शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

१०० रुपयांत ड्रमभर पाणी

By admin | Updated: April 4, 2015 02:07 IST

तालुक्यातील मोई गावात पाणी टंचाईने भीषण रूप धारण केले आहे. गावातील नागरिकांना पाण्याची गरज भागविण्याकरिता १००

मोई येथे पाणी पेटले : पाण्याकरिता पाच किलोमीटरची पायपीटअमोल सोटे ल्ल आष्टी (शहीद)तालुक्यातील मोई गावात पाणी टंचाईने भीषण रूप धारण केले आहे. गावातील नागरिकांना पाण्याची गरज भागविण्याकरिता १०० रुपयांत ड्रमभर पाणी घेण्याची वेळ आली आहे. पाणी नसल्यास कधी या ड्रमची किंमत २०० रुपयांवर पोहोचत आहे. याची माहिती जिल्हा प्रशासनाला असूनही त्यांच्याकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. १ हजार २०० लोकसंख्या असलेल्या या गावात नागरिकांना पाण्याकरिता पाच किमी पायपीट करावी लागत असल्याचे विदारक वास्तव आहे.उन्हाळा सुरू होऊन दोन महिने पूर्ण झाले. दिवसेंदिवस पारा चढत आहे. वाढत्या तापमानामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खोल जात आहे. मोई या गावात तीव्र पाणीटंचाई आहे. गावातील विहिरी कोरड्या पडल्या. त्यांचा तळ दिसू लागला आहे. हातपंपाला पाणी नाही. डोंगरमाथ्यावर वसलेल्या व बंजारा समाजाचे मोठ्या संख्येने वास्तव्य असलेल्या गावात पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती सुरू आहे. याकडे कोणी लक्ष देईल काय, असा संतप्त प्रश्न गावकऱ्यांनी प्रशासनाला केला आहे. येथील सरपंच अंकुश चव्हाण, ग्रामसेवक अश्विन वानखेडे यांनी पंचायत समिती व तहसीलदार यांना वारंवार माहिती दिली; मात्र प्रशासन टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन देवून बोळवण करीत आहे. रेड झोनमध्ये असलेल्या या गावात चारही बाजूने डोंगर आहे. उंच टेकड्या आहे. गरम वाऱ्याचा मारा गावापर्यंत येवून पोहचला आहे. गावात बंडीवर ड्रम बांधून दुरवरून पाणी आणावे लागत आहे. जनावरांसाठी चारा नाही. त्यामुळे सकाळपासून चारा आणि पाणी या दोन्हींसाठी गावकऱ्यांना पायपीट करावी लागत आहे. उन्हाळ्यात तीन महिने टँकर लावण्याची जबाबदारी शासनाची होती; मात्र तहसीलदार व पंचायत समितीचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.गावातील बंडीवरून आणलेले पाणी प्रती ड्रम १०० रुपये विकल्या जात आहे. इतके महागडे पाणी गावकऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे गावकरी अडचणीत सापडले आहे. येथे राष्ट्रीय पेयजल योजना जलस्वराज्य प्रकल्प अंतर्गत गावात पाणी आणण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला; परंतु गावात पाणी आले नाही. शासनाने तात्काळ टँकर लावून पाणी समस्या मार्गी लावावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.जिल्ह्यात जाणवणार असलेल्या पाणी टंचाईवर मात करण्याकरिता आराखडा तयार करण्यात आला आहे. यात खासगी विहिरींचे अधिग्रहण व टँकर पुरविण्याचाही यात समावेश करण्यात आला आहे. या गावात टँकर सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला मागणी करण्यात आली आहे. असे असताना केवळ वरिष्ठांना कल्पना देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्याकडून टँकर सुरू करण्याची परवानगी नसल्याचे सांगण्यात आले आहे. याचा त्रास मात्र गावाकऱ्यांना सहन करावा लागत आहे. मोई गावातील पाणीटंचाईबाबत जिल्हा स्तरावर माहिती पाठविण्यात आली आहे. मंजुरी आल्यावर टँकर सुरू करू. सदर बाब प्रशासनाच्या विचाराधीन आहे.- आर.एस. हिरणवार, अतिरिक्त तहसीलदार, आष्टी (शहीद)