शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

कर्जबाजारीपणामुळेच शेतकरी आत्महत्येत वाढ

By admin | Updated: October 26, 2016 01:03 IST

विद्यमान केंद्र सरकार सामान्य जनतेचे राहिले नाही. देशातील बडे उद्योगपती, कॉर्पोरेट घरण्यांचे सेवक झाले.

वृंदा करात : सिटूच्या रामचंद्र घंगारे कामगार भवनात सभावर्धा : विद्यमान केंद्र सरकार सामान्य जनतेचे राहिले नाही. देशातील बडे उद्योगपती, कॉर्पोरेट घरण्यांचे सेवक झाले. उद्योगपतींच्या हितार्थ कायद्यात बदल करून कामगारांच्या हिताचा किमान वेतन कायदा, फॅक्टरी अ‍ॅक्ट, कामाचे तास वाढविणे, कंत्राटी पद्धतीने नोकरी, असे कामगार विरोधी निर्णय घेण्यात आले. केंद्र शासनाने वर्षभरात १ लाख २८ हजार कोटी रुपयांचे उद्योगपतींचे कर्ज माफ केले; पण शेतकऱ्यांचे लाख-दोन लाख रुपये कर्ज आश्वासन देऊनही माफ केले नाही. कर्जबाजारीपणामुळेच शेतकरी आत्महत्यांत वाढ होत आहे; पण शासनाला पर्वा नाही, असे मत राज्यसभेच्या खासदार वृंदा करात यांनी व्यक्त केले.सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू) च्या नवीन रामचंद्र घंगारे कामगार भवनाचे लोकार्पण करात यांच्या हस्ते रविवारी झाले. यानंतर झालेल्या सभेत त्या बोलत होत्या. याप्रसंगी वर्धा जिल्हा इमारत बांधकाम कामगार संघटना, पाटबंधारे कर्मचारी युनियन, घर कामगार संघटना, अंगणवाडी सेविका, मदतनिस कर्मचारी संघटना, शालेय पोषण आहार संघटना, जनरल लेबर युनियन, अपंग शाळा शिक्षक, कर्मचारी संघटना, वृत्तपत्र विक्रेता संघटना, रामचंद्र घंगारे कला मंच, जनवादी महिला संघटना, शेतमजूर युनियन, किसान सभा, माकपचे कार्यकर्ते उपस्थित होते. सभेला शेतकरी नेते विजय जावंधिया, यशवंत झाडे, महेश दुबे, प्रतीक्षा हाडके, दुर्गा काकडे, रंजना सावरकर, प्रभा घंगारे उपस्थित होते.करात पूढे म्हणाल्या की, शेतकरी, कामगारांचे प्रश्न सोडवावे, तरूण बेरोजगारांना नोकरी मिळावी, राज्य घटनेप्रमाणे सर्वांना मोफत शिक्षण दिले पाहिजे. यासाठी काही न करता देशातील जनतेने काय खावे, पेहराव कोणता करावा, कोणते नारे द्यावे यावरच सरकार वाद घालत आहे. जाती-धर्माच्या संघर्षात लोकांना अडकवून ठेवते. ही बाब गंभीर असून सामान्य कष्टकऱ्यांनी संघटित होऊन सामाजिक-आर्थिक आंदोलनातून नवा पर्याय तयार करावा, असे आवाहन त्यांनी केले.जावंधिया यांनी शेतकऱ्यांची स्थिती वाईट आहे. भाजपच्या काळात आत्महत्या वाढल्या. कापूस, सोयाबीनला भाव नाही. स्वामीनाथन आयोगानुसार दर देऊ, असे सांगणाऱ्या केंद्र सरकारने आयोग लागू करू शकत नाही, असे सुप्रीम कोर्टासमक्ष प्रतिज्ञापत्र दिले. शेतीला ग्रामीण भागात गतवैभव प्राप्त करायचे झाल्यास शेती नफ्यात येणे गरजेचे आहे. यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची त्वरित अंमलबजावणी व्हावी, असे त्यांनी सांगितले.करात यांचा शाल, श्रीफळ व चरखा देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक महेश दुबे व संचालन यशवंत झाडे यांनी केले तर आभार रंजना सावरकर यांनी मानले.(कार्यालय प्रतिनिधी)