शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
3
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल अयशस्वी, तुर्कीचे ड्रोन पाडले"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
4
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
5
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
6
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
7
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
8
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
9
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
10
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
11
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
12
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
13
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
14
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
15
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
16
Kangana Ranaut : "जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक
17
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
18
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
19
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम
20
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...

‘ड्राेन’द्वारा 843 गावांतील मालमत्ता सर्वेक्षण झाले पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 05:00 IST

जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयाच्या वतीने गावठाणातील मालमत्तांचे ड्राेनद्वारे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यात वर्धा, आर्वी, आष्टी, कारंजा, समुद्रपूर, हिंगणघाट, सेलू आणि देवळी या आठ तालुक्यातील ८४३ गावांचा समावेश असून या गावातील गावठाणातील मालमत्तांचे ड्राेनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले आहे. कोरोना महामारीमुळे या गावांतील सर्वेक्षणाला अडचणी निर्माण झाल्या हाेत्या. मात्र, आता कामाला गती आली असून सुमारे सर्वच मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

चैतन्य जोशीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  जिल्ह्यात ड्राेनद्वारे मालमत्तांच्या सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्णत्वाच्या दिशेने आहे. आठ तालुक्यातील ८४३ गावांमध्ये ड्राेनद्वारा मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून सनद वाटप केल्या जात आहे. सर्वेक्षणानंतर तपासणी झाल्यावर मालमत्ता कार्डही वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे. जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयाच्या वतीने गावठाणातील मालमत्तांचे ड्राेनद्वारे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यात वर्धा, आर्वी, आष्टी, कारंजा, समुद्रपूर, हिंगणघाट, सेलू आणि देवळी या आठ तालुक्यातील ८४३ गावांचा समावेश असून या गावातील गावठाणातील मालमत्तांचे ड्राेनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले आहे. कोरोना महामारीमुळे या गावांतील सर्वेक्षणाला अडचणी निर्माण झाल्या हाेत्या. मात्र, आता कामाला गती आली असून सुमारे सर्वच मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.नागरिकांना त्यांच्या मालमत्तांची अचूक माहिती उपलब्ध व्हावी, जमीन क्षेत्रावरून वाद उद्भवू नये,  यासाठी केंद्र व राज्य शासनाने या मोहिमेवर लक्ष केंद्रित केले होते.  येत्या काही दिवसांत आठही तालुक्यातील  ८४३ गावातील नागरिकांना मालमत्तांचे कार्ड वाटप सुरु होणार आहे. ज्या मालमत्तांचे कार्ड वाटप झाले त्यांचे फेर देखील होत आहे. काहींना सनद दिल्या आहेत. तर, काहींच्या देणे शिल्लक असल्याची माहिती भूमिअभिलेख कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.

तीन तालुक्यातील सहा गावात सनद वाटप -  जिल्ह्यातील विविध गावांतील गावठाणातील मालमत्तांचे सुमारे ३ ड्राेनच्या सहाय्याने सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. यापैकी वर्धा तालुक्यातील २ गावात २०२ मालमत्तांची सनद देण्यात आली आहे. -   तसेच समुद्रपूर येथील २ गावात ७५ आणि आष्टी तालुक्यातील २ गावात ५५ मालमत्तांच्या सनदचे वाटप करण्यात आले आहे. 

तपासणीनंतर देणार ‘प्राॅपर्टी कार्ड’सध्या ड्राेनच्या मदतीने आठही तालुक्यातील सुमारे ८४३ गावांतील मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. आता मालमत्तांची तपासणी केली जात आहे. तपासणी झाल्यावर मालमत्ताधारकांना ‘प्राॅपर्टी कार्ड’ देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :agricultureशेती