शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

बंधाऱ्याच्या निकृष्ठ बांधकामामुळे पाणी गेले वाहून

By admin | Updated: July 13, 2017 00:55 IST

नजीकच्या खानगाव येथे जलयुक्त शिवार योजनेत शेतालगत असलेल्या नाल्यावर बंधारा बांधण्यात आला. यात नाला खोलीकरण करण्यात आले होते.

शेतातील माती गेली खरडून : जलयुक्त शिवार योजनेत केले होते काम लोकमत न्यूज नेटवर्क मोझरी (शेकापूर) : नजीकच्या खानगाव येथे जलयुक्त शिवार योजनेत शेतालगत असलेल्या नाल्यावर बंधारा बांधण्यात आला. यात नाला खोलीकरण करण्यात आले होते. मे महिन्यात बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले. मात्र पहिल्याच पावसाळ्यात बंधाऱ्याचा काही भाग वाहुन गेला. यात मोझरी (शे.) येथील विजय येंडे यांच्या शेतातील माती खर्डून गेल्याने त्यांचे नुकसान झाले. सदर बंधारा बांधकामाची चौकशी करण्याची मागणी आहे. तसेच हा बंधारा फुटल्याने बंधाऱ्यात पाणी थांबत नाही. त्यामुळे या बंधाऱ्याचा पाणी साठविण्याचा उद्देशच अयशस्वी झाला आहे. त्यामुळे या बंधाऱ्याचा उपयोग काय, असा प्रश्न शिवारातील शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या समस्येकडे लक्ष देत त्वरित बंधाऱ्याची दुरूस्ती करण्याची मागणी केली आहे. सदर बंधाऱ्याची वेळीच डागडुजी केल्यास जलयुक्त शिवार योजनेचा उद्देश पूर्ण होईल, अशा प्रतिक्रीया शेतकरी वर्गातूंब उमटत आहे. शासनाच्यावतीने अनेक उपयुक्त योजना राबविण्यात येतात. योजनांचा उद्देश सर्वांना लाभ मिळावा असा असला तरी त्याची अंमलबजावणी योग्यरित्या होत नसल्याचे यावरुन दिसून येते. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत परिसरात नाला खोलीकरण करुन त्यावर बंधारे बांधण्यात आले आहे. या माध्यमातून साठविलेल्या पाण्याद्वारे जलस्तर वाढविण्याचा उद्देश चांगला असला तरी बंधारा बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या नियोजनशुन्यतेचा फटका परिसरातील शेतकऱ्यांना बसत आहे. कंत्राटदाराद्वारे करण्यात आलेल्या कामाची वेळीच पाहणी करण्यात आली नाही. त्यामुळे सदर प्रकार घडत आहेत.