शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

बॅक वॉटरच्या नुकसानीचे ड्रोनने सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 06:00 IST

या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याकरिता पुनर्वसन विभागाने चार पथक तयार करुन ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने सर्वेक्षण सुरु केले आहे. आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पात १९८२ मध्ये २२ गावातील घरे व शेतजमिनी संपादीत करण्यात आल्या. या प्रकल्प यावर्षीच्या दमदार पावसाने पहिल्यांदा शंभर टक्के भरला.

ठळक मुद्देशेती व घरांच्या नुकसानीची माहिती घेणार : चार पथक तैनात

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : यावर्षीच्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्प पहिल्यांदाच शतप्रशित भरले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे बॅक वॉटर मोठ्या प्रमाणात परिसरातील संपादीत केलेल्या क्षेत्रासह इतरही भागात शिरल्याने शेती व घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याकरिता पुनर्वसन विभागाने चार पथक तयार करुन ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने सर्वेक्षण सुरु केले आहे.आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पात १९८२ मध्ये २२ गावातील घरे व शेतजमिनी संपादीत करण्यात आल्या. या प्रकल्प यावर्षीच्या दमदार पावसाने पहिल्यांदा शंभर टक्के भरला. त्यामुळे प्रकल्पाच्या बॅक वॉटरने परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात कापूस सोयाबीनसह हळद, अद्रक आदी पिकांचाही समावेश आहे.बॅक वॉटरच्या पाण्यामुळे संपादीत क्षेत्रासह इतर भागातील घरे व शेतजमिनीचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या उद्देशाने पुनर्वसन विभागाच्यावतीने तीन दिवसांपासून नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण सुरु केले आहे.प्रकल्पाच्या बॅक वॉटरचे पाणी कुठपर्यंत पसरले तसेच या पाण्यामुळे शेतीचे किती नुकसान झाले याबाबत योग्य माहिती गोळा करण्याकरिता ड्रोन कॅमेºयाच्या सहाय्याने सर्वेक्षण सुरु आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीची योग्य माहिती मिळण्यासाठी मदत होेणार आहे.यासोबतच परिसरातील इतरही शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तर, त्या शेतकऱ्यांनी पुनर्वसन कार्यालयाकडे रितसर तक्रार करावी, त्या तक्रारीची तत्काळ दखल घेऊन सर्वेक्षण केले जाईल असे आवाहन विभागाने केले आहे. या सर्वेक्षणाकरिता पुनर्वसन विभागाचे उपविभागीय अभियंता वºहाडे, पांढरे व डांगे प्रयत्नशील आहे.विभागाचा पारदर्शक सर्वेक्षणासाठी प्रयत्ननिम्न वर्धा प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी तसेच सर्वेक्षणात पारदर्शकता आणण्यासाठी ड्रोन कॅमेºयाच्या सहाय्याने मदत घेणे सुरू आहे. सर्वेक्षणानंतर जर शेतकरी आरोप-प्रत्यारोप करत असतील तर त्यांना ड्रोन कॅमेºयाच्या सहाय्याने सर्वेक्षण केल्याची सीडी दाखविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे भविष्यात लोअर वर्धा प्रकल्प १०० टक्के भरल्यास पाणी कुठपर्यंत पसरणार तसेच किती शेतकऱ्यांचे नुकसान होईल, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची जमीन संपादीत आहे किंवा नाही, बॅक वॉटरमुळे किती नुकसान झाले, याबाबतची अचूक माहिती मिळणार आहे. त्यामुळे कुठल्याही शेतकºयावर अन्याय होणार नाही.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प