शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्तेसाठी ‘ग्रेडेशन’ पद्धती नकोच

By admin | Updated: October 24, 2015 02:13 IST

विद्यार्थ्यांमध्ये होत असलेली जीवघेणी स्पर्धा थांबविण्यासाठी शासनाने ‘ग्रेडेशन’ पद्धती अंमलात आणली.

मंथन : पालकांनी सजग होण्याची गरज - मुख्याध्यापकांचा सूर वर्धा : विद्यार्थ्यांमध्ये होत असलेली जीवघेणी स्पर्धा थांबविण्यासाठी शासनाने ‘ग्रेडेशन’ पद्धती अंमलात आणली. पण आता मुलांमध्ये कमी आणि पालकांमध्येच स्पर्धा व्हायला लागली आहे. आठवीपर्यंत नापास करू नका असे शासनाचे धोरण असल्याने त्यांची खरी गुणवत्ता कळायला मार्गच नाही. दहावीत विद्यार्थ्यांचा भ्रमाचा भोपळा अचानक फुटतो. पालक आपला मुलगा इतका मागे अचानक कसा आला असा कांगावा करीत शिक्षकांवरच दोषारोपण करतात. त्यामुळे खरी गुणवत्ता कळण्यासाठी मार्क पद्धती आणि त्यातही पहिलीपासून परीक्षाच हवी असा सूर शुक्रवारी शहरातील नामांकित शाळांच्या मुख्याध्यापकांनी लोकमतने आयोजित केलेल्या परिचर्चेत काढला. या मोकळ्या चर्चेत मुख्याध्यापक म्हणाले, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे हा शिक्षकांचा मूळ हेतू आहे. पण आताच्या पद्धतीत शिक्षक व मुख्याध्यापकांना शासनाने कारकून बनावून टाकले आहे. त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा लिखाणकामात जातो. केंद्रप्रमुख तर केवळ पोस्टमन झाले आहेत. शाळेला व्यवस्थित भेट द्यायलाही शिक्षणाधिकारी यांना वेळ मिळत नाही. अनेक शाळांमध्ये तर मुख्याध्यापक व शिक्षकांचा अर्धा वेळ तर मुलांच्या पोषण आहारातच जातो. त्यामुळे कार्यालयीन कामे करणारी स्वतंत्र यंत्रणा असावी, असा सूरही निघाला. शिक्षक विद्यार्थ्याला बोलू शकत नाही. एखाद्या विद्यार्थ्याला शाळेच्या आवारात काही लागले किंवा आपसातल्या भांडणात काही झाल्यास पालक शिक्षकांना धारेवर तर धरतातच, पण पैसेही मागत असल्याचे अनुभव यावेळी मुख्याध्यापकांनी सांगितले. शिक्षणव्यवस्थेविषयी विचारवंतांकडून उपाययोजना मागवाव्यात, शिक्षण विभागातील गोंधळ कमी करण्यासाठी प्रयत्न व्हावे आदी उपाय मुख्याध्यापकांनी सुचविले. विशेष म्हणजे पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात संवाद व्हावा, असे मत मुख्याध्यापकांनी व्यक्त केले.(शहर प्रतिनिधी)