शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

यंदाच्या खरिपात ओलितापेक्षा कोरडवाहू शेती ठरली फायद्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 21:56 IST

यंदाचा खरीप प्रारंभीपासूनच शेतकऱ्यांकरिता नुकसानीचा ठरला आहे. पावसाची प्रतीक्षा, बोगस बियाने यातून बचावलेला कापूस उत्पादक बोंडअळीच्या संकटात अडकला. हे संकट ओलितावर अधिक दिसून आल्याने कोरडवाहू शेतकरी यातून बचावल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देकपाशीच्या उत्पादनात तूट : किडीचे प्रमाण ओलितावरच अधिक; सोयाबीनचीही तिच स्थिती; तुरही सुकण्याच्या मार्गावर

किशोर तेलंग।लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (टालाटुले) : यंदाचा खरीप प्रारंभीपासूनच शेतकऱ्यांकरिता नुकसानीचा ठरला आहे. पावसाची प्रतीक्षा, बोगस बियाने यातून बचावलेला कापूस उत्पादक बोंडअळीच्या संकटात अडकला. हे संकट ओलितावर अधिक दिसून आल्याने कोरडवाहू शेतकरी यातून बचावल्याचे दिसत आहे. कपाशीचे जेही उत्पादन झाले ते कोरडवाहू क्षेत्रातीलच असल्याचे दिसते.जिल्ह्यात यंदाच्या हंगामात २ लाख ८० हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. बºयाच शेतकऱ्यांनी उत्तम उत्पादनाकरिता ओलीत करण्याचे नियोजन केले. हेच ओलित शेतकऱ्यांकरिता आता नुकसानीचे ठरत असल्याचे दिसून आले आहे. बीटी कपाशीवर कीड येत नसल्याचे अनेक कंपन्यांनी सांगितले. पण त्यांचा हा दावा यंदा फोल ठरला. बिटीच्या बियाण्यांवर बोंड आणि गुलाबी अळीने चांगलाच हल्ला केला. या अळीच्या हल्ल्यामुळे शेतकरी चांगलाच हैराण झाला. अळीचा हल्ला ओलिताच्या क्षेत्रात अधिक असल्याचे दिसून आले आहे.जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सुमारे ७० टक्के शेतकऱ्यांनी ओलित करून कपाशीचे पीक घेतले. या शेतकऱ्यांच्या शेतात या किडीने मोठ्या प्रमाणात हैदोस घातल्याचे दिसून आले आहे. कृषी विभागानेही सुमारे ८० टक्के शेतात बोंडअळीचा प्रकोप झाल्यायचे म्हटले आहे. उर्वरीत वीस टक्के शेतकरी कोरडवाहू कापूस घेणारे आहे. कोरडवाहू पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा उत्तम उत्पादन झाल्याचे बोलले जात आहे. कोरडवाहू शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात आतापर्यत कापसाची दोन वेळा वेचणी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र प्रारंभी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तिसऱ्या वेच्याची शक्यता नसल्याचेच चित्र आहे.दरवर्षी या भागात तिजेपर्यंत कापूस चालतो. पण यावर्षी मोठ्या प्रमाणात कपाशीवर कीड आल्याने जानेवारी महिन्यातच उलंगवाडी होण्याचे चित्र आहे. कोरडवाहू शेतातील कापूस निघून डिसेंबर महिन्यातच उलंगवाडी झाली आहे. यामुळे कपाशीचे यंदा अपेक्षेपेक्षा उत्पादन कमी होण्याची चिन्हे आहेत. असे असले तरी बाजारात झालेली आवक गत वर्षीच्या तुलनेत विशेष कमी नसल्याचे दिसून आले आहे. बाजारात कपाशीची झालेली आवक ही पहिल्या वेच्यातलच असावी असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे. येत्या दिवसात यात घट होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आली आहे.ओलितापेक्षा कोरडवाहूची उतारी अधिकसाधारणत: ओलिताची सोय असलेला शेतकरी अधिक उत्पन्न घेत असल्याचे आतापर्यंत दिसून आले. यंदा मात्र हा नियम बदलल्याचे दिसून आले आहे. यंदाच्या खरीपात कोरडवाहू शेतकऱ्याला एकरी आठ क्विंटल तर ओलित असलेल्या शेतकऱ्याला पाच क्विंटलचीच उतारी आली आहे.शेतकरी उधारी फेडण्याच्या विवंचनेतदरवर्षी शेतकरी सावकाराकडून, कृषी केंद्रातून उधारीवर बियाणे, खत, औषध घेवून शेती चालवितो. अशातच या वर्षी मजुराचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्याने काही शेतकऱ्यांनी शहरातून मजूर आणून कापूस वेचला. २० किलो कापूस वेचण्यासाठी २०० रुपये मोजावे लागले. त्यातही प्रारंभी ४,१०० ते ४,५०० रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना कापूस विकावा लागला. यावर्षी बोंडअळीने शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले. त्यामुळे सावकाराकडून घेतलेले कर्ज, कृषी केंद्र चालकाची उधारी कशी द्यावी या विवंचनेत शेतकरी आहे. यामुळे शासनाने योग्य सर्व्हे करून या भागातील बोंडअळीची मदत सरसकट द्यावी अशी मागणी होत आहे.

टॅग्स :cottonकापूस