शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

शेतशिवारातील नदी-नाल्यांना कोरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 21:19 IST

हिवाळा संपत येऊन उन्हाळा सुरू होण्याची चाहूल लागली आहे. परंतु, हिवाळा संपण्याच्या महिनाभरापूर्वीपासूनच शेतशिवारातील नदी-नाल्यांना कोरड पडली आहे. ही कोरड चिंतनीय असून जलसंकट गडद होण्याचे संकेत आहेत.

ठळक मुद्देविहिरींच्या पाणीपातळीत घट : जनावरांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.): हिवाळा संपत येऊन उन्हाळा सुरू होण्याची चाहूल लागली आहे. परंतु, हिवाळा संपण्याच्या महिनाभरापूर्वीपासूनच शेतशिवारातील नदी-नाल्यांना कोरड पडली आहे. ही कोरड चिंतनीय असून जलसंकट गडद होण्याचे संकेत आहेत.यंदाच्या हंगामात झालेल्या अत्यल्प पर्जन्यमानामुळे शेतशिवारातील बारमाही वाहणारे नदी-नाले पूर्णत: कोरडे झाले आहेत. हेच नदी-नाले जनावरांना पाणी पिण्याचे एकमेव स्त्रोत आहे. नदी-नाल्यांचा पाण्याचा प्रवाह बंद झाल्यामुळे विहिरींच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. उन्हाळा लागण्यापूर्वीच नदी-नाले कोरडे पडल्यामुळे उन्हाळ्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याचे चिन्हे दिसत आहेत.परिसरात जेव्हापासून अप्पर वर्धा धरणातून कालव्याद्वारे शेती सिंचनाकरिता पाणी सोडण्यास सुरुवात झाली, तेव्हापासून परिसरातील संपूर्ण विहिरींच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली होती. यावर्षीच्या अत्यल्प पावसामुळे अप्पर वर्धा धरणात पुरेसा जलसाठा होऊ न शकल्याने सिंचनाकरिता पाणी पुरेशा प्रमाणात सोडण्यात आले नाही. शेतकऱ्यांनी कशीबशी खरिपातील पिके घेतली. मात्र, अत्यल्प पावसाळ्यामुळे उत्पन्नात लक्षणीय घट झाली. रब्बीमध्ये बहुसंख्य शेतकºयांनी पाण्याअभावी पेरणीच केली नाही. परिसरात अप्पर वर्धा धरणाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात गहू व चण्याची पेरणी केली जात होती. ज्या शेतकºयांनी गव्हाची पेरणी केली, त्या शेतकºयांची ओलिताकरिता भंबेरी उडत आहे. हवामान खात्याचे चांगल्या पावसाचे केलेले भाकित पूर्णत: खोटे ठरले. परतीचा पाऊसही आला नाही त्यामुळे नदी व नाल्यांना हिवाळ्यातच कोरड पडली आहे. तसेच अत्यल्प पावसामुळे जलाशयाचेही तळ दिसत आहे. त्यामुळे आता कोरड्या दुष्काळाशी सामना करावा लागणार असे चित्र दिसत आहे.ओलिताची समस्यापरिसरात गहू व कांदा पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असते. परंतु, विहिरीची पाणीपातळी घटल्यामुळे शेतकऱ्यांपुढे ओलिताची समस्या निर्माण झाली आहे. पेरणी केलेले पीक जगणार की नाही, याबाबत शेतकरी साशंक आहे. त्यामुळे कांदा लागवडीच्या क्षेत्रात मोठी घट होत आहे.उन्हाळ्यात जलसंकट होणार गडदबहुतांश गावाच्या नळयोजना या नदी व नाल्यांच्या तिरावर आहे. नदी व नाल्यांना आताच पडलेली कोरड पाहता उन्हाळ्याच्या दिवसात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जनावारांचेही पिण्याच्या पाण्यावाचून हाल होणार आहेत.