शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

बेवारस श्वांनानी धरले वर्धेकरांना वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 23:51 IST

श्वानाच्या चाव्याने ज्येष्याचा बळी गेल्याने शहरासह लगतच्या ग्रामीण भागात श्वानांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात येणाऱ्या पर्यटकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसा आणि रात्री हे श्वान मुख्य रस्त्यासह शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहनधारक आणि पादचाऱ्यांचा पाठलाग करतात.

ठळक मुद्देभीतीयुक्त वातावरण । नगरपालिका, ग्रामपंचायतींचे बंदोबस्त करण्याकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरासह लगतच्या ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून बेवारस श्वानांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. श्वानाने चावा घेतल्याने एका वृद्धाला जीव नुकताच गमवावा लागला. मात्र, या बेवारस श्वानांचा बंदोबस्त करण्याकडे पालिका, संबंधित ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे.श्वानाच्या चाव्याने ज्येष्याचा बळी गेल्याने शहरासह लगतच्या ग्रामीण भागात श्वानांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात येणाऱ्या पर्यटकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसा आणि रात्री हे श्वान मुख्य रस्त्यासह शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहनधारक आणि पादचाऱ्यांचा पाठलाग करतात.नगरपालिकेच्या हद्दीतील महादेवपुरा, हवालदारपुरा, गोंडप्लॉट, सुदामपुरी, मालगुजारीपुरा, इतवारा बाजार तर शहरालगतच्या नालवाडी, साटोडा, आलोडी , पिपरी (मेघे) ग्रामपंचायतीच्या हद्दीत मोकाट, बेवारस श्वानांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. रात्री उशिरापर्यंत आणि सकाळी श्वानांचे कळप हैदोस घालताना दिसतात. यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना घराबाहेर पडणेदेखील अवघड झाले आहे. पिसाळलेले, आजारग्रस्त श्वानांची संख्यादेखील मोठी आहे. यामुळे आजार बळावण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.शहरालगतच्या ग्रामीण भागात पिसाळलेल्या श्वानांनी आजवर अनेकांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, बंदोबस्त करण्याकडे संबंधितांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने नागरिक भीतीयुक्त वातावरणात वास्तव्य करीत आहेत. पालिका, ग्रामपंचायतीने या समस्येची दखल न घेतल्यास बेवारस श्वानांमुळे अनेक बळी जाण्याची भीतीही नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.शिकवणीला जाणारे विद्यार्थी दहशतीतनालवाडी व साटोडा, पिपरी (मेघे) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील आलोडीसह अनेक वॉर्डांत बेवारस श्वानांची संख्या प्रचंड वाढली असून पहाटे शाळा आणि शिकवणीवर्गाला जाणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी, मॉर्निंग वॉककरिता जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित ग्रामपंचायतींनी तातडीने या बेवारस श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. याची संबंधितांनी गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.पुलफैलात ज्येष्ठाला गमवावा लागला जीवशहरातील विविध बेवारस श्वानांनी मागील काही दिवसांपासून बेवारस श्वानांनी प्रचंड चैदोस घातला आहे. अशाच एका बेवारस श्वानाने पुलफैलातील देविदास मोतीराम गजभिये या सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला चावा घेतला. यात त्यांना रेबीजची बाधा झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. या परिसरातील नागरिकांनी श्वानांचा बंदोबस्त करण्याबाबत संबंधित नगरसेवक, पालिकेकडे मागणी केली होती. मात्र, कायम दुर्लक्ष करण्यात आले. यातच या ज्येष्ठाला जीव गमवावा लागला.

टॅग्स :dogकुत्रा