शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळे जलयुक्तमध्ये पाचच गावे

By admin | Updated: April 27, 2017 00:39 IST

कृषी विभागाने दुर्लक्ष केल्याने जलयुक्त शिवार अभियानात केवळ ५ गावांचा समावेश झाला.

एसडीओंचीही नाराजी : नियोजनाचा अभाव आष्टी (श.) : कृषी विभागाने दुर्लक्ष केल्याने जलयुक्त शिवार अभियानात केवळ ५ गावांचा समावेश झाला. यामुळे ३६ ग्रामपंचायतींना वंचित राहावे लागले. याचा निषेध नोंदवित सरपंचांनी कृषी विभागाला विकासाशी देणे-घेणे नसल्याचा आरोप केला आहे. नियोजनाच्या अभावामुळे निधी मिळाला नाही. मागील आठवड्यात झालेल्या आढावा सभेत एसडीओ शर्मा यांनीही नाराजी व्यक्त केली. जलयुक्त शिवार अभियानमधून शेताच्या काठावर नाला खोलीकरण बंधारा बांधकाम, गाळ काढणे, बांध-बंधिस्ती, तलाव यासह अनेक कामे करण्यासाठी निधीची तरतूद आहे; पण त्यासाठी गावोगावी ग्रामसभा घेऊन कामे समाविष्ट करावी लागतात. कृषी सहायक, तालुका कृषी अधिकाऱ्यांनी तालुक्यात ग्रामसभा घेण्याचे धाडस दाखविले नाही. परिणामी, शासनाच्या योजनांपासून मुकावे लागले आहे. आष्टी तालुक्याला प्रधानमंत्री व मुख्यमंत्री पॅकेजमधून बऱ्याच योजना मिळाल्या होत्या. शेतकऱ्यांना सुविधा देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे हा त्या मागील उद्देश होता. त्यावेळी अधिकारी सक्रीय होते. आताही अधिकाऱ्यांवरच जलयुक्त शिवार योजना अलवंबून आहे; पण दुर्लक्षित धोरणाचा फटका बसत आहे. तालुक्याला नियमित तालुका, मंडळ कृषी अधिकारी नसून कृषी सहायकाची पदे रिक्त आहे. प्रभारी तालुका कृषी अधिकारी प्रमोद पेठकर यांनी कामाचा अधिक भार असल्याने योजना राबविण्यात मागे असल्याची प्रांजळ कबुली दिली आहे. जिल्हास्तरावरून अधिकारी सभा घेण्यासाठी वारंवार बोलवित असल्याने कामांकडे लक्ष नसल्याचेही सांगितले. विकास कामांचा आढावा घेतला तेव्हा तालुका कृषी अधिकारी गैरहजर होते. एसडीओ शर्मा यांनी केवळ पाच गावांना समाविष्ट केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांनी सक्रीय राहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावर्षी तरी अर्ध्याधिक गावांना समाविष्ट करून न्याय द्यावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.(तालुका प्रतिनिधी)