शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी कोरड्या दुष्काळाचे सावट गडद

By admin | Updated: July 1, 2014 23:37 IST

रोहिणी बरसला नाही, मृग कोरडा गेला, आर्द्राही कोरडाच जाणार असल्याची चिन्हे आहेत. येत्या ६ जुलैपासून पुनर्वसू नक्षत्र गाढवाचे वाहन घेवून येत आहे. सुरुवातीचे तीनही नक्षत्र कोरडे गेल्याने

देवाला साकडे : शेतकऱ्यांचे आकाशाकडे डोळेविजय माहुरे - घोराडरोहिणी बरसला नाही, मृग कोरडा गेला, आर्द्राही कोरडाच जाणार असल्याची चिन्हे आहेत. येत्या ६ जुलैपासून पुनर्वसू नक्षत्र गाढवाचे वाहन घेवून येत आहे. सुरुवातीचे तीनही नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांचा हंगाम वाया गेल्यात जमा आहे. शेतकऱ्यांकरिता महत्त्वाचे असलेल्या दोनही नक्षत्रात पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यात कोरडा दुष्काळ येण्याची शक्यता बळावली आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. या पावसाकरिता शेतकरी आता वरून राजाला साकडे घालत आहेत. आषाढी एकादशी काही दिवसावर आल्याने शेतकरी पांडुरंगाला साकडे घालत आहे. घोराड येथील संत केजाजी महाराजांच्या मंदिरात रोज सायंकाळी पावसाकरिता शेतकरी धाव घेत आहेत. रोहिणीत पाऊस नाही. मृगाची आशा फोल ठरली, आर्द्रात ओलाव्याचा पत्ता नाही. अशा स्थितीत अवकाळी आलेला पाऊस पाहता पावसाळा चांगला असेल अशी भाबडी आशा आता फोल ठरत आहे़ अवघ्या पाच दिवसावर पुनर्वसू नक्षत्राला प्रारंभ होत आहे़ मृग नक्षत्रात १७ जूनला पाऊस आल्याने दुसऱ्या दिवशी काही शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी केली़ तब्बल आठ दिवस उन्हाळ्यासारखी उन्ह तापली अन् आर्द्रा नक्षत्रात पावसाची आशा धुळीस मिळाली. अशात जिल्ह्यात काही भागात आलेला पाऊस शेतकऱ्यांना दुबार पूरणीकडे घेवून गेला. गत आठ दिवसापासून कडक उन्ह तापत असल्याने बियाण्याला फुटलेले अंकूर जमिनीबाहेर येवून कोमजले आहेत. बहुतांश शेतकरी आता मोड करीत आहे़त. गावागावात कुठे धोंडी, तर कुठे मोहल्ला व गाव भोजन, देवाच्या अंगावर पाणी टाकून आंघोळ करणे आदी कार्यक्रम सुरू झाले आहेत. असे असतानाही वरुण राजा प्रसन्न होण्याची चिन्हे नाहीत. पावसाअभावी शेतकऱ्यांचे मन सुन्न आहे़ ओलीताची असलेली कपाशीची रोपटे या उन्हामुळे करपत आहेत. रात्रीचा दिवस करून आटापिटा करणाऱ्या बागायती शेतकऱ्यांपुढे हवालदिल होण्याची वेळ आली आहे़पावसाळ्यात चक्क उन्हाळा तापत असल्याने चिंतेची गडद छाया शेतकऱ्यांवर आहे़ सलग तीन वर्षांपासून शेतकऱ्यांवर अस्माणी संकट येत आहे. आर्थिक दृष्ट्या हतबल बळीराजाला पुन्हा बियाणे घेवून पेरणी करावी लागणार आहे़ यासाठी पैसा कुठून आणावा असा प्रश्न उभा ठाकला आहे़ जून महिना पूर्णत: कोरडा गेला, जुलै महिन्याला प्रारंभ झाला. जून महिन्यात केलेल्या पेरण्या नाममात्र ओलीत क्षेत्रात तग धरून आहे. एकंदरीत एक महिन्याचा खरच खरीप हंगाम साथ होईल का? असे एक ना अनेक प्रश्न उभे असून बळीराजाची झोप उडाली आहे़