शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या मुलांकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 00:32 IST

वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावे म्हणून वाहतूक पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभागाद्वारे प्रयत्न केले जातात; पण अल्पवयीन वाहन चालकांच्या मुद्यावर सारेच हतबल होतात.

ठळक मुद्देएकाच दिवशी ६५ प्रकरणे : पालकांना बोलावून दिली समज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावे म्हणून वाहतूक पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभागाद्वारे प्रयत्न केले जातात; पण अल्पवयीन वाहन चालकांच्या मुद्यावर सारेच हतबल होतात. यासाठी पालकांनाच समज देण्याची वेळ आली आहे. ही बाब लक्षात घेत आरटीओ व वाहतूक पोलिसांनी कारवाई करीत ६५ अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई केली. अशी कारवाई टाळण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांकडे ड्रायव्हींग लायसन्स आहे काय, हे तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.शाळा, महाविद्यालय, शिकवणी वर्गाला जाण्यासाठी आता मुलांना मोटरसायकल, मोपेड घेऊन देण्याचे प्रमाण वाढले आहे. बहुतांश विद्यार्थी दुचाकी वापरतात; पण ड्रायव्हींग लायसन्स काढण्याचा साधा विचारही त्यांच्या वा त्यांच्या पालकांच्या मनात डोकावत नाही. मग, कुठली अनुचित घटना घडली तर पोलिसांवरच दोष दिला जातो. सध्या वर्धा शहरासह जिल्ह्यात हा प्रकार वाढीस लागला आहे. अल्पवयीन वाहन चालकांची संख्या वाढतीवर आहे; पण त्या प्रमाणात ड्रायव्हींग लायसन्स काढले जात नसल्याचे उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सांगण्यात आले आहे.खरोखर अल्पवयीन दुचाकी चालक म्हणजेच विद्यार्थ्यांकडे वाहन चालविण्याचा परवाना आहे काय, हे तपासण्यासाठी १६ फेबु्रवारी रोजी उपप्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक पोलीस शाखेद्वारे चाचणी म्हणून कारवाईची विशेष मोहीम राबविण्यात आली. यशवंत कनिष्ठ महाविद्यालयाजवळ राबविलेल्या या मोहिमेत तब्बल ६५ विद्यार्थ्यांकडे ड्रायव्हींग लायसन्स नसल्याचे समोर आले. वाहतूक पोलिसांनी ३५ प्रकरणे तर आरटीओद्वारे ३० प्रकरणांची नोंद घेण्यात आली. यातील दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या. पालकांनी संपर्क साधल्यानंतर समज देत दुचाकी परत केल्यात. ही मोहीम अल्पवयीन तथा ड्रायव्हींग लायसन्स नसलेल्या मुलांविरूद्ध जिल्हा पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आली. अशा मोहीम आता नेहमी राबविल्या जाणार असल्याचेही वाहतूक पोलीस शाखेचे प्रमुख दत्तात्रय गुरव यांनी सांगितले. यामुळे पालकांनी पाल्यांकडे ड्रायव्हींग लायसन्स आहे की नाही, हे तपासणे व नसेल तर त्याची तरतूद करणे गरजेचे झाले आहे.एक दिवसाची मोहीम पुरेशी आहे काय?आरटीओ आणि वाहतूक नियंत्रण पोलीस शाखेने अल्पवयीन दुचाकी चालकांविरूद्ध एक दिवस कारवाईची मोहीम राबविली. एका दिवसांत ६५ प्रकरणेही नोंदविली; पण एक दिवसाची मोहीम नियम पाळणे शिकविण्यासाठी पूरेशी आहे काय, हा प्रश्नच आहे.पालकांना जबाबदारीचे भान हवेआपल्या अल्पवयीन पाल्याला दुचाकी घेऊन देत असताना त्यांना वाहन व्यवस्थित चालविता येते काय, वाहतूक नियम माहिती आहेत काय हे माहिती असणे गरजेचे आहे. शिवाय वाहन देत असताना ड्रायव्हींग लायसन्स काढून देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ही पालकांची प्रमुख जबाबदारी असताना त्याचे कुणाला भान नसल्याचेच दिसते.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस