शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पाणी बचतीचे महत्त्व प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 22:28 IST

पाणी बचत ही काळाची गरज आहे. भावी पिढीला समृद्ध करण्यास्तव आजपासून पाणी बचतीचे महत्त्व प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.

ठळक मुद्देशैलेश नवाल : जलजागृती सप्ताहास प्रारंभ

आॅनलाईन लोकमतवर्धा : पाणी बचत ही काळाची गरज आहे. भावी पिढीला समृद्ध करण्यास्तव आजपासून पाणी बचतीचे महत्त्व प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर व निम्न वर्धा प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ते २२ मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नागपूर पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत गवळी तर अतिथी म्हणून निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे, निम्न वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता दि.घ. बारापात्रे, वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्यामसुंदर काळे, कार्यकारी अभियंता सूर्यवंशी, बजाज अभियांत्रिकी महा.चे प्राचार्य कान्हे, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी पूढे म्हणाले की, महात्मा गांधींचे स्वप्न होते, ‘गावाकडे चला’. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खेडी समृद्ध झाली तर नागरिक समृद्ध होतील. यामुळे शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी त्यांच्या शेतीला सिंचन सुविधा देणे महत्त्वाचे आहे. सिंचनासाठी पाणी बचतीचे महत्त्व पटवून काटकसर करणे तेवढेच गरजेचे आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नाला खोलीकरणाची अधिकाधिक कामे घेण्यात येत आहे. यामुळे शेतकºयांना अधिक प्रमाणात सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.पाणी वापर सहकारी संस्थांनी केवळ संस्था नोंदणी न करता शेतकºयांना पाणी बचतीचे महत्त्व पटवून देण्याचे कार्य करावे. शेतकºयांनी नगदी पिकांची शेती करावी. नागरिकांनी सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाणी वापरण्यासाठी नियोजन करणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील सिंचनाखालील क्षेत्र वाढविण्याची गरज असल्याचे मत जयंत गवळी यांनी व्यक्त केले. सुक्ष्मसिंचन योजनेसाठी शेतकºयांना अनुदानावर शेती साहित्य देण्यात येणार आहे. यासाठी शेतकºयांनी सुक्ष्मसिंचन शेती करावी, असे आवाहनही गवळी यांनी केले.केवळ दिन वा सप्ताह साजरा करून चालणार नाही तर कृती करणे गरजेचे आहे. पाण्याचे संवर्धन करणे, ही काळाची गरज आहे. पाणी बचत ही चळवळ व्हावी. पाणी बचतीसाठी शोषखड्ड्यांची पुरातन कल्पना आज नागरिकांनी अंमलात आणण्याची गरज आहे, असे बेलखोडे यांनी सांगितले. याप्रसंगी कान्हे, पाटील यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला उपविभागीय अभियंता विश्वजित लुथडे यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.