शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

‘कॅशलेस’ एटीएममुळे दीपोत्सवावर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 23:23 IST

शासनाने नोटबंदी करीत डिजीटल व्यवहारांवर भर दिला; पण या नोटबंदीचा सामान्यांवरील परिणाम अद्याप थांबला नाही.

ठळक मुद्देशहरातील अर्धेधिक एटीएम बंद : आर्थिक व्यवहार करताना वाढल्या नागरिकांच्या अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाने नोटबंदी करीत डिजीटल व्यवहारांवर भर दिला; पण या नोटबंदीचा सामान्यांवरील परिणाम अद्याप थांबला नाही. आॅनलाईन व्यवहारांच्या नावावर एटीएमचे महत्त्व कमी केले. परिणामी, सामान्यांना बँकेतील पैसा काढताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सणांच्या काळात हमखास एटीएम केंद्र बंद असतात. सध्या सर्वात मोठा दिवाळी सण दोन दिवसांवर आला असताना जिल्ह्यातील बव्हंशी एटीएम बंद आहे. यामुळे पैशासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांसह खासगी बँकांनी मोठ्या प्रमाणात एटीएम केंद्राची सेवा पुरविलेली आहे. प्रत्येक बँकेचे एका शहरात किमान दोन-तीन एटीएम केंद्र आहेत. यातील काही एटीएम तांत्रिक कारणांमुळे तर काही रक्कमच टाकली जात नसल्याने बंद ठेवले जातात. परिणामी, नागरिकांना आपल्याच पैशासाठी भटकंती करावी लागते. एक-दोन दिवस सुट्या आल्या की एटीएम केंदांवर संक्रांतच येते. सर्वच्या सर्व एटीएम केंद्र कॅशलेस होतात. परिणामी, नागरिकांनाही व्यवहार करताना अडचणींचा सामना करावा लागतो.हिंदू वर्षातील सर्वात मोठा सण दिवाळी हा दोन दिवसांवर आला आहे. १९ आॅक्टोबर रोजी गरीब, श्रीमंत सर्वच लक्ष्मीपूजन करून माता लक्ष्मीची कृपा मिळावी म्हणून आराधना करणार आहे. या सणासाठी नवीन कपडे, वस्तू, सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. यातील कपडे व सोने खरेदी करताना नागरिकांना आॅनलाईन व्यवहार करता येतील; पण रस्त्यावर बसणाºया विक्रेत्यांकडून काही वस्तू खरेदी करावयाच्या असल्यास त्यांच्याशी आॅनलाईन व्यवहार कसे करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यासाठी नागरिकांना खिशात पैसे असणेच गरजेचे असते; पण शनिवार व रविवारची सुटी आल्यामुळे सोमवारी जिल्ह्यातील बहुतांश एटीएम कॅशलेस झाल्याचेच दिसून आले. एका व्यक्तीने सोमवारी शहरातील सुमारे १३ एटीएम केंद्र तपासले. हे सर्वच्या सर्व एटीएम कॅशलेस असल्यामुळे बंद ठेवण्यात आले होते. तत्सम फलकही प्रवेश द्वारावरच टांगण्यात आल्याचे दिसून आले. यात राष्ट्रीयकृत तथा खासगी बँकांच्या एटीएम केंद्रांचाही समावेश असल्याचे पाहावयास मिळाले.शहरातील बहुतांश एटीएम बंद असल्याने अनेक नागरिकांना पैशासाठी भटकंती करावी लागली. बँकांमध्येही पैसे काढणाºयांची गर्दी झाल्याचे दिसून येत होते. एटीएमबाबत प्रत्येक सणामध्ये हा प्रकार घडत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. बँक प्रशासनाकडूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ग्राहकांमध्ये असंतोष पसरला आहे. जिल्हा अग्रणी बँक प्रशासनही दुर्लक्ष करीत असल्याने बँक ग्राहकांनी तक्रार कुणाकडे करावी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळे आता त्रस्त नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडे आपला मोर्चा वळविला. जिल्हाधिकाºयांनी बँकांना निर्देश देत एटीएम केंद्र सुरळीत सुरू ठेवावेत, अशी मागणी होत आहे.पूर्वीच्या पद्धतीमधील बदलांमुळे अडचणींत वाढपूर्वी रिझर्व्ह बँकेच्या सूचनांप्रमाणे एटीएममध्ये कॅश टाकण्याचे कंत्राट दिले जात होते; पण या पद्धतीत बदल करण्यात आला आहे. सध्या बहुतांश बँकांनी एटीएममध्ये कॅश टाकणे तथा मशीन दुरूस्तीसाठी स्वत:ची वेगळी यंत्रणातच तयार केली आहे. यामुळे कंत्राट पद्धती बंद झाली आहे. आता बँकांद्वारेही ही कामे व्यवस्थित केली जात नसल्याने एटीएमच कॅशलेस होत आहेत.