शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

बेवारस श्वांनानी धरले वर्धेकरांना वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 23:51 IST

श्वानाच्या चाव्याने ज्येष्याचा बळी गेल्याने शहरासह लगतच्या ग्रामीण भागात श्वानांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात येणाऱ्या पर्यटकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसा आणि रात्री हे श्वान मुख्य रस्त्यासह शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहनधारक आणि पादचाऱ्यांचा पाठलाग करतात.

ठळक मुद्देभीतीयुक्त वातावरण । नगरपालिका, ग्रामपंचायतींचे बंदोबस्त करण्याकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरासह लगतच्या ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून बेवारस श्वानांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. श्वानाने चावा घेतल्याने एका वृद्धाला जीव नुकताच गमवावा लागला. मात्र, या बेवारस श्वानांचा बंदोबस्त करण्याकडे पालिका, संबंधित ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे.श्वानाच्या चाव्याने ज्येष्याचा बळी गेल्याने शहरासह लगतच्या ग्रामीण भागात श्वानांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात येणाऱ्या पर्यटकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसा आणि रात्री हे श्वान मुख्य रस्त्यासह शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहनधारक आणि पादचाऱ्यांचा पाठलाग करतात.नगरपालिकेच्या हद्दीतील महादेवपुरा, हवालदारपुरा, गोंडप्लॉट, सुदामपुरी, मालगुजारीपुरा, इतवारा बाजार तर शहरालगतच्या नालवाडी, साटोडा, आलोडी , पिपरी (मेघे) ग्रामपंचायतीच्या हद्दीत मोकाट, बेवारस श्वानांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. रात्री उशिरापर्यंत आणि सकाळी श्वानांचे कळप हैदोस घालताना दिसतात. यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना घराबाहेर पडणेदेखील अवघड झाले आहे. पिसाळलेले, आजारग्रस्त श्वानांची संख्यादेखील मोठी आहे. यामुळे आजार बळावण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.शहरालगतच्या ग्रामीण भागात पिसाळलेल्या श्वानांनी आजवर अनेकांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, बंदोबस्त करण्याकडे संबंधितांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने नागरिक भीतीयुक्त वातावरणात वास्तव्य करीत आहेत. पालिका, ग्रामपंचायतीने या समस्येची दखल न घेतल्यास बेवारस श्वानांमुळे अनेक बळी जाण्याची भीतीही नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.शिकवणीला जाणारे विद्यार्थी दहशतीतनालवाडी व साटोडा, पिपरी (मेघे) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील आलोडीसह अनेक वॉर्डांत बेवारस श्वानांची संख्या प्रचंड वाढली असून पहाटे शाळा आणि शिकवणीवर्गाला जाणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी, मॉर्निंग वॉककरिता जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित ग्रामपंचायतींनी तातडीने या बेवारस श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. याची संबंधितांनी गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.पुलफैलात ज्येष्ठाला गमवावा लागला जीवशहरातील विविध बेवारस श्वानांनी मागील काही दिवसांपासून बेवारस श्वानांनी प्रचंड चैदोस घातला आहे. अशाच एका बेवारस श्वानाने पुलफैलातील देविदास मोतीराम गजभिये या सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला चावा घेतला. यात त्यांना रेबीजची बाधा झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. या परिसरातील नागरिकांनी श्वानांचा बंदोबस्त करण्याबाबत संबंधित नगरसेवक, पालिकेकडे मागणी केली होती. मात्र, कायम दुर्लक्ष करण्यात आले. यातच या ज्येष्ठाला जीव गमवावा लागला.

टॅग्स :dogकुत्रा