शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
4
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
5
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
6
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
7
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
8
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
9
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
10
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
11
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
12
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
13
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
14
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
15
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
16
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
17
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
18
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...

येळाकेळीत धामनदीपात्राला कोरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 23:03 IST

शहरासह लगतच्या ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या येळाकेळीतील धाम नदीपात्र पूर्णत: कोरडे पडल्याने जलसंकट गडद होण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देजलसंकट होणार गडद : रखरखत्या उन्हात नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरासह लगतच्या ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या येळाकेळीतील धाम नदीपात्र पूर्णत: कोरडे पडल्याने जलसंकट गडद होण्याची चिन्हे आहेत.अत्यल्प झालेल्या पावसामुळे यावेळी जिल्ह्यातील मध्यम आणि लघु जलाशयांमध्ये अल्पसा जलसाठा शिल्लक आहे. पाणीटंचाईसदृश परिस्थिती असतानाच तापमानही ४० अंश सेल्सिअसच्या जवळपास पोहोचले आहे.सद्यस्थितीत शहरात आठ दिवसांआड तर ग्रामीण भागातही आठ ते दहा दिवसांआड नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा होत आहे. कमी पावसामुळे यावेळी डिसेंबर महिन्यापासूनच नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने अनेकांनी बोअरवेल केल्या. अद्यापही शहरासह लगतच्या ग्रामीण दररोज बोअरवेल केल्या जात आहेत. वर्धा शहर आणि ग्रामीण भागाला येळाकेळी येथील नदीवरून पाणीपुरवठा होतो.या पात्रातही सद्यस्थितीत ठणठणाट आहे. आठ-आठ दिवसांआड नळाद्वारे पाणी येत असल्याने नागरिकांची रखरखत्या उन्हात भटकंती होत असल्याचे ग्रामीण भागातील चित्र आहे. अनेक ठिकाणी हॅण्डपंप आहेत, मात्र भूजल पातळी खालावल्याने त्यातूनही पाणी येणे बंद झाले आहे. मार्च महिन्यातच ही स्थिती असल्याने एप्रिल, मे महिन्यात नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, हे खरे.नगरपालिका, जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजनांचा अभावजल है तो कल है, पाण्याची बचत काळाची गरज, पाच्याचा जपून वापरण्याविषयी नगरपालिका व जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना उपदेशाचे डोज पाजले जात आहेत. मात्र, जुने जलस्रोत जिवंत करण्याबाबत प्रशासनाकडून कुठलेही नियोजन करण्यात आले नाही, ही वस्तुस्थिती नाकारयता येणार नाही. कडक उन्हाळ्याचे आणखी दोन महिने शिल्लक आहेत. मार्चच्या अखेरीसच ही परिस्थिती असल्याने नागरिकांना यावेळी प्रथमच भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

जलाशयांमध्येही अल्प जलसाठायंदा जिल्ह्यात अल्प पर्जन्यमान झाले. यामुळे जिल्ह्यातील लघु आणि मध्यम जलाशयांमध्येही अल्प जलसाठा शिल्लक आहे. पवनार येथील धामनदीपात्रातील पाणीपुरवठा योजनेचा फुटव्हॉल्व्ह वर्ध्याच्या इतिहासात प्रथम उघडा पडला आहे. यामुळे शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना उन्हासोबतच पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. भूजलपातळी खालावल्याने बोअरवेलदेखील कित्येक फूट खोल केल्यानंतर पाणी लागत आहे. अनेक हातपंप कोरडे झाल्याने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.