शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे ग्रामस्थांचे हाल

By admin | Updated: November 29, 2015 02:54 IST

तालुक्यातील आदिवासी भागाचा आणि गावांचा विकास व्हावा म्हणून कोट्यवधी रुपये रस्ते व अन्य योजनांसाठी दिले जातात;

निकृष्ट कामे : कंत्राटदार, अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीतळेगाव (श्या.पं.) : तालुक्यातील आदिवासी भागाचा आणि गावांचा विकास व्हावा म्हणून कोट्यवधी रुपये रस्ते व अन्य योजनांसाठी दिले जातात; पण संबंधित कंत्राटदार निकृष्ट कामे करीत असल्याने तो निधी व्यर्थ खर्च होत असल्याचे दिसते. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे ग्रामीण नागरिकांचे हाल होत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे आहे.आदिवासी बहुल व ग्रामीण भागातील कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची केली जातात. यामुळेच परिसरातील बहुतांश रस्ते उखडले आहेत. रस्त्यांना जागोजागी खड्डे पडले असून घरकुलाच्या इमारतींनाही भेगा गेल्या आहेत. काही घरकूल कोसळण्याच्या मार्गावर आहे. यामुळे संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी माणगी होत आहे. आष्टी तालुक्यात अनेक गावे आहेत. या परिसरात आदिवासी, बंजारा बांधव मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. पोरगव्हाण, पंचाळा, बार्म्बडा, किन्ही मोई, पांढुर्णा, शिरकुटणी या गावांतील नागरिकांना दळणवळणाची सुविधा व्हावी तसेच गावे शहराशी जोडली जावी म्हणून रस्त्यांची निर्मिती करण्यात आली. यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, ठक्करबाप्पा योजना तसेच नाबार्डसह विविध योजनांतून निधी आणला गेला; पण रत्यांच्या बांधकामात कंत्राटदारांनी गैरप्रकार केल्याने अनेक रस्ते उखडले आहेत. एकाच वर्षाच्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे. यात कोट्यवधी रुपयांचा निधी व्यर्थ गेला. रस्ते बांधकामात अंदाज पत्रकाप्रमाणे साहित्य वापरले जात नाही. गिट्टी, डांबर दिसतच नसल्याची ओरड ग्रामस्थांतून होत आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहराकडे शाळेत येताना सुविधा मिळावी, हा यामागचा उद्देश होता; पण मुख्य विषयालाच तिलांजली मिळाली आहे. खड्डेमय रस्त्यामुळे वाहनांमध्येही बिघाड येत असल्याचे दिसते. याच खडतर रस्त्याने आदिवासी ग्रामस्थांना पायी यावे लागते. शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांवर पायी जाण्याची वेळ येत असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागाचा विकास व्हावा म्हणून कोट्यवधी रुपये केवळ रस्त्यांवर खर्चिले गेले; पण गावांचा विकास झालाच नसल्याचे चित्र आहे. रस्त्यांची मात्र दुरवस्था झाली आहे. संबंधित कंत्राटदारांनी अधिकाऱ्यांशी संगनमत करून निकृष्ट कामे केली. प्राकलनाप्रमाणे कामे होत नसल्याने अल्पावधीत दुरूस्तीची वेळ येते. संबंधित विभागाने याकडे लक्ष देत कामांची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)