शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जड वाहनांच्या वर्दळीमुळे केळझर-दहेगाव रस्ता उखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 23:51 IST

बुट्टीबोरी-तुळजापूर महामार्गाचे काम हाती घेतलेल्या दिलीप बिल्डकॉन या रस्ते बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या जड वाहनांच्या वर्दळीमुळे केळझर ते दहेगाव (गोसावी) या डांबरी रस्त्याची अवघ्या आठ महिन्यांत गिट्टी उखडून रस्त्यावर पसरली.

ठळक मुद्देदिलीप बिल्डकॉनच्या वाहनामुळे रस्ता खड्डयात : दुरस्ती न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : बुट्टीबोरी-तुळजापूर महामार्गाचे काम हाती घेतलेल्या दिलीप बिल्डकॉन या रस्ते बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या जड वाहनांच्या वर्दळीमुळे केळझर ते दहेगाव (गोसावी) या डांबरी रस्त्याची अवघ्या आठ महिन्यांत गिट्टी उखडून रस्त्यावर पसरली. त्यामुळे या मार्गावरून अवागमन करणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.दोन वर्षापूर्वी सदर मार्गाचे डांबरीकरण होऊन रस्ता गुळगुळीत झाला होता. परंतु बुट्टीबोरी ते तुळजापूर रस्त्याचे काम करणाऱ्या दिलीप बिल्डकॉन कंपनीचे टिप्पर, ट्रक या मार्गावरून जात निर्माणाधिन सिमेंट मार्गाकरिता लागणारी गिट्टी तयार करण्याकरिता मोठे दगडे व मुरूमाची दहेगाव (गोसावी) येथून ने-आण करण्यात येते. दिवसाला या मार्गावरून जड वाहनांच्या याकरिता शेकडो फेºया होत असल्याने मार्गाची अक्षरश चाळणी होवून रस्ता उखडून त्यातील गिट्टी रस्त्यावर विखुरल्या गेली आहे. त्यामुळे दहेगाव व त्या पलीकडील चार ते पाच गावातील गावकºयांना केळझरकडे येतांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो. तसेच वाहनचालकांना या मार्गावरून वाहन चालवतांना तारेवरची कसरत करावी लागते. परिणामी होणारे किरकोळ अपघात नित्याचेच झाले आहे. केळझर ते दहेगाव (गोसावी) हे अंतर सहा कि.मी. असून बाजारपेठ आणि बॅँकेचे व्यवहार, विद्युत वितरण कंपनीशी निगडीत कामे केळझर येथूनच दहेगाव (गोसावी) सह पहेलानपूर, खापरी (ढोणे), आलगाव, जुनोना, आजनगाव आदी गावातील नागरिकांना करावी लागतात. त्यामुळे त्यांचे केळझरला येणे नित्याचेच होते. परंतु सदर रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे दुचाकी, आॅटोरिक्षासह लहान वाहन चालकांना या रस्त्यावरून अवागमन करताना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. तरी बांधकाम विभागाने व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देत दोषींवर कारवाई करावी व या मार्गाची दुरुस्ती करावी.रस्त्याच्या कडा खचल्याने अपघाताची शक्यतारसुलाबाद- रसूलाबाद ते विरुळ (आ) या दोन्ही गावाला जोडणाऱ्या डांबरी रस्त्याच्या कडा खचल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रसूलाबाद ते विरुळ दरम्यान जोडणाऱ्या मार्गावर येथील शेतकरी सुरेश ढोके यांच्या शेताजवळील मार्गाच्या मोठ्या प्रमाणात कडा खचल्याने अपघात होऊ शकतो. या ठिकाणी काही अंतरावर सीमेंट नळी (पायली ) टाकलेली आहे त्या ठिकाणी पुल आहे पण पाऊस आल्यामुळे त्या ठिकाणी काडी कचरा अडकून बुजतात आणि पाणी बाजूने फेकल्या जाते त्यामुळे त्याठिकाणी खोलगट भाग निर्माण झाला. या बाबतची माहिती लोकप्रतिनिधीला दिली ते पण दुर्लक्ष करीत आहे असा नागरिकांचा आरोप आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक