शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

१०० रुपयांत ड्रमभर पाणी

By admin | Updated: April 4, 2015 02:07 IST

तालुक्यातील मोई गावात पाणी टंचाईने भीषण रूप धारण केले आहे. गावातील नागरिकांना पाण्याची गरज भागविण्याकरिता १००

मोई येथे पाणी पेटले : पाण्याकरिता पाच किलोमीटरची पायपीटअमोल सोटे ल्ल आष्टी (शहीद)तालुक्यातील मोई गावात पाणी टंचाईने भीषण रूप धारण केले आहे. गावातील नागरिकांना पाण्याची गरज भागविण्याकरिता १०० रुपयांत ड्रमभर पाणी घेण्याची वेळ आली आहे. पाणी नसल्यास कधी या ड्रमची किंमत २०० रुपयांवर पोहोचत आहे. याची माहिती जिल्हा प्रशासनाला असूनही त्यांच्याकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. १ हजार २०० लोकसंख्या असलेल्या या गावात नागरिकांना पाण्याकरिता पाच किमी पायपीट करावी लागत असल्याचे विदारक वास्तव आहे.उन्हाळा सुरू होऊन दोन महिने पूर्ण झाले. दिवसेंदिवस पारा चढत आहे. वाढत्या तापमानामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खोल जात आहे. मोई या गावात तीव्र पाणीटंचाई आहे. गावातील विहिरी कोरड्या पडल्या. त्यांचा तळ दिसू लागला आहे. हातपंपाला पाणी नाही. डोंगरमाथ्यावर वसलेल्या व बंजारा समाजाचे मोठ्या संख्येने वास्तव्य असलेल्या गावात पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती सुरू आहे. याकडे कोणी लक्ष देईल काय, असा संतप्त प्रश्न गावकऱ्यांनी प्रशासनाला केला आहे. येथील सरपंच अंकुश चव्हाण, ग्रामसेवक अश्विन वानखेडे यांनी पंचायत समिती व तहसीलदार यांना वारंवार माहिती दिली; मात्र प्रशासन टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन देवून बोळवण करीत आहे. रेड झोनमध्ये असलेल्या या गावात चारही बाजूने डोंगर आहे. उंच टेकड्या आहे. गरम वाऱ्याचा मारा गावापर्यंत येवून पोहचला आहे. गावात बंडीवर ड्रम बांधून दुरवरून पाणी आणावे लागत आहे. जनावरांसाठी चारा नाही. त्यामुळे सकाळपासून चारा आणि पाणी या दोन्हींसाठी गावकऱ्यांना पायपीट करावी लागत आहे. उन्हाळ्यात तीन महिने टँकर लावण्याची जबाबदारी शासनाची होती; मात्र तहसीलदार व पंचायत समितीचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.गावातील बंडीवरून आणलेले पाणी प्रती ड्रम १०० रुपये विकल्या जात आहे. इतके महागडे पाणी गावकऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे गावकरी अडचणीत सापडले आहे. येथे राष्ट्रीय पेयजल योजना जलस्वराज्य प्रकल्प अंतर्गत गावात पाणी आणण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला; परंतु गावात पाणी आले नाही. शासनाने तात्काळ टँकर लावून पाणी समस्या मार्गी लावावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.जिल्ह्यात जाणवणार असलेल्या पाणी टंचाईवर मात करण्याकरिता आराखडा तयार करण्यात आला आहे. यात खासगी विहिरींचे अधिग्रहण व टँकर पुरविण्याचाही यात समावेश करण्यात आला आहे. या गावात टँकर सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला मागणी करण्यात आली आहे. असे असताना केवळ वरिष्ठांना कल्पना देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्याकडून टँकर सुरू करण्याची परवानगी नसल्याचे सांगण्यात आले आहे. याचा त्रास मात्र गावाकऱ्यांना सहन करावा लागत आहे. मोई गावातील पाणीटंचाईबाबत जिल्हा स्तरावर माहिती पाठविण्यात आली आहे. मंजुरी आल्यावर टँकर सुरू करू. सदर बाब प्रशासनाच्या विचाराधीन आहे.- आर.एस. हिरणवार, अतिरिक्त तहसीलदार, आष्टी (शहीद)