शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

डाळी कडाडल्याने सर्वसामान्यांना चिंता

By admin | Updated: June 13, 2015 02:09 IST

महागाईची झळ कमी होईल, असे सर्वसामान्यांना वाटत असताना त्याचे चटके अधिकच तीव्र होत आहे.

वर्धा : महागाईची झळ कमी होईल, असे सर्वसामान्यांना वाटत असताना त्याचे चटके अधिकच तीव्र होत आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती गणाला भिडत असताना सर्वसामान्यांच्या जेवणात महत्त्वाचे असलेले वरणही गायब होण्याची वेळ आली आहे. वर्षभरात तुरीसह इतर डाळीच्या किंमती २० ते २५ रुपये प्रतिकिलोने वाढल्याने ‘दाल रोटी’ दुरापास्त होण्याची वेळ आली आहे.गत महिन्यात ८० ते ८५ रुपये किलोच्या घरात असलेली तुरीची डाळ आज १०० ते १२० रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. या पाठोपाठ इतर डाळीही भडकल्याने जेवणाच्या ताटातून डाळीचे पदार्थ नजेरआड होण्याची वेळ आली आहे. डाळीच्या वाढलेल्या किंमतीमुळे खर्चाचे बजेट बसविणे गृहिणींना अडचणीचे जात आहे. या तुलनेत कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला त्या तुलनेत मिळणारा दर मात्र कमी आहे. तूर पिकवून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या बळीराजालाही डाळीच्या वरणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. डाळीच्या वाढलेल्या किंमतीचा फटका सर्वसामान्यांसह हॉटेल व्यावसायिकांनाही बसत बसल्याचे दिसून येत आहे. हॉटेलात सर्वात कमी खर्चाची भाजी म्हणून दालफ्रायकडे पाहिले जात होते. डाळीचे भाव वाढल्याने आज या डिशचे दर वाढले आहे. दर वाढले असून मिळणाऱ्या दालफ्रासमध्ये दाळ कमी व इतर मसालाच जास्त असल्याचे दिसत आहे. याला डाळींचे कडालेले भाव कारणीभूत असल्याचे बोलले जाते.शरीरात प्रथिनाची मात्रा सांभाळण्याकरिता जेवणात तुरीच्या डाळीच्या पदार्थांना विशेष महत्त्व आहे. या सोबतच इतर डाळींचा अंतर्भाव केला जातो. मात्र गत महिनाभरापासून वाढलेल्या या डाळीच्या दरामुळे नागरिकांच्या ताटातून डाळीचे पदार्थ नजरेआड होण्याची शक्यता बळावली आहे. रोजमजुरी करणाऱ्यांना तर तुरीची डाळ विकत घेणे शक्य नसल्याचे दिसते. राज्यात नवे शासन आल्याने महागाईचा वाढता आलेख कमी होईल असे सर्वसामान्यांना वाटत होते. मात्र महागाई कमी होण्यापेक्षा ती वाढतच असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे सत्तेत असलेले शासन सर्वसामान्यांच्या नाही तर व्यापारी धार्जिने असल्याच्या प्रतिक्रीया सर्वसामान्यातून व्यक्त होत आहेत. महागाईच्या दिवसेंदिवस वाढत असलेल्या या बडग्यापासून नेमकी मुक्ती केव्हा मिळेल याची प्रतीक्षा कायमच असल्याचे दिसत आहे.(प्रतिनिधी)