या एक ते दिड कि.मी अंतरात सेलू बोरधरण रस्त्यालगत ज्यांनी आपली दुकाने लावून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत अतिक्रमण केले आहे, अशा सर्व अतिक्रमणधारकांना सा. बां. विभागाचे उपविभागीय कार्यकारी अभियंता यांनी ३ मे रोजी नोटीस बजावली. १० दिवसाच्या आत अतिक्रमण धारकांनी स्वत: अतिक्रमण काढावे, अन्यथा अतिक्रमण काढण्यास येणारा खर्च अतिक्रमणधारकाकडूनच वसुल करण्यात येईल असे या नोटीसद्वारे कळविले. त्यामुळे सदर अतिक्रमण लवकरच हटणार, अशी चिन्हे दिसत आहेत. सा. बां. विभागाने दिलेली मुदत संपताच केव्हा कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा रस्ता लवकर मोकळा व्हावा अशी आशा व्यक्त होत आहे.