शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

टीव्हीची ओळख देणारे दूरदर्शन होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 23:41 IST

टेलीव्हीजनची ओळख देणारे दूरदर्शन आज खासगी वाहिन्यांच्या तुलनेत कमी पडल्याने शासनाने काही भागात त्याचे प्रक्षेपण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार वर्धेतील तीनही केंद्र बंद करण्यात येत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात तीन केंद्र : जानेवारीच्या अखेरीस प्रक्षेपण बंद

पुरूषोत्तम नागपुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : टेलीव्हीजनची ओळख देणारे दूरदर्शन आज खासगी वाहिन्यांच्या तुलनेत कमी पडल्याने शासनाने काही भागात त्याचे प्रक्षेपण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार वर्धेतील तीनही केंद्र बंद करण्यात येत आहे. तर राज्यातील २७६ केंद्रांवर गंडांतर येणार आहे. यामुळे कधी मालिकांची आठवडाभर वाट बघण्याची हुरहुर लावणारे दूरदर्शन आज टिव्हीच्या पडद्याआड होणार आहे.२२ वर्षापूर्वी आर्वी शहरात सुरू झालेले दूरदर्शन केंद्र येत्या ३१ जानेवारीला बंद होणार आहे. याची माहिती होताच अनेकांकडून दूरदर्शनवरील अनेक मालिका आणि कार्यक्रमांना उजाळा देण्यात आला. टेलीव्हीजनची ओळख देणारे दूरदर्शन बंद होणार असल्याने नागरिकांत नाराजीचा सूर उमटला आहे. मनोरंजनाचे साधन असणारे दुरदर्शन केंद्र बंद करण्याचे आदेश मुंबईहून या तीनही केंद्रांवर धडकले आहेत.आर्वी शहरात न्यायालयाच्या समोरील नगर पालिकेच्या जागेवर इमारतीत २५ नोव्हेंबर १९९५ मध्ये तत्कालीन केंद्रीय सूचना प्रसारण मंत्री माधवराव सिंधिया यांच्या हस्ते भारतीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष वसंतराव साठे व खा. रामचंद्र घंगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यलय सुरू झाले. यासह जिल्ह्यात दूरदर्शन केंद्रामुळे वर्धा आणि पुलगाव येथेही दूरदर्शनचे कार्यालय उघडण्यात आले. या दूरदर्शनवरून प्रकाशित होणारे कार्यक्रमा प्रारंभीच्या काळात युवा पिढीला मार्गदर्शन करणारे ठरले.रामायण, महाभारत, हनुमान, मराठी रसिकांची फेम असलेले चालता बोलता व आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात, रंगोली, शैक्षणिक कार्यक्रम, बायोस्कोप अशी अनेक हिंदी, मराठी सिरीयलसह इतर कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात येत होते. शेतीकरिता असलेला आमची माती आमची माणसं हा कार्यक्रम शेतकरी आवर्जून बघत होते. शिवाय मराठीचे बातमीपत्र बघणारे आजही आहेत.हेच दूरदर्शन केंद्र हे २२ वर्षानंतर बंद होणार आहे. ग्रामीण भागातील गोरगरिब जनता पैसा खर्च करुन डिश टी.व्ही., केबल घरी घेऊ शकत नाही. या मोफत दुरदर्शन सेवेचा आनंद घेत आहेत. यामध्ये जवळपास आर्वी परिसरातील २०० गावातील २ लाखापेक्षा जास्त प्रेक्षकांवर अन्याय केल्याच्या प्रतिक्रीया नागरिक देत आहेत. जिल्ह्यातील आर्वी, वर्धा, पुलगाव ही सर्वच दूरदर्शन केंद्र ३१ जानेवारीला बंद होत असल्याने या येथील सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन दूरदर्शन केंद्र सुरू राहण्याकरिता जातीने प्रयत्न करावे अशी मागणी जोर धरत आहे.एफएमही होणार बंददूरदर्शनची वर्धा जिल्ह्यात केवळ टेलीव्हीजनची सेवा नाही तर त्यांच्यावतीने एफएमचीही सेवा पुरविण्यात येत होती. या निर्णयामुळे ही सेवाही बंद होणार आहे. यामुळे रात्री एफएमवर विविध कार्यक्रमाचा आनंद घेणाºया वर्धेकर नागरिकांना या सेवेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. याचा विचार होणे गरजेचे आहे.डिजिटलायझेशनमध्ये वर्धेचा समावेश होणे अपेक्षितडिजीटलायझेशनच्या नावाखाली शासनाने दूरदर्शन केंद्र बंद करण्याचा घाट घातला आहे. वर्धेत बंद होत असलेल्या इतर नाही तर किमान जिल्हास्थळ असलेले केंद्र सुरू ठेवून येथे डिजीटलाईज सेवा देणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. वर्धेतील सर्वच केंद्र बंद करण्यात येत असल्याने या भागातील नागरिकांना शासनाच्या या सेवेपासून वंचित राहण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.दुरदर्शनला आकाशवाणीचे स्वरुप द्यादूरदर्शन केंद्र बंद न करता आर्वीच्या केंद्रावरुन आकाशवाणीचे डिजिटलायझेशन केल्यास अनेक कार्यक्रमासह येथील जाहिराती ग्रामीण भागातील लोककला कार्यक्रम व समाज प्रबोधनपर कार्यक्रम या केंद्रावर प्रसारण होऊ शकते. त्यामुळे या केंद्राला आकाशवाणी केंद्राचे स्वरुपसोबतच आर्थिक सहकार्य मिळू शकते अशी मागणी जनतेची आहे.