शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

पुलाच्या कडा खचल्याने अपघाताचा धोका

By admin | Updated: May 16, 2015 02:14 IST

हिंगणघाटकडे जात असलेल्या मार्गावरील बोरगावलगत फार्मसी महाविद्यालयाजवळ पुलाच्या कडा खचल्याने ...

वर्धा : हिंगणघाटकडे जात असलेल्या मार्गावरील बोरगावलगत फार्मसी महाविद्यालयाजवळ पुलाच्या कडा खचल्याने भीषण अपघात होऊन वाहने नाल्यात उलटण्याची शक्यता बळावली आहे़ याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन पुलाची तत्काळ दुरूस्ती करावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे़वर्धा- हिंगणघाट मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ सुरू असते़ याच मार्गावर अभियांत्रिकी महाविद्यालय, फार्मसी महाविद्यालय असल्याने विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते़ दोन महिन्यापूर्वी अपघातात फार्मसी महाविद्यालयाजवळील नाल्यावरील पुलाच्या उजव्या बाजूचे कठडे तुटले़ या पुलाची उंची ही जमिनीपासून २० ते २५ फूट आहे़ भूगाव येथे औद्योगिक वसाहत असल्यामुळे रात्रीच्या वेळी जड वाहनांची वर्दळ येथे सुरू असते़ या पुलाचे कठडे तुटल्याने भरधाव वाहने पुलाच्या खाली कोसळण्याची शक्यता बळावली आहे़ दोन महिने उलटूनही बांधकाम विभागाने तुटलेल्या कठड्यांची दुरूस्ती तर सोडा साधा सूचना फलकही लावला नाही़ या मार्गाने लोकप्रतिनिधींची वाहनेसुद्धा दररोज जातात़ त्यांचेही दुर्लक्ष होत आहे. पुलालगतच एक सभागृह आहे़ सभागृहात पार्किंगसाठी व्यवस्था नसल्याने नागरिक रस्त्यावरच वाहने उभी करतात़ सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)