शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

येळाकेळीत धामनदीपात्राला कोरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 23:03 IST

शहरासह लगतच्या ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या येळाकेळीतील धाम नदीपात्र पूर्णत: कोरडे पडल्याने जलसंकट गडद होण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देजलसंकट होणार गडद : रखरखत्या उन्हात नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरासह लगतच्या ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या येळाकेळीतील धाम नदीपात्र पूर्णत: कोरडे पडल्याने जलसंकट गडद होण्याची चिन्हे आहेत.अत्यल्प झालेल्या पावसामुळे यावेळी जिल्ह्यातील मध्यम आणि लघु जलाशयांमध्ये अल्पसा जलसाठा शिल्लक आहे. पाणीटंचाईसदृश परिस्थिती असतानाच तापमानही ४० अंश सेल्सिअसच्या जवळपास पोहोचले आहे.सद्यस्थितीत शहरात आठ दिवसांआड तर ग्रामीण भागातही आठ ते दहा दिवसांआड नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा होत आहे. कमी पावसामुळे यावेळी डिसेंबर महिन्यापासूनच नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने अनेकांनी बोअरवेल केल्या. अद्यापही शहरासह लगतच्या ग्रामीण दररोज बोअरवेल केल्या जात आहेत. वर्धा शहर आणि ग्रामीण भागाला येळाकेळी येथील नदीवरून पाणीपुरवठा होतो.या पात्रातही सद्यस्थितीत ठणठणाट आहे. आठ-आठ दिवसांआड नळाद्वारे पाणी येत असल्याने नागरिकांची रखरखत्या उन्हात भटकंती होत असल्याचे ग्रामीण भागातील चित्र आहे. अनेक ठिकाणी हॅण्डपंप आहेत, मात्र भूजल पातळी खालावल्याने त्यातूनही पाणी येणे बंद झाले आहे. मार्च महिन्यातच ही स्थिती असल्याने एप्रिल, मे महिन्यात नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, हे खरे.नगरपालिका, जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजनांचा अभावजल है तो कल है, पाण्याची बचत काळाची गरज, पाच्याचा जपून वापरण्याविषयी नगरपालिका व जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना उपदेशाचे डोज पाजले जात आहेत. मात्र, जुने जलस्रोत जिवंत करण्याबाबत प्रशासनाकडून कुठलेही नियोजन करण्यात आले नाही, ही वस्तुस्थिती नाकारयता येणार नाही. कडक उन्हाळ्याचे आणखी दोन महिने शिल्लक आहेत. मार्चच्या अखेरीसच ही परिस्थिती असल्याने नागरिकांना यावेळी प्रथमच भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

जलाशयांमध्येही अल्प जलसाठायंदा जिल्ह्यात अल्प पर्जन्यमान झाले. यामुळे जिल्ह्यातील लघु आणि मध्यम जलाशयांमध्येही अल्प जलसाठा शिल्लक आहे. पवनार येथील धामनदीपात्रातील पाणीपुरवठा योजनेचा फुटव्हॉल्व्ह वर्ध्याच्या इतिहासात प्रथम उघडा पडला आहे. यामुळे शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना उन्हासोबतच पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. भूजलपातळी खालावल्याने बोअरवेलदेखील कित्येक फूट खोल केल्यानंतर पाणी लागत आहे. अनेक हातपंप कोरडे झाल्याने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.