शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
2
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
3
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
4
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
5
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
6
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
8
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
9
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
10
'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजींच्या भूमिकेत कोण दिसणार? सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, "आम्हाला..."
11
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
12
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
13
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
14
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
15
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
16
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
17
Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश
18
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
19
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
20
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा

अनुदानाअभावी पेयजल योजना रखडली

By admin | Updated: June 14, 2014 01:19 IST

गावातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे याकरिता शासमाकडून राष्ट्रीय पेयजल योजना राबविण्यात येत आहे.

वर्धा : गावातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे याकरिता शासमाकडून राष्ट्रीय पेयजल योजना राबविण्यात येत आहे. परंतु ही योजना कार्यान्वित करण्याकरिता गावातील नागरिकांकडे ९० टक्के शौचालय असण्याची अट आहे. शासनाचे उदासीन धोरण व विलंबाने मिळणाऱ्या अनुदानामुळे ही योजना रखडली असल्याची स्थिती जिल्ह्यातील काही गावात निर्माण झाली आहे. देवळी तालुक्यातील गौळ येथे राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत काम करण्यात येत आहे. यातील जलकुभांचे काम पूर्ण झाले आहे. सध्या गावात पाईपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. येथील बहुतांश नागरिकांकडे स्वतंत्र शौचालय नाही. या योजनेअंतर्गत नागरिकांना शौचालय बांधकामाकरिता दहा हजार रुपयाचे अनुदान दिले जाते. परंतु काही शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले असतानाही अनुदान प्राप्त झाले नाही. शौचालयाची संख्या कमी असल्यामुळे उघड्यावर शौचास जाणाऱ्या कुटुंबाची संख्या पाहता याचा लाभ मिळण्यात व्यत्यय येत आहे. सार्वजनिक शौचालय नसल्याने महिलांची कुचंबणा होत आहे. अतिक्रमणधारकांना शौचालयाकरिता दिलेली जागा बळकावली असल्याचा आरोप ग्रामस्थातून होत आहे, याकरिता कारवाई गरजेची झाली आहे. परिणामी ग्रामपंचायत प्रशासनाला अनुदान मिळत नाही. गावात अतिक्रमणधारक कुटुंबाची संख्या ६१ आहे. गावात ४५१ कुटुुंबे असून ३१९ कुटुंबांकडे शौचालय नाही. केवळ ७१ कुटुंबांकडे शौचालय आहेत. अतिक्रमण केलेल्या ६१ कुटुंबाना शौचालयाचे बांधकाम करण्याकरिता अनुदान मिळणार नसल्यामुळे ही कुटुंबे शौचालयापासून वंचित राहणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय पेयजल योजनेचे ९० टक्के उद्दिष्ट पूर्ण होणार नाही. ६० लाख रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेल्या योजनेचा बोजवारा वाजू नये याकरिता शासनाने अतिक्रमण केलेल्या कुटुंबासाठी सार्वजनिक शौचालय बांधून देण्याची मागणी पुढे येत आहे. शासनाकडून मिळणाऱ्या दहा हजार रुपयांमध्ये शौचालय उभारणे शक्य नाही. शौचालय बांधण्याकरिता ५० ते ६० हजार रुपये खर्च येतो. यापूर्वी ५०० रुपये अनुदानावर नागरिकांनी सरसकट शौचालय उभारले, परंतु त्यापैकी आज एकही शौचालय सुस्थितीत नाही. शासनाने या अनुदानात वाढ करुन ३० हजार रुपये करावे, अशी मागणी आहे. गरीब कुटुंबाकरिता पुरुष व महिलांचे वेगळे सार्वजनिक स्वच्छतागृह उभारावे. त्यामुळे ही योजना मार्गी लागून योजनेअंतर्गत नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत अनुदानात वाढ करावी, अशी मागणी होत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)