शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

नाल्याच्या पुरामुळे पीक गेले वाहून

By admin | Updated: July 28, 2016 00:40 IST

गत तीन दिवसांत दोनदा मुसळधार पाऊस झाला. यामुळे गावानजीकच्या नाल्यांना पूर आला.

शेतकरी हवालदिल : नुकसान भरपाईसाठी तहसीलरादांना साकडे सेलगाव (लवणे) : गत तीन दिवसांत दोनदा मुसळधार पाऊस झाला. यामुळे गावानजीकच्या नाल्यांना पूर आला. या पुरामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले. त्यामुळे अनेकांचे पीक खरडून गेले, तर शेकडो हेक्टर शेती जलमय झाली आहे. मोठे नुकसान या भागातील शेतकऱ्यांना यात सोसावे लागले आहे. या मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आल्याने नाल्या काठावर शेती असलेले विनोद हनुमंत पाचपोहर यांच्या शेतातील सोयाबीन, कापूस, तूर व संत्र्याची लहान झाडे खरडून गेली. यात शेतकऱ्याचे बरेच नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सदर शेतकऱ्यांने कारंजा येथील तहसीलदारांना कळविले. पण अद्यापही पाहणी करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पाचपोहर यांच्याकडे २ हेक्टर शेती आहे. संपूर्ण पिकाचे नुकसान झाल्यामुळे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महसूल कार्यालयाने पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सदर शेतकऱ्याने केली आहे.(वार्ताहर)