शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

कर्मचाऱ्यांअभावी कृषी चिकित्सालय मोडकळीस

By admin | Updated: June 13, 2017 01:04 IST

तालुक्यात एकमेव असलेल्या कृषिचिकित्सालय व शेतकरी प्रशिक्षण केंद्राला अखेरची घरघर लागली आहे.

५५ पैकी १५ एकर शेती वाहितीखाली : पॉलिशेडची लागली वाट लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : तालुक्यात एकमेव असलेल्या कृषिचिकित्सालय व शेतकरी प्रशिक्षण केंद्राला अखेरची घरघर लागली आहे. शासनाने कर्मचारी भरती पूर्णत: बंद केल्याने येथे अवघ्या दोन कर्मचाऱ्यांवर ५५ एकराचा डोलारा आहे. कर्मचारी नसल्याने तब्बल ४० एकर शेती पडिक असून केवळ १५ एकर शेती वाहितीखाली आहे. यामुळे येथे लागत जास्त आणि उत्पादन शुन्य अशी स्थिती आहे. सदर चिकित्सालय शेतकऱ्यांकरिता कुचकामी ठरत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. याप्रकरणी जिल्हा कृषी अधिक्षकांनी लक्ष देत सुधारणा करण्याची मागणी आहे.आष्टी-तळेगाव राष्ट्रीय मार्गावर प्रशस्त जागेत असलेल्या या कृषिचिकित्सालयात बांधकाम करण्यात आलेले शेडचे टिनपत्रे पूर्ण उडाली आहे. पॉलीशेडवर लाखोंचा खर्च करण्यात आला. यामध्ये संत्राच्या कलमा तयार करण्यासाठीचे खुंट बांधण्यात आले नाही. यामुळे शेतकऱ्यांना कलमा मिळणार नाही असे सांगण्यात येत आहे. शेतीपयोगी साहित्य बऱ्याच वर्षांपासून पडून असल्याने गंजले आहे. जमिनीवर पीक पेरणीचा खर्च कागदोपत्री दाखवून उधळपट्टी सुरू आहे. या चिकित्सालयाला शासनाकडून १० लाख रुपयांचे वार्षिक अनुदान प्राप्त होते. सन २०१४-१५, २०१५-१६, २०१६-१७ या तीन वर्षात तब्बल ३० लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहे. असे असताना येथे असुविधांचा कळस आहे. शेतीची देखभाल करण्यावर झालेला खर्च पाहुन शेतकऱ्यांनी कलमा का तयार झाल्या नाही, असा प्रश्न अधिकाऱ्यांना विचारला असता त्यांनी कर्मचारी नाही एवढे उत्तर दिल्याचे शेतकरी सांगतात. वृक्षलागवडीसाठी रोपटे तयार करावयाचे काम अद्यापही सुरू झाले नाही. या चिकित्सालयात पॉलीथीनमध्ये माती भरली असून त्या सर्व पॉलिथीनचा एक ढीग लावून ठेवला आहे. माती, रोपमाल मदतनीस, कृषीसहायक हे पदही अद्याप भरले नाही. त्यामुळे हे चिकित्सालय उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. शासनाने दखल घेवून उपाययोजनेची मागणी आहे. कर्मचारी नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. शासनाचे अनुदान मिळाले, मात्र शेती करायलाही मनुष्यबळ नाही.- अरुण बलसाणे, उपविभागीय कृषी अधिकारी, आर्वी.