शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

वणा नदीला घाणीचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 23:50 IST

गाव शहरातून नदीत मिळणारे दूषित पाणी, त्यात येत असलेला कचरा व रेती माफियांकडून नदीपात्रात झालेले खड्डे आणि पात्रात वाढलेली जलपर्णी यामुळे नदीचे स्वास्थ धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देहिंगणघाटची जीवनदायिनी दूषित होण्याच्या मार्गावर

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : गाव शहरातून नदीत मिळणारे दूषित पाणी, त्यात येत असलेला कचरा व रेती माफियांकडून नदीपात्रात झालेले खड्डे आणि पात्रात वाढलेली जलपर्णी यामुळे नदीचे स्वास्थ धोक्यात आले आहे. अशीच अवस्था हिंगणघाट येथील वणा नदीची झाली आहे. या नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात कचरा दिसत आहे. शिवाय या कचऱ्यामुळे नदीचे पाणीही दूषित झाल्याचे दिसत आहे. यामुळे शासनाने नदी स्वच्छता अभियान राबविण्याची मागणी होत आहे.हिंगणघाट तालुक्याची जीवनदायीन असलेल्या या वणा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढल्याचे दिसत आहे. पाण्यात शहरातून येत असलेल्या नाल्याचे दूषित पाणी येत असल्याने त्याची दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नदीपात्राकडे गेल्यास येणाºया दुर्गंधीमुळे ही नदी की विस्तारीत झालेला नाला याचा अंदाज घेणे कठीण होते. यामुळे हिंगणघाट प्रशासनाने या नदीची स्वच्छता करण्याची गरज आहे. वर्धेत मध्यंतरी नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने नदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच अभियाने येथे राबवून वणा नदी स्वच्छ करण्याची गरज आहे. या संदर्भात जिल्हाधिकाºयांनी लक्ष देत येथे कार्यवाही करण्याची गरज निर्माण झाली आहे.रेती माफियांमुळे पात्रात खड्डेजिल्ह्यात अवैध रेती उपसा जोरात सुरू आहे. याला जिल्हा प्रशासनाकडून मोठे पाठबळ मिळत असल्याचे अनेकवार समोर आले आहे. याच रेती माफियांकडून रेती उपस्याकरिता येथे खड्डे करण्यात आले आहे. या खड्ड्यात आता पाणी साचून राहत असून त्यात अडलेल्या कचऱ्यांमुळे दुर्गंधी पसरत आहे. अशाच खड्ड्यात बुडून गत दोन वर्षांपूर्वी दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना आहे. यामुळे नदी पात्रात पडलेले खड्डे धोक्याचे ठरत आहे. याच नदीत नाही तर वर्धा जिल्ह्यातील अनेक नदीत असे खड्डे पडले आहेत. ते बुजविण्याकरिता काही उपाययोजना आखण्याची गरज आहे. शिवाय हिंगणघाट शहरातील सामाजिक संघटनांनीही एकत्र येत आपल्या शहरातील नदीपात्र स्वच्छ करण्याची जबाबदारी उचलण्याची गरज आहे.शहरातील दूषित पाणी नदीपात्रातहिंगणघाट शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. शिवाय या तालुक्यात मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहे. या उद्योगातील आणि शहरातील मोठ्या नाल्यातील पाणी दूषित पाणी या नदीच्या पात्रात येत आहे. यामुळे नदीचे पाणी दूषित होत आहे. यामुळे नगर परिषदेने शहरातील पाणी नदीत येणार नाही या याकरिता काही उपाय योजना आखण्याची गरज आहे.नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कचरा असल्याचे दिसून आले आहे. हा कचरा नदी शेजारी असलेल्या गावांतील नागरिकांकडून टाकण्यात आल्याचे दिसत आहे. या कचºयामुळे नदीचे पात्र दूषित होत आहे. हा परिसर स्वच्छ करण्याकरिता येथील पर्यावरणवादी संघटनांनी एकत्र येत कार्य करण्याची गरज येथे निर्माण झाली आहे.