शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

डेंग्युने मृत्यू होऊनही नाल्यांची साफसफाई नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:07 IST

रमणा गावातील सोळा वर्षीय तृप्ती गजानन नाईक हिचा एक महिन्यापूर्वी डेंग्यूने मृत्यू झाला. गावातील स्वच्छतेकडे लक्ष न देता नाल्या गाळाने तुडुंब भरूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामसेवक व सरपंचावर आरोग्य विभागाने कोणतीही कारवाई केली नाही.

ठळक मुद्देरमणा ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष : गावातील नागरिक हैराण

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : रमणा गावातील सोळा वर्षीय तृप्ती गजानन नाईक हिचा एक महिन्यापूर्वी डेंग्यूने मृत्यू झाला. गावातील स्वच्छतेकडे लक्ष न देता नाल्या गाळाने तुडुंब भरूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामसेवक व सरपंचावर आरोग्य विभागाने कोणतीही कारवाई केली नाही. आरोग्य विभाग डेंग्यूने अजून किती बळी घेण्याची वाट पाहात आहेत, असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी केला आहे.रमणा येथील वॉर्ड क्र. ३ चे प्रकाश आत्माराम नाईक यांनी वॉर्डातील रहिवासींच्या स्वाक्षरीचे निवेदन ग्रामपंचायतीला दिले. मात्र त्याला केराची टोपली दाखविली. वारंवार तगादा लावल्यावर सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक मोक्यावर येवून गेले मात्र जाणुनबूजन तेथील रहिवासीवर राग काढल्या जात आहे. दोन वर्षापासून सांडपाणी नालीत तुडुंब गाळाने भरून गेले. लागूनच नाला आहे हे पाणी नाल्यामध्ये सोडल्यास पुढे वाहत जावू शकते. मात्र ग्रामपंचायतीचे पदाधिकारी मर्जीतील लोकांच्या हट्टापुढे नतमस्तक झाले आहे.आरोग्य विभागाचे अधिकारी पाहणी करून गेले. त्वरीत नालीतील तुंबलेला गाळ काढल्या जावून दुर्गंधीयुक्त पाण्याला मार्ग काढून देण्याचे आश्वासन दिले. ग्रामसेवक कर्तव्यात हयगय करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. नाल्या गाळांनी भरल्यामुळे सांडपाणी नालीवरून वाहताना पाहूनही ग्रा.पं. चे पदाधिकारी व ग्रामसेवक त्वरीत साफसफाई करीत नसतील तर डेंग्यूने कुणाचा बळी गेल्यास ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या अस्वच्छतेमुळे गावकरी संतप्त असून रोष व्यक्त करीत आहे.नालीचे बांधकाम अपूर्णवॉर्ड क्र. ३ चे नाली बांधकाम अर्धवट आहे. ते बांधकाम पूर्ण करून तेथील रहिवाशांना न्याय देण्याची गरज आहे. गेल्या दोन वर्षांपासून साचून असलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्याच्या वासामुळे घरात बसून जेवण करणे कठीण होत असल्याचे तेथील नागरीक सांगतात.चार-पाच वर्षांपासून बुजलेला शोषखड्डा उपसण्यात आला नाही. त्यामुळे या नालीचे पाणी जाण्यास मार्ग नव्हता. बाजुला शेतकऱ्याची मोठी नाली (बांधी) आहे. तो त्यात पाणी सोडू देत नाही. उद्याच शोषखड्डा साफ करून ते सांडपाणी त्यात सोडून ही समस्या सोडविण्याचे काम करून देतो.- व्ही.बी. कानतोडे, ग्रामसेवक, रमणा.

टॅग्स :dengueडेंग्यू