शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळे जलयुक्तमध्ये पाचच गावे

By admin | Updated: April 27, 2017 00:39 IST

कृषी विभागाने दुर्लक्ष केल्याने जलयुक्त शिवार अभियानात केवळ ५ गावांचा समावेश झाला.

एसडीओंचीही नाराजी : नियोजनाचा अभाव आष्टी (श.) : कृषी विभागाने दुर्लक्ष केल्याने जलयुक्त शिवार अभियानात केवळ ५ गावांचा समावेश झाला. यामुळे ३६ ग्रामपंचायतींना वंचित राहावे लागले. याचा निषेध नोंदवित सरपंचांनी कृषी विभागाला विकासाशी देणे-घेणे नसल्याचा आरोप केला आहे. नियोजनाच्या अभावामुळे निधी मिळाला नाही. मागील आठवड्यात झालेल्या आढावा सभेत एसडीओ शर्मा यांनीही नाराजी व्यक्त केली. जलयुक्त शिवार अभियानमधून शेताच्या काठावर नाला खोलीकरण बंधारा बांधकाम, गाळ काढणे, बांध-बंधिस्ती, तलाव यासह अनेक कामे करण्यासाठी निधीची तरतूद आहे; पण त्यासाठी गावोगावी ग्रामसभा घेऊन कामे समाविष्ट करावी लागतात. कृषी सहायक, तालुका कृषी अधिकाऱ्यांनी तालुक्यात ग्रामसभा घेण्याचे धाडस दाखविले नाही. परिणामी, शासनाच्या योजनांपासून मुकावे लागले आहे. आष्टी तालुक्याला प्रधानमंत्री व मुख्यमंत्री पॅकेजमधून बऱ्याच योजना मिळाल्या होत्या. शेतकऱ्यांना सुविधा देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे हा त्या मागील उद्देश होता. त्यावेळी अधिकारी सक्रीय होते. आताही अधिकाऱ्यांवरच जलयुक्त शिवार योजना अलवंबून आहे; पण दुर्लक्षित धोरणाचा फटका बसत आहे. तालुक्याला नियमित तालुका, मंडळ कृषी अधिकारी नसून कृषी सहायकाची पदे रिक्त आहे. प्रभारी तालुका कृषी अधिकारी प्रमोद पेठकर यांनी कामाचा अधिक भार असल्याने योजना राबविण्यात मागे असल्याची प्रांजळ कबुली दिली आहे. जिल्हास्तरावरून अधिकारी सभा घेण्यासाठी वारंवार बोलवित असल्याने कामांकडे लक्ष नसल्याचेही सांगितले. विकास कामांचा आढावा घेतला तेव्हा तालुका कृषी अधिकारी गैरहजर होते. एसडीओ शर्मा यांनी केवळ पाच गावांना समाविष्ट केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांनी सक्रीय राहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावर्षी तरी अर्ध्याधिक गावांना समाविष्ट करून न्याय द्यावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.(तालुका प्रतिनिधी)