शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

सीएम वॉररूममुळे निम्न वर्धाच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 22:34 IST

वर्धा जिल्ह्यातील आर्वी, देवळी, वर्धा, हिंगणघाट आदी तालुक्यासाठी वरदान ठरू पाहत असलेला निम्न वर्धा प्रकल्प पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजना व मुख्यमंत्री यांच्या वॉररूममध्ये या प्रकल्पाचा समावेश असून जून २०१९ पर्यंत............

ठळक मुद्देपंतप्रधान कृषी सिंचन योजना : जिल्ह्यातील चार तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : वर्धा जिल्ह्यातील आर्वी, देवळी, वर्धा, हिंगणघाट आदी तालुक्यासाठी वरदान ठरू पाहत असलेला निम्न वर्धा प्रकल्प पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजना व मुख्यमंत्री यांच्या वॉररूममध्ये या प्रकल्पाचा समावेश असून जून २०१९ पर्यंत सिंचन निर्मितीची कामे व जून २०२० पर्यंत पाटसºयांचीे कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत, अशी माहिती प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता ग. म. घुगल यांनी लोकमतशी बोलताना दिली.जल है तो कल है, पाणी वाचवा पाण्याचा काटकसरीने उपयोग करा, यासारखे कार्यक्रम मागील तीन वर्षांत राबवून या भागातील शेतकºयांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा संदेश दिला जात आहे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भूसंपादनात अडचणी निर्माण होत असल्याने सिंचन निर्मितीच्या उर्वरित निविदा काढता येत नाही. त्यामुळे कामाला गती देण्यासाठी अडचणीच्या ठिकाणी कायद्याने जमीन संपादित करण्याचे प्रस्तावित आहे. या भागातील मोझरी, शेकापूर, अलमडोह, टाकळी चणा, गंगापूर, टाकळी दरणे, आंजी मोठी आदी गावांतील प्रकल्पाच्या अंत्यभागात पाणी मिळत नसल्याच्या तक्रारींची दखल घेऊन मागणीनुसार पाण्याचे नियोजन करण्यात आले.त्यामुळे गौळ, कोळोणा, अडेगाव, गंगापूर, पिंपळगाव, दापोरी, गिरोली, अंबोडा, खानगाव, वरूड, पोटी, मोझरी, शेकापूर, कापसी, कोसुर्ला, टाकळी दरणे, अलमडोह आदी गावांतील लोकांना आवश्यकतेनुसार पाणी देणे शक्य झाले. रब्बीचे सिंचन सुरू असताना काही लोकांनी खानगाव वितरिका व नांदगाव वितरिकेचे दरवाजे खराब केल्यामुळे आलेल्या तांत्रिक अडचणी दूर सारून कास्तकारांना पाणी देण्यात आले, अशी माहिती घुगल यांनी दिली.शेतकºयांना पाणी वेळेवर मिळण्याचे दृष्टीने प्रकल्पाअंतर्गत वितरिका व लघुकालव्याच्या दरवाज्यांची कास्तकारांनी उघडझाप करू नये, असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. पाणी वापर संस्था स्थापन करण्यात आल्या असून सिंचनाच्या या कार्यात सर्वांनी मदत करावी. पाण्यावर सर्वांचा हक्क लक्षात घेता नियोजनाच्या माध्यमातून काटकसरीचे उदाहरण घालून द्यावे, असे आवाहन उपविभागीय अभियंता घुगल यांनी केले. यंदा पुर्वीच समाधानकारक पाऊस न झाल्याने जलशय तळ दाखवत आहेत.मागील तीन वर्षांत २० हजार हे.आर. शेतजमीन सिंचनाखालीप्रकल्पाच्या माध्यमातून मागील तीन वर्षांत २० हजार हे.आर. शेतजमीन सिंचनाखाली आली. याचा प्रत्यक्ष लाभ कास्तकारांना मिळला. धरणात केवळ २८ टक्के जलसाठा उपलब्ध असतानासुध्दा कास्तकारांच्या मागणीनुसार खरीप व रब्बी हंगामात प्रत्येकी एक पाळी याप्रमाणे पाणी देण्याचे नियोजन करण्यास अभियंत्यांचे परिश्रम मोलाचे ठरले आहे.प्रकल्पाची सिंचन क्षमता ६३ हजार ३३३ हे. आर असून यामध्ये आर्वी उपसा सिंचन व खर्डा बॅरेज मिळून सिंचन होणार आहे. यावर्षीच्या जून पर्यंत ३४ हजार ८७० हे. आर. क्षेत्रात सिंचन झाले आहे. उर्वरित २८ हजार ४६३ हेक्टर आर. ची कामे प्रगतिपथावर आहेत.आर्वी तालुक्यातील धनोडी येथे वर्धा नदीवर निम्न वर्धा प्रकल्पाचे काम पूर्णत्वास जात आहे. या प्रकल्पावर ४५ कि.मी. चा डावा कालवा, ३८ कि.मी. चा देवळी शाखा कालवा व २६ कि.मी. च्या गिरोली शाखा कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन या प्रकल्पांतर्गत पुलगाव येथे पुलगाव बॅरेज तसेच सिंचनासाठी वंचित राहणाºया गावासाठी खर्डा बॅरेज व आर्वी उपसा सिंचनाचा समावेश आहे.- ग. म. घुगल, उपविभागीय अभियंता, निम्न वर्धा प्रकल्प.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती