शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
4
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
5
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
6
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
7
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
8
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
9
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
11
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
12
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
13
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
14
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलांचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
15
What Is Option Trading: किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
16
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
17
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
18
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
19
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
20
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या

संततधार पावसामुळे पिके धोक्यात

By admin | Updated: August 3, 2016 00:58 IST

काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने पिकांची स्थिती अत्यंत नाजु झाली आहे.

कीड रोगांचा प्रादुर्भाव : पिकांची वाढ खुंटल्याने नुकसान होण्याची शक्यता आर्वी : काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने पिकांची स्थिती अत्यंत नाजु झाली आहे. सततच्या पावसामुळे वाढ खुंटली असून विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. तूर, सोयाबीन, कपाशी, उडीद, मुंग आदी सर्वच पिके धोक्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सततचा पाऊस व ढगाळी वातावरणामुळे पिकांना पुरेसा सुर्यप्रकाश मिळत नाही. यामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून खरीप पिकांची वाढ खुंटली आहे. ढगाळी वातावरण कीड रोगांना पोषक असल्याने शेतकरी त्रस्त आहे. जुलैच्या प्रारंभीच संततधार पावसाने हजेरी लावली. यानंतर पावसाचे सातत्य कायमच आहे. यामुळे तालुक्यातील सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर आदी पिकांवर मोठ्या प्रमाणात कीड रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी, पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. शासनाने गंभीर दखल घेत कृषी व महसूल विभागाकडून नुकसानीचे सर्वेक्षण करावे, नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली. यानंतर तालुक्यात जुलैमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली; पण सतत पाऊस कोसळत असल्याने व ढगाळी वातावरण असल्याने पिकांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला नाही. यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. सोयाबीन, कापूस, मुंग, उडीद, तूर या पिकांवर कीड रोगांचे आक्रमण झाले आहे. कृषी विभागाने सूचविलेल्या उपाययोजना करण्यासही शेतकऱ्यांना उसंत मिळत नसल्याने पिके हातची तर जाणार नाहीत ना, अशी भीती शेतकरी उपस्थित करीत आहेत. एक महिन्यापासून पाऊस सुरू असल्याने पिकांपेक्षा तण वाढले आहे. यामुळे पेरणीपेक्षा निंदणीचा खर्च अधिक करावा लागत आहे. पावसामुळे निंदण करणेही शक्य होत नसल्याने खरीप हंगाम वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसाने उसंत घेतल्यानंतर चांगली दिसणारी पिके आता सततच्या पावसामुळे खराब होत आहे. या परिस्थितीतून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना त्वरित सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.(शहर प्रतिनिधी) तुरीचे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर रोहणा - तुरीला बऱ्यापैकी भाव मिळत असल्याने एरवी आंतरपिक म्हणून असलेल्या तूर पिकाने यंदा मुख्य पिकाची जागा घेतली आहे. विदर्भात सर्वत्र तुरीच्या पिकाचे क्षेत्र वाढले; पण तुरीची पेरणी झाल्यापासून सतत पाऊस सुरू आहे. शेतात पाणी साचल्याने तुरीचे पीक मोठ्या प्रमाणात नष्ट झाल्याचे दिसून येत आहे. दुबार, तिबार पेरणी करूनही तुरीचे पीक शेतकरी वाचवू शकले नाही. यामुळे तूर उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहे. तूर पिकाची झाडे पावसाबाबत अत्यंत संवेदनशील असतात. रोपट्याच्या अवस्थेत शेतात पाणी साचल्यास तुरीची रोपटे त्वरित जळून नष्ट होतात. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात तुरीची पेरणी झाल्यापासून प्रारंभी सतत पाच दिवसांची झड कमी-अधिक प्रमाणात होती. परिणामी, नदी-नाल्यांना पूर आला नसला तरी शेतात अधिक पाणी मुरल्याने तुरीच्या रोपट्यांच्या मुळाशी दलदल निर्माण झाली. शेतातील सखल भागातील पूर्णत: तर इतर भागातील तुरीची रोपटे सडून नष्ट झाली. परिणामी, तूर पिकाचे हिरवी झालेली शेते पुन्हा काळी झाल्याचे दिसते. तीन-चार दिवसांची उघडीप मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा तुरीची दुबार पेरणी केली. चार-पाच दिवसांनी तुरीची अंकुरलेली रोपटी जमिनीच्या वर यायला लागताच दमदार पाऊस झाला. यामुळे दुबार पेरणीदेखील वाया गेली. आता आॅगस्ट महिना लागल्याने त्या जागेवर काय पेरावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पूढील हंगामात तुरी पिकवून चांगले उत्पादन मिळवू, हे शेतकऱ्यांचे स्वप्न स्वप्नच ठरणार असल्याचे दिसते. शासनाने प्रवृत्त केल्याने व चांगल्या भावाच्या आशेने यंदा तुरीचा पेरा वाढला होता. अनेकांना इतर पिकांतील आंतरपिक म्हणून नव्हे तर संपूर्ण शेतात केवळ तुरीचीच पेरणी केली होती. तुरीचा पेरा पाहता तूर हे शेतकऱ्यांचे दुय्यम व आंतरपिक नव्हे तर मुख्य व नगदी पिक म्हणून पूढे आले; पण सततच्या पावसाने बहरण्यापूर्वीच तूर नष्ट होत आहे. यामुळे तूर उत्पादन वाढविण्याच्या शासनाच्या उदीष्टाला खीळ बसली आहे.(वार्ताहर)