शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

उत्पादनात घट तरी कापसाची आवक वाढली

By admin | Updated: February 15, 2015 01:44 IST

खरीप हंगाम धोक्याचा ठरला. शेतकऱ्यांच्या शेतातील उत्पन्न जागीच गेले. यात शासनाच्यावतीने सर्व्हे करून त्याचा अहवाल सादर केला.

विजय माहुरे सेलूखरीप हंगाम धोक्याचा ठरला. शेतकऱ्यांच्या शेतातील उत्पन्न जागीच गेले. यात शासनाच्यावतीने सर्व्हे करून त्याचा अहवाल सादर केला. यानुसार शेतकऱ्यांना मदत देण्यात येत आहे. असे असताना सेलूच्या बाजारेपेठेत मात्र कापसाच्या आवकीने तीन वर्षाचे आकडे मोडीत काढले. त्यामुळे येथे येणारा कापूस कुठला, अशी चर्चा जोर धरत आहे.तालुक्यात कापसाचे क्षेत्रफळ व ओलिताचा कापूस पिकविणाऱ्यांची संख्या अधिक असताना यावर्षी प्रथमच फेब्रुवारी महिन्याच्या अगोदर बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात कापसाची उलंगवाडी झाली. असे असताना मे महिन्यापर्यंत कापूस बाजारपेठे येतो. पण सेलूच्या बाजारपेठेत आर्थिक वर्षाचा विचार करता अजूनही ४५ दिवस शिल्लक आहेत. असे असताना गत वर्षीच्या तुलनेत ६० हजार क्विंटलने कापसाची आवक वाढली आहे.सेलू तालुक्यातील बहुतांश कापूस आंजी, खरांगणा व आर्वीच्या बाजारपेठेत विक्रीस जातो. असे असतानाही सेलूच्या बाजारपेठेत कापूस खरेदी वाढली आहे. ही खरेदी कशामुळे हा चर्चेचा विषय ठरत आहे. २ फेब्रुवारीपर्यंत सेलूच्या उपबाजारपेठेत हिंगणी व जुवाडी येथील कापूस संकलन केंद्रावर ९० हजार क्विंटलच्यावर कापूस खरेदी झाली. नगदी चुकारा हे कारण येथे असल्याचे शेतकरी सांगतात तर सेलू येथील दोन खरेदी केंद्रावर १ लाख क्विंटल कापूस खरेदी झाली. पणन महासंघाला फक्त ५ हजार क्विंटलवर समाधान मानावे लागले.एकीएकडे दरवर्षीच्यास तुलनेत कापूस पिकावर आलेल्या संकटामुळे अर्धेच उत्पन्न हातात असल्याचे चित्र आहे. असे असतानाही तीन वर्षाच्या तुलनेत कापसाची आवक वाढली, हे मात्र न उलनगडणारे कोडे ठरत आहे. कापसाची वाढलेली आवक मात्र दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांना विचार करायला लावणारी बाब ठरत आहे. अजूनही शेतात बराच कापूस पडून आहे. यामुळे यात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.