शहरं
Join us  
Trending Stories
1
हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
3
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
4
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
5
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
6
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
7
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
8
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?
9
दूध आणायला जातो म्हणाला, १९ दिवसांनी मृतदेह सापडला; रशियात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राजस्थान हादरले
10
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
11
रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल
12
गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
13
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
14
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
15
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
16
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
17
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
18
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
19
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
20
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?

टीव्हीची ओळख देणारे दूरदर्शन होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 23:41 IST

टेलीव्हीजनची ओळख देणारे दूरदर्शन आज खासगी वाहिन्यांच्या तुलनेत कमी पडल्याने शासनाने काही भागात त्याचे प्रक्षेपण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार वर्धेतील तीनही केंद्र बंद करण्यात येत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात तीन केंद्र : जानेवारीच्या अखेरीस प्रक्षेपण बंद

पुरूषोत्तम नागपुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : टेलीव्हीजनची ओळख देणारे दूरदर्शन आज खासगी वाहिन्यांच्या तुलनेत कमी पडल्याने शासनाने काही भागात त्याचे प्रक्षेपण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार वर्धेतील तीनही केंद्र बंद करण्यात येत आहे. तर राज्यातील २७६ केंद्रांवर गंडांतर येणार आहे. यामुळे कधी मालिकांची आठवडाभर वाट बघण्याची हुरहुर लावणारे दूरदर्शन आज टिव्हीच्या पडद्याआड होणार आहे.२२ वर्षापूर्वी आर्वी शहरात सुरू झालेले दूरदर्शन केंद्र येत्या ३१ जानेवारीला बंद होणार आहे. याची माहिती होताच अनेकांकडून दूरदर्शनवरील अनेक मालिका आणि कार्यक्रमांना उजाळा देण्यात आला. टेलीव्हीजनची ओळख देणारे दूरदर्शन बंद होणार असल्याने नागरिकांत नाराजीचा सूर उमटला आहे. मनोरंजनाचे साधन असणारे दुरदर्शन केंद्र बंद करण्याचे आदेश मुंबईहून या तीनही केंद्रांवर धडकले आहेत.आर्वी शहरात न्यायालयाच्या समोरील नगर पालिकेच्या जागेवर इमारतीत २५ नोव्हेंबर १९९५ मध्ये तत्कालीन केंद्रीय सूचना प्रसारण मंत्री माधवराव सिंधिया यांच्या हस्ते भारतीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष वसंतराव साठे व खा. रामचंद्र घंगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यलय सुरू झाले. यासह जिल्ह्यात दूरदर्शन केंद्रामुळे वर्धा आणि पुलगाव येथेही दूरदर्शनचे कार्यालय उघडण्यात आले. या दूरदर्शनवरून प्रकाशित होणारे कार्यक्रमा प्रारंभीच्या काळात युवा पिढीला मार्गदर्शन करणारे ठरले.रामायण, महाभारत, हनुमान, मराठी रसिकांची फेम असलेले चालता बोलता व आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात, रंगोली, शैक्षणिक कार्यक्रम, बायोस्कोप अशी अनेक हिंदी, मराठी सिरीयलसह इतर कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात येत होते. शेतीकरिता असलेला आमची माती आमची माणसं हा कार्यक्रम शेतकरी आवर्जून बघत होते. शिवाय मराठीचे बातमीपत्र बघणारे आजही आहेत.हेच दूरदर्शन केंद्र हे २२ वर्षानंतर बंद होणार आहे. ग्रामीण भागातील गोरगरिब जनता पैसा खर्च करुन डिश टी.व्ही., केबल घरी घेऊ शकत नाही. या मोफत दुरदर्शन सेवेचा आनंद घेत आहेत. यामध्ये जवळपास आर्वी परिसरातील २०० गावातील २ लाखापेक्षा जास्त प्रेक्षकांवर अन्याय केल्याच्या प्रतिक्रीया नागरिक देत आहेत. जिल्ह्यातील आर्वी, वर्धा, पुलगाव ही सर्वच दूरदर्शन केंद्र ३१ जानेवारीला बंद होत असल्याने या येथील सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन दूरदर्शन केंद्र सुरू राहण्याकरिता जातीने प्रयत्न करावे अशी मागणी जोर धरत आहे.एफएमही होणार बंददूरदर्शनची वर्धा जिल्ह्यात केवळ टेलीव्हीजनची सेवा नाही तर त्यांच्यावतीने एफएमचीही सेवा पुरविण्यात येत होती. या निर्णयामुळे ही सेवाही बंद होणार आहे. यामुळे रात्री एफएमवर विविध कार्यक्रमाचा आनंद घेणाºया वर्धेकर नागरिकांना या सेवेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. याचा विचार होणे गरजेचे आहे.डिजिटलायझेशनमध्ये वर्धेचा समावेश होणे अपेक्षितडिजीटलायझेशनच्या नावाखाली शासनाने दूरदर्शन केंद्र बंद करण्याचा घाट घातला आहे. वर्धेत बंद होत असलेल्या इतर नाही तर किमान जिल्हास्थळ असलेले केंद्र सुरू ठेवून येथे डिजीटलाईज सेवा देणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. वर्धेतील सर्वच केंद्र बंद करण्यात येत असल्याने या भागातील नागरिकांना शासनाच्या या सेवेपासून वंचित राहण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.दुरदर्शनला आकाशवाणीचे स्वरुप द्यादूरदर्शन केंद्र बंद न करता आर्वीच्या केंद्रावरुन आकाशवाणीचे डिजिटलायझेशन केल्यास अनेक कार्यक्रमासह येथील जाहिराती ग्रामीण भागातील लोककला कार्यक्रम व समाज प्रबोधनपर कार्यक्रम या केंद्रावर प्रसारण होऊ शकते. त्यामुळे या केंद्राला आकाशवाणी केंद्राचे स्वरुपसोबतच आर्थिक सहकार्य मिळू शकते अशी मागणी जनतेची आहे.