शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी कोरड्या दुष्काळाचे सावट गडद

By admin | Updated: July 1, 2014 23:37 IST

रोहिणी बरसला नाही, मृग कोरडा गेला, आर्द्राही कोरडाच जाणार असल्याची चिन्हे आहेत. येत्या ६ जुलैपासून पुनर्वसू नक्षत्र गाढवाचे वाहन घेवून येत आहे. सुरुवातीचे तीनही नक्षत्र कोरडे गेल्याने

देवाला साकडे : शेतकऱ्यांचे आकाशाकडे डोळेविजय माहुरे - घोराडरोहिणी बरसला नाही, मृग कोरडा गेला, आर्द्राही कोरडाच जाणार असल्याची चिन्हे आहेत. येत्या ६ जुलैपासून पुनर्वसू नक्षत्र गाढवाचे वाहन घेवून येत आहे. सुरुवातीचे तीनही नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांचा हंगाम वाया गेल्यात जमा आहे. शेतकऱ्यांकरिता महत्त्वाचे असलेल्या दोनही नक्षत्रात पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यात कोरडा दुष्काळ येण्याची शक्यता बळावली आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. या पावसाकरिता शेतकरी आता वरून राजाला साकडे घालत आहेत. आषाढी एकादशी काही दिवसावर आल्याने शेतकरी पांडुरंगाला साकडे घालत आहे. घोराड येथील संत केजाजी महाराजांच्या मंदिरात रोज सायंकाळी पावसाकरिता शेतकरी धाव घेत आहेत. रोहिणीत पाऊस नाही. मृगाची आशा फोल ठरली, आर्द्रात ओलाव्याचा पत्ता नाही. अशा स्थितीत अवकाळी आलेला पाऊस पाहता पावसाळा चांगला असेल अशी भाबडी आशा आता फोल ठरत आहे़ अवघ्या पाच दिवसावर पुनर्वसू नक्षत्राला प्रारंभ होत आहे़ मृग नक्षत्रात १७ जूनला पाऊस आल्याने दुसऱ्या दिवशी काही शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी केली़ तब्बल आठ दिवस उन्हाळ्यासारखी उन्ह तापली अन् आर्द्रा नक्षत्रात पावसाची आशा धुळीस मिळाली. अशात जिल्ह्यात काही भागात आलेला पाऊस शेतकऱ्यांना दुबार पूरणीकडे घेवून गेला. गत आठ दिवसापासून कडक उन्ह तापत असल्याने बियाण्याला फुटलेले अंकूर जमिनीबाहेर येवून कोमजले आहेत. बहुतांश शेतकरी आता मोड करीत आहे़त. गावागावात कुठे धोंडी, तर कुठे मोहल्ला व गाव भोजन, देवाच्या अंगावर पाणी टाकून आंघोळ करणे आदी कार्यक्रम सुरू झाले आहेत. असे असतानाही वरुण राजा प्रसन्न होण्याची चिन्हे नाहीत. पावसाअभावी शेतकऱ्यांचे मन सुन्न आहे़ ओलीताची असलेली कपाशीची रोपटे या उन्हामुळे करपत आहेत. रात्रीचा दिवस करून आटापिटा करणाऱ्या बागायती शेतकऱ्यांपुढे हवालदिल होण्याची वेळ आली आहे़पावसाळ्यात चक्क उन्हाळा तापत असल्याने चिंतेची गडद छाया शेतकऱ्यांवर आहे़ सलग तीन वर्षांपासून शेतकऱ्यांवर अस्माणी संकट येत आहे. आर्थिक दृष्ट्या हतबल बळीराजाला पुन्हा बियाणे घेवून पेरणी करावी लागणार आहे़ यासाठी पैसा कुठून आणावा असा प्रश्न उभा ठाकला आहे़ जून महिना पूर्णत: कोरडा गेला, जुलै महिन्याला प्रारंभ झाला. जून महिन्यात केलेल्या पेरण्या नाममात्र ओलीत क्षेत्रात तग धरून आहे. एकंदरीत एक महिन्याचा खरच खरीप हंगाम साथ होईल का? असे एक ना अनेक प्रश्न उभे असून बळीराजाची झोप उडाली आहे़