शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली

By admin | Updated: August 18, 2014 23:40 IST

परिसरात शेतकरी वर्गाची महत्त्वाची असलेली सोयाबीन, तुर व कपाशी आदी पिके पावसाअभावी वितभरच वाढली आहे. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट होण्याची चिन्हे आहेत.

तळेगाव (श्या.) : परिसरात शेतकरी वर्गाची महत्त्वाची असलेली सोयाबीन, तुर व कपाशी आदी पिके पावसाअभावी वितभरच वाढली आहे. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट होण्याची चिन्हे आहेत. दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या आसपास दोन फुटापर्यंत वाढणाऱ्या कपाशीचे डौलदार देखणे दृश्य यंदा कुठेच पाहावयास मिळत नाही. सोयाबीनची तर वाढच खुंटली आहे. या परिस्थितीने हताश शेतकऱ्यांनी शेतीच्या उत्पन्नाची आशाच सोडली आहे. यंदाच्या पोळा सणावरही दु:खाचे सावट पसरले आहे. कपाशी, सोयाबीनवरच वर्षभराची अर्थव्यवस्था अवलंबून असल्याने शेतकऱ्यांनी यंदा दुबार व तिबार पेरण्या केल्या. पण पावसाचे सारे गणित यंदा विस्कटले. अकाली पावसासोबतच लहरी भारनियमन, वन्य प्राण्यांचा त्रास यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. जुन व जुलै महिन्यात अत्यल्प पाऊस झाला. पावसाने आॅगस्ट महिन्यात तरी दमदार हजेरी लावावी, ही शेतकरी वर्गाची अपेक्षा फोल ठरली. गतवर्षीच्या तुलनेत कमी झालेल्या पावसाने ऐन उमेदीत असलेल्या पिकांची वाढ खुंटली. परिसरात वादळी पावसाने आधीच संत्रा पिकाचे अतोनात नुकसान झाले. या परिस्थितीत सरकारी यंत्रणेकडून अपेक्षित असलेले सहकार्य मिळत नसल्याची तक्रार आहे. तळेगाव परिसरात तर शेतकऱ्यांनी सोयाबीनची आशा सोडी असून आपले शेत हरभऱ्यासाठी नांगरणी सुरू केले आहे. शासनाने विजेची बिले व्याज पूर्ण माफ करण्याची अपेक्षा आहे.(वार्ताहर)