शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
3
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
4
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
5
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
6
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
8
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
9
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
10
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
11
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य
12
धक्कादायक! 'पंचायत' फेम आसिफ खानला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "एका क्षणात सगळं बदललं..."
13
एक कोटी रुपये कमाई, तरीही तो दु:खी, सोशल मीडियावर मांडली व्यथा, म्हणाला, पैसा आहे पण...   
14
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
15
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
16
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
17
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
18
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
19
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
20
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं

पावसाअभावी कोरड्या दुष्काळाचे सावट गडद

By admin | Updated: July 1, 2014 23:37 IST

रोहिणी बरसला नाही, मृग कोरडा गेला, आर्द्राही कोरडाच जाणार असल्याची चिन्हे आहेत. येत्या ६ जुलैपासून पुनर्वसू नक्षत्र गाढवाचे वाहन घेवून येत आहे. सुरुवातीचे तीनही नक्षत्र कोरडे गेल्याने

देवाला साकडे : शेतकऱ्यांचे आकाशाकडे डोळेविजय माहुरे - घोराडरोहिणी बरसला नाही, मृग कोरडा गेला, आर्द्राही कोरडाच जाणार असल्याची चिन्हे आहेत. येत्या ६ जुलैपासून पुनर्वसू नक्षत्र गाढवाचे वाहन घेवून येत आहे. सुरुवातीचे तीनही नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांचा हंगाम वाया गेल्यात जमा आहे. शेतकऱ्यांकरिता महत्त्वाचे असलेल्या दोनही नक्षत्रात पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यात कोरडा दुष्काळ येण्याची शक्यता बळावली आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. या पावसाकरिता शेतकरी आता वरून राजाला साकडे घालत आहेत. आषाढी एकादशी काही दिवसावर आल्याने शेतकरी पांडुरंगाला साकडे घालत आहे. घोराड येथील संत केजाजी महाराजांच्या मंदिरात रोज सायंकाळी पावसाकरिता शेतकरी धाव घेत आहेत. रोहिणीत पाऊस नाही. मृगाची आशा फोल ठरली, आर्द्रात ओलाव्याचा पत्ता नाही. अशा स्थितीत अवकाळी आलेला पाऊस पाहता पावसाळा चांगला असेल अशी भाबडी आशा आता फोल ठरत आहे़ अवघ्या पाच दिवसावर पुनर्वसू नक्षत्राला प्रारंभ होत आहे़ मृग नक्षत्रात १७ जूनला पाऊस आल्याने दुसऱ्या दिवशी काही शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी केली़ तब्बल आठ दिवस उन्हाळ्यासारखी उन्ह तापली अन् आर्द्रा नक्षत्रात पावसाची आशा धुळीस मिळाली. अशात जिल्ह्यात काही भागात आलेला पाऊस शेतकऱ्यांना दुबार पूरणीकडे घेवून गेला. गत आठ दिवसापासून कडक उन्ह तापत असल्याने बियाण्याला फुटलेले अंकूर जमिनीबाहेर येवून कोमजले आहेत. बहुतांश शेतकरी आता मोड करीत आहे़त. गावागावात कुठे धोंडी, तर कुठे मोहल्ला व गाव भोजन, देवाच्या अंगावर पाणी टाकून आंघोळ करणे आदी कार्यक्रम सुरू झाले आहेत. असे असतानाही वरुण राजा प्रसन्न होण्याची चिन्हे नाहीत. पावसाअभावी शेतकऱ्यांचे मन सुन्न आहे़ ओलीताची असलेली कपाशीची रोपटे या उन्हामुळे करपत आहेत. रात्रीचा दिवस करून आटापिटा करणाऱ्या बागायती शेतकऱ्यांपुढे हवालदिल होण्याची वेळ आली आहे़पावसाळ्यात चक्क उन्हाळा तापत असल्याने चिंतेची गडद छाया शेतकऱ्यांवर आहे़ सलग तीन वर्षांपासून शेतकऱ्यांवर अस्माणी संकट येत आहे. आर्थिक दृष्ट्या हतबल बळीराजाला पुन्हा बियाणे घेवून पेरणी करावी लागणार आहे़ यासाठी पैसा कुठून आणावा असा प्रश्न उभा ठाकला आहे़ जून महिना पूर्णत: कोरडा गेला, जुलै महिन्याला प्रारंभ झाला. जून महिन्यात केलेल्या पेरण्या नाममात्र ओलीत क्षेत्रात तग धरून आहे. एकंदरीत एक महिन्याचा खरच खरीप हंगाम साथ होईल का? असे एक ना अनेक प्रश्न उभे असून बळीराजाची झोप उडाली आहे़