शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. आंबेडकर हे खरे राष्ट्रनिर्माते होते

By admin | Updated: April 12, 2017 00:25 IST

जो इतिहासाचे अवलोकन करतो, तोच इतिहास बदलवतो, जो समाजाचं अध्ययन करतो, तो समाज बदलवतो आणि जो धर्माचा अभ्यास करतो तो धर्म सुद्धा बदलवतो, ...

मैत्रीवीर नागार्जून : ‘डॉ. आंबेडकर : राष्ट्रवाद, लोकशाही व बौद्धधर्म’वर व्याख्यानवर्धा : जो इतिहासाचे अवलोकन करतो, तोच इतिहास बदलवतो, जो समाजाचं अध्ययन करतो, तो समाज बदलवतो आणि जो धर्माचा अभ्यास करतो तो धर्म सुद्धा बदलवतो, अशी क्रांतीकारी व्यक्ती म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय, असे मत हैद्राबाद येथील सेंट्रल विद्यापीठाचे प्रा. डॉ. मैत्रीवीर नागार्जून यांनी व्यक्त केले. डॉ. आंबेडकरांच्या १२६ व्या जयंतीसह त्रिरत्न व बौद्ध महासंघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विद्यादीप सभागृहात आयोजित दोन दिवसीय व्याख्यानमालेत ‘डॉ. आंबेडकर : राष्ट्रवाद, लोकशाही आणि बौद्धधर्म’ विषयावर ते बोलत होते. पहिल्या दिवशी धम्मचारी नागकेतू तर दुसऱ्या दिवशी हिंदी विद्यापीठाचे डॉ. सुरजित अध्यक्षस्थानी होते.डॉ. नागार्जून पूढे म्हणाले की, डॉ. आंबेडकर हे एक महान राष्ट्रनिर्माते होते. लोकशाही व बौद्धधर्माला अभिप्रेत खऱ्या राष्ट्रवादाचा पाया त्यांनी घातला. आजचा असमानतायुक्त राष्ट्रवाद त्यांना अभिप्रेत नव्हता. घटनेच्या प्रास्ताविकात स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या मुल्यांचा अंतर्भाव असला तरी या मुल्यांकडे बघण्याची त्यांची दृष्टी वेगळी होती. अमर्याद स्वातंत्र्य हे समतेच्या तत्वाला संकुचित करू शकते म्हणून बंधुत्वाची गरज त्यांनी प्रतिपादन केली. केवळ बंधुत्व हे सुद्धा पुरेसे नसून त्याला मैत्रीची जोड त्यांनी दिली आणि म्हणून बुद्धाच्या तत्वावर हे तीनही मुल्ये आधारित आहेत, हे त्यांनी जगाला निक्षून सांगितले. आज मात्र आपल्या मताशी सहमत नसणाऱ्यांची अराष्ट्रीय वा राष्ट्रद्रोही, अशी निर्भत्सना केली जाते. हा लोकशाहीचा संकोच आहे. म्हणून समतायुक्त समाजाची निर्मिती करणे हाच डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत राष्ट्रवाद आहे, असे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले.यावेळी नरेन मून व प्रा. गौतम तेलतुबंडे यांनी संपादित केलेल्या बौद्ध जीवन मार्ग या उर्गेन संघरक्षित यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रस्ताविक त्रिरत्न बौद्ध महासंघ वर्धा केंद्राचे अध्यक्ष धम्मचारी हर्षवरी यांनी केले तर आभार वर्धा बुद्धीष्ट सेंटरचे अध्यक्ष धम्मचारी मंजूकिर्ती यांनी मानले. वक्त्यांचा परिचय व कार्यक्रमाचे संचालन प्रा. ज्ञानेन्द्र मुनेश्वर यांनी केले. दोन्ही दिवसाच्या व्याख्यानाला श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थित, हे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.(कार्यालय प्रतिनिधी)