शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

जड वाहनांच्या वर्दळीमुळे केळझर-दहेगाव रस्ता उखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 23:51 IST

बुट्टीबोरी-तुळजापूर महामार्गाचे काम हाती घेतलेल्या दिलीप बिल्डकॉन या रस्ते बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या जड वाहनांच्या वर्दळीमुळे केळझर ते दहेगाव (गोसावी) या डांबरी रस्त्याची अवघ्या आठ महिन्यांत गिट्टी उखडून रस्त्यावर पसरली.

ठळक मुद्देदिलीप बिल्डकॉनच्या वाहनामुळे रस्ता खड्डयात : दुरस्ती न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : बुट्टीबोरी-तुळजापूर महामार्गाचे काम हाती घेतलेल्या दिलीप बिल्डकॉन या रस्ते बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या जड वाहनांच्या वर्दळीमुळे केळझर ते दहेगाव (गोसावी) या डांबरी रस्त्याची अवघ्या आठ महिन्यांत गिट्टी उखडून रस्त्यावर पसरली. त्यामुळे या मार्गावरून अवागमन करणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.दोन वर्षापूर्वी सदर मार्गाचे डांबरीकरण होऊन रस्ता गुळगुळीत झाला होता. परंतु बुट्टीबोरी ते तुळजापूर रस्त्याचे काम करणाऱ्या दिलीप बिल्डकॉन कंपनीचे टिप्पर, ट्रक या मार्गावरून जात निर्माणाधिन सिमेंट मार्गाकरिता लागणारी गिट्टी तयार करण्याकरिता मोठे दगडे व मुरूमाची दहेगाव (गोसावी) येथून ने-आण करण्यात येते. दिवसाला या मार्गावरून जड वाहनांच्या याकरिता शेकडो फेºया होत असल्याने मार्गाची अक्षरश चाळणी होवून रस्ता उखडून त्यातील गिट्टी रस्त्यावर विखुरल्या गेली आहे. त्यामुळे दहेगाव व त्या पलीकडील चार ते पाच गावातील गावकºयांना केळझरकडे येतांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो. तसेच वाहनचालकांना या मार्गावरून वाहन चालवतांना तारेवरची कसरत करावी लागते. परिणामी होणारे किरकोळ अपघात नित्याचेच झाले आहे. केळझर ते दहेगाव (गोसावी) हे अंतर सहा कि.मी. असून बाजारपेठ आणि बॅँकेचे व्यवहार, विद्युत वितरण कंपनीशी निगडीत कामे केळझर येथूनच दहेगाव (गोसावी) सह पहेलानपूर, खापरी (ढोणे), आलगाव, जुनोना, आजनगाव आदी गावातील नागरिकांना करावी लागतात. त्यामुळे त्यांचे केळझरला येणे नित्याचेच होते. परंतु सदर रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे दुचाकी, आॅटोरिक्षासह लहान वाहन चालकांना या रस्त्यावरून अवागमन करताना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. तरी बांधकाम विभागाने व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देत दोषींवर कारवाई करावी व या मार्गाची दुरुस्ती करावी.रस्त्याच्या कडा खचल्याने अपघाताची शक्यतारसुलाबाद- रसूलाबाद ते विरुळ (आ) या दोन्ही गावाला जोडणाऱ्या डांबरी रस्त्याच्या कडा खचल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रसूलाबाद ते विरुळ दरम्यान जोडणाऱ्या मार्गावर येथील शेतकरी सुरेश ढोके यांच्या शेताजवळील मार्गाच्या मोठ्या प्रमाणात कडा खचल्याने अपघात होऊ शकतो. या ठिकाणी काही अंतरावर सीमेंट नळी (पायली ) टाकलेली आहे त्या ठिकाणी पुल आहे पण पाऊस आल्यामुळे त्या ठिकाणी काडी कचरा अडकून बुजतात आणि पाणी बाजूने फेकल्या जाते त्यामुळे त्याठिकाणी खोलगट भाग निर्माण झाला. या बाबतची माहिती लोकप्रतिनिधीला दिली ते पण दुर्लक्ष करीत आहे असा नागरिकांचा आरोप आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक