शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
3
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
4
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
5
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
6
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
7
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
8
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
9
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
10
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
11
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
12
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
13
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
14
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
15
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
16
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
17
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
18
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
19
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
20
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

‘कॅशलेस’ एटीएममुळे दीपोत्सवावर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 23:23 IST

शासनाने नोटबंदी करीत डिजीटल व्यवहारांवर भर दिला; पण या नोटबंदीचा सामान्यांवरील परिणाम अद्याप थांबला नाही.

ठळक मुद्देशहरातील अर्धेधिक एटीएम बंद : आर्थिक व्यवहार करताना वाढल्या नागरिकांच्या अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाने नोटबंदी करीत डिजीटल व्यवहारांवर भर दिला; पण या नोटबंदीचा सामान्यांवरील परिणाम अद्याप थांबला नाही. आॅनलाईन व्यवहारांच्या नावावर एटीएमचे महत्त्व कमी केले. परिणामी, सामान्यांना बँकेतील पैसा काढताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सणांच्या काळात हमखास एटीएम केंद्र बंद असतात. सध्या सर्वात मोठा दिवाळी सण दोन दिवसांवर आला असताना जिल्ह्यातील बव्हंशी एटीएम बंद आहे. यामुळे पैशासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांसह खासगी बँकांनी मोठ्या प्रमाणात एटीएम केंद्राची सेवा पुरविलेली आहे. प्रत्येक बँकेचे एका शहरात किमान दोन-तीन एटीएम केंद्र आहेत. यातील काही एटीएम तांत्रिक कारणांमुळे तर काही रक्कमच टाकली जात नसल्याने बंद ठेवले जातात. परिणामी, नागरिकांना आपल्याच पैशासाठी भटकंती करावी लागते. एक-दोन दिवस सुट्या आल्या की एटीएम केंदांवर संक्रांतच येते. सर्वच्या सर्व एटीएम केंद्र कॅशलेस होतात. परिणामी, नागरिकांनाही व्यवहार करताना अडचणींचा सामना करावा लागतो.हिंदू वर्षातील सर्वात मोठा सण दिवाळी हा दोन दिवसांवर आला आहे. १९ आॅक्टोबर रोजी गरीब, श्रीमंत सर्वच लक्ष्मीपूजन करून माता लक्ष्मीची कृपा मिळावी म्हणून आराधना करणार आहे. या सणासाठी नवीन कपडे, वस्तू, सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. यातील कपडे व सोने खरेदी करताना नागरिकांना आॅनलाईन व्यवहार करता येतील; पण रस्त्यावर बसणाºया विक्रेत्यांकडून काही वस्तू खरेदी करावयाच्या असल्यास त्यांच्याशी आॅनलाईन व्यवहार कसे करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यासाठी नागरिकांना खिशात पैसे असणेच गरजेचे असते; पण शनिवार व रविवारची सुटी आल्यामुळे सोमवारी जिल्ह्यातील बहुतांश एटीएम कॅशलेस झाल्याचेच दिसून आले. एका व्यक्तीने सोमवारी शहरातील सुमारे १३ एटीएम केंद्र तपासले. हे सर्वच्या सर्व एटीएम कॅशलेस असल्यामुळे बंद ठेवण्यात आले होते. तत्सम फलकही प्रवेश द्वारावरच टांगण्यात आल्याचे दिसून आले. यात राष्ट्रीयकृत तथा खासगी बँकांच्या एटीएम केंद्रांचाही समावेश असल्याचे पाहावयास मिळाले.शहरातील बहुतांश एटीएम बंद असल्याने अनेक नागरिकांना पैशासाठी भटकंती करावी लागली. बँकांमध्येही पैसे काढणाºयांची गर्दी झाल्याचे दिसून येत होते. एटीएमबाबत प्रत्येक सणामध्ये हा प्रकार घडत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. बँक प्रशासनाकडूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ग्राहकांमध्ये असंतोष पसरला आहे. जिल्हा अग्रणी बँक प्रशासनही दुर्लक्ष करीत असल्याने बँक ग्राहकांनी तक्रार कुणाकडे करावी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळे आता त्रस्त नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडे आपला मोर्चा वळविला. जिल्हाधिकाºयांनी बँकांना निर्देश देत एटीएम केंद्र सुरळीत सुरू ठेवावेत, अशी मागणी होत आहे.पूर्वीच्या पद्धतीमधील बदलांमुळे अडचणींत वाढपूर्वी रिझर्व्ह बँकेच्या सूचनांप्रमाणे एटीएममध्ये कॅश टाकण्याचे कंत्राट दिले जात होते; पण या पद्धतीत बदल करण्यात आला आहे. सध्या बहुतांश बँकांनी एटीएममध्ये कॅश टाकणे तथा मशीन दुरूस्तीसाठी स्वत:ची वेगळी यंत्रणातच तयार केली आहे. यामुळे कंत्राट पद्धती बंद झाली आहे. आता बँकांद्वारेही ही कामे व्यवस्थित केली जात नसल्याने एटीएमच कॅशलेस होत आहेत.