शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
5
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
6
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकड्यांचा फज्जा
7
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
8
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
9
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
10
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
11
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
12
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
13
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
14
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
15
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
16
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
17
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
18
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
19
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
20
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट

बॅक वॉटरच्या नुकसानीचे ड्रोनने सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 06:00 IST

या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याकरिता पुनर्वसन विभागाने चार पथक तयार करुन ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने सर्वेक्षण सुरु केले आहे. आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पात १९८२ मध्ये २२ गावातील घरे व शेतजमिनी संपादीत करण्यात आल्या. या प्रकल्प यावर्षीच्या दमदार पावसाने पहिल्यांदा शंभर टक्के भरला.

ठळक मुद्देशेती व घरांच्या नुकसानीची माहिती घेणार : चार पथक तैनात

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : यावर्षीच्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्प पहिल्यांदाच शतप्रशित भरले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे बॅक वॉटर मोठ्या प्रमाणात परिसरातील संपादीत केलेल्या क्षेत्रासह इतरही भागात शिरल्याने शेती व घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याकरिता पुनर्वसन विभागाने चार पथक तयार करुन ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने सर्वेक्षण सुरु केले आहे.आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पात १९८२ मध्ये २२ गावातील घरे व शेतजमिनी संपादीत करण्यात आल्या. या प्रकल्प यावर्षीच्या दमदार पावसाने पहिल्यांदा शंभर टक्के भरला. त्यामुळे प्रकल्पाच्या बॅक वॉटरने परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात कापूस सोयाबीनसह हळद, अद्रक आदी पिकांचाही समावेश आहे.बॅक वॉटरच्या पाण्यामुळे संपादीत क्षेत्रासह इतर भागातील घरे व शेतजमिनीचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या उद्देशाने पुनर्वसन विभागाच्यावतीने तीन दिवसांपासून नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण सुरु केले आहे.प्रकल्पाच्या बॅक वॉटरचे पाणी कुठपर्यंत पसरले तसेच या पाण्यामुळे शेतीचे किती नुकसान झाले याबाबत योग्य माहिती गोळा करण्याकरिता ड्रोन कॅमेºयाच्या सहाय्याने सर्वेक्षण सुरु आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीची योग्य माहिती मिळण्यासाठी मदत होेणार आहे.यासोबतच परिसरातील इतरही शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तर, त्या शेतकऱ्यांनी पुनर्वसन कार्यालयाकडे रितसर तक्रार करावी, त्या तक्रारीची तत्काळ दखल घेऊन सर्वेक्षण केले जाईल असे आवाहन विभागाने केले आहे. या सर्वेक्षणाकरिता पुनर्वसन विभागाचे उपविभागीय अभियंता वºहाडे, पांढरे व डांगे प्रयत्नशील आहे.विभागाचा पारदर्शक सर्वेक्षणासाठी प्रयत्ननिम्न वर्धा प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी तसेच सर्वेक्षणात पारदर्शकता आणण्यासाठी ड्रोन कॅमेºयाच्या सहाय्याने मदत घेणे सुरू आहे. सर्वेक्षणानंतर जर शेतकरी आरोप-प्रत्यारोप करत असतील तर त्यांना ड्रोन कॅमेºयाच्या सहाय्याने सर्वेक्षण केल्याची सीडी दाखविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे भविष्यात लोअर वर्धा प्रकल्प १०० टक्के भरल्यास पाणी कुठपर्यंत पसरणार तसेच किती शेतकऱ्यांचे नुकसान होईल, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची जमीन संपादीत आहे किंवा नाही, बॅक वॉटरमुळे किती नुकसान झाले, याबाबतची अचूक माहिती मिळणार आहे. त्यामुळे कुठल्याही शेतकºयावर अन्याय होणार नाही.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प