शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा

By admin | Updated: May 9, 2016 02:08 IST

रस्त्यांचे रुंदीकरण झाले तेवढीच वाहनांची संख्याही वाढली. सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या लक्षात घेता तरुणवर्ग व्यवसायाकडे वळला. महागडी जागा,

अपघात बळावले : वाहनांची संख्या वाढल्याने वारंवार वाहतूक होते ठप्पघोराड : रस्त्यांचे रुंदीकरण झाले तेवढीच वाहनांची संख्याही वाढली. सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या लक्षात घेता तरुणवर्ग व्यवसायाकडे वळला. महागडी जागा, वाढता किराया पाहता रस्त्यालगत व्यवसाय लावून कमाईचा मार्ग त्यांना सोयीचा वाढला. पण ज्या मार्गावर व्यवसाय थाटण्यात आले त्या मार्गांवर आज अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमणामुळे आता रस्त्यांचा श्वास गुदमरतो आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. नागपूर जिल्ह्याची सीमा संपताच वर्धा जिल्ह्यात प्रवेश होतो. सेलडोह पासून वर्धेपर्यंत येणारा हा रस्ता प्रत्येक गावानजीक रस्त्यालगत झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. अपघातास हे अतिक्रमणआता कारणीभूत ठरत आहे. सेलडोहपासून अवघ्या दोन कि.मी. अंतरावर असलेल्या खडकी येथे रस्त्यालगत असणारे हॉटेल पाहता बहुतांश वाहनधारक आपली वाहने रस्त्यावरच उभी ठेवतात. त्यामुळे येथे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. येथे कधीकधीच वाहतूक पोलीस उपस्थिती राहतात. त्यामुळे येथे नेहमीच अपघाताची शक्यता असते. खडकीवरून पुढे जाताना ऐतिहासिक नगरी म्हणून ओळखल्या जात असलेल्या केळझर येथे नेहमीच प्रवाश्यांनी वर्दळ असते. येथील प्रवासी निवाऱ्याजवळ व्यावसायिकांनी रस्त्याच्या कडेपर्यंत आपली दुकाने, हातगाडी व ग्राहकांना बसण्यासाठी खुर्च्या लावल्या आहेत. येथे रस्ता मोठा असल्याने वाहने भरधावपणे ओव्हरटेक करतात. त्यामुळे येथे सर्वाधिक ापघात घडत आहेत. याच गावानजीक बोर प्रकल्पाचा कालवा आहे. या कालव्याजवळ रस्त्यावरच रस्त्याच्या दोनही बाजूने ट्रक चालक आपली वाहने उभी करून ठेवतात. त्यामुळे वाहतुकीचा खो०ळंबा होतो. महाबळा नजीक रस्ता खराब असूनही येथे रस्त्यालगत अतिक्रमण वाढले आहे. सेलू येथील विकास व यशवंत चौकात तर व्यावसायीकांनी अतिक्रमण केल्याने येथे मोठे मार्केटच तयार झाल्याचा भास होतो. त्यातच आॅॅटोचालकाच्या मनमानीने कळस गाठल्याचे प्रवासी सांगतात. त्यामुळे रस्त्यावर उभे राहूनच प्रवाश्यांना बसची प्रतीक्षा करावी लागते. कान्हापूर ते पवनार या दीड कि.मी. रस्त्याच्या रस्त्याला तर फळबाजाराचे स्वरूप आले आहे. ग्राहक आपली वाहने रस्त्यावरच उभी करून फळांची खरेदी करतात. त्यामुळे ही बाजारपेठ रस्त्यावर अपघातास कारणीभूत ठरत आहे. नागपूर जिल्ह्याच्या सिमेपासून ३२ कि.मी. अंतरावर वर्धा शहर आहे. आधी हे अंतर कापावयास फार फार तर ंअर्धा तास लागत असे. पण आता अतिक्रमण आणि वाहनांची वाढलेली संख्या यामुळे हे अंतर पार करण्यात एक तासाचा वर अवधी लागतो. पण वाढत्या अतिक्रमणामुळे रस्त्याच्या कडेला लावलेली दुकाने किती सुरक्षित असा प्रश्न पडत आहे. अतिक्रमणामुळे वाहन धारकांना रस्ता पार करताना होणाऱ्या त्रासाला जबाबदार कोण असा प्रश्नही उपस्थित होत आहे. या मार्गावर झालेले अनेक अपघात पाहता प्रशासनाने सजग होणे आवश्यक आहे. तसेच सदर अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्याची मागणीही प्रवासी वर्गातून होत आहे.(वार्ताहर) अतिक्रमण काढण्याबाबत नोटीस बजावल्या घोराड- वर्धा नागपूर मार्गावर सेलू येथे असणाऱ्या विकास चौकात रस्त्यालगत असणारे अतिक्रमण अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे वृत्त २७ एप्रिलला लोकमतने ‘विकास चौकाला अतिक्रमणाचा विळखा’ या शीर्षकाखाली प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत विकास चौक ते घोराडपर्यंत रस्त्यालगत अतिक्रमण केलेल्यांना अतिक्रमण काढण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीस बजावल्या आहे. बातमी प्रकाशित होताच सेलू तालुका युवा सेनेने अतिक्रमण काढण्यासंदर्भात निवेदन तहसीलदारांना दिले होते. त्यानंतर विकास चौक ते घोराड या एक ते दिड कि.मी अंतरात सेलू बोरधरण रस्त्यालगत ज्यांनी आपली दुकाने लावून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत अतिक्रमण केले आहे, अशा सर्व अतिक्रमणधारकांना सा. बां. विभागाचे उपविभागीय कार्यकारी अभियंता यांनी ३ मे रोजी नोटीस बजावली. १० दिवसाच्या आत अतिक्रमण धारकांनी स्वत: अतिक्रमण काढावे, अन्यथा अतिक्रमण काढण्यास येणारा खर्च अतिक्रमणधारकाकडूनच वसुल करण्यात येईल असे या नोटीसद्वारे कळविले. त्यामुळे सदर अतिक्रमण लवकरच हटणार, अशी चिन्हे दिसत आहेत. सा. बां. विभागाने दिलेली मुदत संपताच केव्हा कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा रस्ता लवकर मोकळा व्हावा अशी आशा व्यक्त होत आहे.