शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती

By admin | Updated: November 27, 2014 23:38 IST

गत तीन वर्षांपासून आर्वी तालुक्यात सुरू असलेल्या नापिकी, जंगली जनावरांचा वाढलेला हैदोस या पार्श्वभूमीवर आर्वी तालुक्यातील शेतकरी पुरता आर्थिक कोंडीत सापडला आहे़ तालुक्यात असलेल्या

गावसंख्येत वाढ होणार : अंतिम पैसेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्षसुरेंद्र डाफ - आर्वीगत तीन वर्षांपासून आर्वी तालुक्यात सुरू असलेल्या नापिकी, जंगली जनावरांचा वाढलेला हैदोस या पार्श्वभूमीवर आर्वी तालुक्यातील शेतकरी पुरता आर्थिक कोंडीत सापडला आहे़ तालुक्यात असलेल्या सहा महसूल मंडळातील १७२ गावांची पैसेवारी ५० च्या आत आहे. कपाशीचा वेचा अद्याप पुरेशा झाला नसल्याने दोन किंवा तीन कपाशी वेचे झाल्यावर या पिकाची अंतिम पैसेवारी जाहीर होणार असल्याचे महसूल विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. सध्या सोयाबीनच्या शेताची आणेवारी जाहीर झाली आहे़ तर कपाशी पीक उशिरा निघत असल्याने या पिकाची अंतीम पैसेवारी १५ जानेवारीनंतर जाहीर होणार आहे़ यात ५० पैसे पैसेवारीच्या गावासंख्येत वाढ होणार असल्याचे महसूल विभागाच्यावतीने सांगण्यात आले़ याचा लाभ या भागातील शेतकऱ्यांना होणार असल्याचेही बोलले जात आहे. आर्वी तालुक्यात आर्वी, वाठोडा, रोहणा, विरूळ, खरांगणा, वाढोणा ही सहा महसूल मंडळे येतात. आर्वी तालुक्यातील १७२ गावांची पैसेवारी ५० च्या आत तर ३६ गावांची ५० पेक्षा अधिक दाखविली आहे. सध्या कापसाचा हंगाम सुरू असून कपाशी पिकाचे दोन ते तीन वेचे झाल्यावरच त्याची पैसेवारी ठरविल्या जाईल. त्यामुळे अंतिम आणेवारीसाठी १५ जानेवारी पर्यंत मुदत आहे़ तालुक्यातील आर्वी-३४, वाठोडा-३६, रोहणा-नऊ, विरूळ-३६, खरांगणा-२६, वाढोणा ३६ आदी १७२ गावांचा यात समावेश आहे़ गत तीन वर्षांपासून आर्वी तालुक्यात नापिकी, दुष्काळ व जंगली जनावरांनी हैदोस घातल्याने शेतकरी तिहेरी संकटात सापडला आहे़ येत्या हिवाळी अधिवेशनात या नापिकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कुठल्या सवलती दिल्या जाते, हे पाहण्यासारखे ठरणार आहे़ आर्वी तालुक्यातील जंगली श्वापदांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पीक नष्ट झाले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यासाठी हा गंभीर प्रश्न झाला आहे़ याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.