शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
3
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
4
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
5
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
6
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
7
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
8
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
9
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
10
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
11
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
12
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
13
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
14
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
15
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
16
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
17
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
18
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
19
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
20
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्युने मृत्यू होऊनही नाल्यांची साफसफाई नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:07 IST

रमणा गावातील सोळा वर्षीय तृप्ती गजानन नाईक हिचा एक महिन्यापूर्वी डेंग्यूने मृत्यू झाला. गावातील स्वच्छतेकडे लक्ष न देता नाल्या गाळाने तुडुंब भरूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामसेवक व सरपंचावर आरोग्य विभागाने कोणतीही कारवाई केली नाही.

ठळक मुद्देरमणा ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष : गावातील नागरिक हैराण

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : रमणा गावातील सोळा वर्षीय तृप्ती गजानन नाईक हिचा एक महिन्यापूर्वी डेंग्यूने मृत्यू झाला. गावातील स्वच्छतेकडे लक्ष न देता नाल्या गाळाने तुडुंब भरूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामसेवक व सरपंचावर आरोग्य विभागाने कोणतीही कारवाई केली नाही. आरोग्य विभाग डेंग्यूने अजून किती बळी घेण्याची वाट पाहात आहेत, असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी केला आहे.रमणा येथील वॉर्ड क्र. ३ चे प्रकाश आत्माराम नाईक यांनी वॉर्डातील रहिवासींच्या स्वाक्षरीचे निवेदन ग्रामपंचायतीला दिले. मात्र त्याला केराची टोपली दाखविली. वारंवार तगादा लावल्यावर सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक मोक्यावर येवून गेले मात्र जाणुनबूजन तेथील रहिवासीवर राग काढल्या जात आहे. दोन वर्षापासून सांडपाणी नालीत तुडुंब गाळाने भरून गेले. लागूनच नाला आहे हे पाणी नाल्यामध्ये सोडल्यास पुढे वाहत जावू शकते. मात्र ग्रामपंचायतीचे पदाधिकारी मर्जीतील लोकांच्या हट्टापुढे नतमस्तक झाले आहे.आरोग्य विभागाचे अधिकारी पाहणी करून गेले. त्वरीत नालीतील तुंबलेला गाळ काढल्या जावून दुर्गंधीयुक्त पाण्याला मार्ग काढून देण्याचे आश्वासन दिले. ग्रामसेवक कर्तव्यात हयगय करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. नाल्या गाळांनी भरल्यामुळे सांडपाणी नालीवरून वाहताना पाहूनही ग्रा.पं. चे पदाधिकारी व ग्रामसेवक त्वरीत साफसफाई करीत नसतील तर डेंग्यूने कुणाचा बळी गेल्यास ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या अस्वच्छतेमुळे गावकरी संतप्त असून रोष व्यक्त करीत आहे.नालीचे बांधकाम अपूर्णवॉर्ड क्र. ३ चे नाली बांधकाम अर्धवट आहे. ते बांधकाम पूर्ण करून तेथील रहिवाशांना न्याय देण्याची गरज आहे. गेल्या दोन वर्षांपासून साचून असलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्याच्या वासामुळे घरात बसून जेवण करणे कठीण होत असल्याचे तेथील नागरीक सांगतात.चार-पाच वर्षांपासून बुजलेला शोषखड्डा उपसण्यात आला नाही. त्यामुळे या नालीचे पाणी जाण्यास मार्ग नव्हता. बाजुला शेतकऱ्याची मोठी नाली (बांधी) आहे. तो त्यात पाणी सोडू देत नाही. उद्याच शोषखड्डा साफ करून ते सांडपाणी त्यात सोडून ही समस्या सोडविण्याचे काम करून देतो.- व्ही.बी. कानतोडे, ग्रामसेवक, रमणा.

टॅग्स :dengueडेंग्यू