शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
6
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
7
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
8
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
9
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
10
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
11
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
12
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
13
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
14
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
15
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
16
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
17
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
18
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
19
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
20
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...

शेतशिवारातील नदी-नाल्यांना कोरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 21:19 IST

हिवाळा संपत येऊन उन्हाळा सुरू होण्याची चाहूल लागली आहे. परंतु, हिवाळा संपण्याच्या महिनाभरापूर्वीपासूनच शेतशिवारातील नदी-नाल्यांना कोरड पडली आहे. ही कोरड चिंतनीय असून जलसंकट गडद होण्याचे संकेत आहेत.

ठळक मुद्देविहिरींच्या पाणीपातळीत घट : जनावरांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.): हिवाळा संपत येऊन उन्हाळा सुरू होण्याची चाहूल लागली आहे. परंतु, हिवाळा संपण्याच्या महिनाभरापूर्वीपासूनच शेतशिवारातील नदी-नाल्यांना कोरड पडली आहे. ही कोरड चिंतनीय असून जलसंकट गडद होण्याचे संकेत आहेत.यंदाच्या हंगामात झालेल्या अत्यल्प पर्जन्यमानामुळे शेतशिवारातील बारमाही वाहणारे नदी-नाले पूर्णत: कोरडे झाले आहेत. हेच नदी-नाले जनावरांना पाणी पिण्याचे एकमेव स्त्रोत आहे. नदी-नाल्यांचा पाण्याचा प्रवाह बंद झाल्यामुळे विहिरींच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. उन्हाळा लागण्यापूर्वीच नदी-नाले कोरडे पडल्यामुळे उन्हाळ्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याचे चिन्हे दिसत आहेत.परिसरात जेव्हापासून अप्पर वर्धा धरणातून कालव्याद्वारे शेती सिंचनाकरिता पाणी सोडण्यास सुरुवात झाली, तेव्हापासून परिसरातील संपूर्ण विहिरींच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली होती. यावर्षीच्या अत्यल्प पावसामुळे अप्पर वर्धा धरणात पुरेसा जलसाठा होऊ न शकल्याने सिंचनाकरिता पाणी पुरेशा प्रमाणात सोडण्यात आले नाही. शेतकऱ्यांनी कशीबशी खरिपातील पिके घेतली. मात्र, अत्यल्प पावसाळ्यामुळे उत्पन्नात लक्षणीय घट झाली. रब्बीमध्ये बहुसंख्य शेतकºयांनी पाण्याअभावी पेरणीच केली नाही. परिसरात अप्पर वर्धा धरणाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात गहू व चण्याची पेरणी केली जात होती. ज्या शेतकºयांनी गव्हाची पेरणी केली, त्या शेतकºयांची ओलिताकरिता भंबेरी उडत आहे. हवामान खात्याचे चांगल्या पावसाचे केलेले भाकित पूर्णत: खोटे ठरले. परतीचा पाऊसही आला नाही त्यामुळे नदी व नाल्यांना हिवाळ्यातच कोरड पडली आहे. तसेच अत्यल्प पावसामुळे जलाशयाचेही तळ दिसत आहे. त्यामुळे आता कोरड्या दुष्काळाशी सामना करावा लागणार असे चित्र दिसत आहे.ओलिताची समस्यापरिसरात गहू व कांदा पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असते. परंतु, विहिरीची पाणीपातळी घटल्यामुळे शेतकऱ्यांपुढे ओलिताची समस्या निर्माण झाली आहे. पेरणी केलेले पीक जगणार की नाही, याबाबत शेतकरी साशंक आहे. त्यामुळे कांदा लागवडीच्या क्षेत्रात मोठी घट होत आहे.उन्हाळ्यात जलसंकट होणार गडदबहुतांश गावाच्या नळयोजना या नदी व नाल्यांच्या तिरावर आहे. नदी व नाल्यांना आताच पडलेली कोरड पाहता उन्हाळ्याच्या दिवसात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जनावारांचेही पिण्याच्या पाण्यावाचून हाल होणार आहेत.