शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

सोयाबीन विकण्याची घाई करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:04 IST

खरीप हंगामातील सोयाबीन निघण्यास सुरुवात झाली आहे. अनेक शेतकरी शेतातून निघालेले सोयाबीन थेट बाजारात विक्रीसाठी आणत आहे. मात्र, सोयाबीन विक्रीची घाई शेतकऱ्यांनी करू नये. बाजारभाव वधारण्याची दाट शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देभाव वधारण्याची शक्यता : चीनसोबत भारताचा करार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरीप हंगामातील सोयाबीन निघण्यास सुरुवात झाली आहे. अनेक शेतकरी शेतातून निघालेले सोयाबीन थेट बाजारात विक्रीसाठी आणत आहे. मात्र, सोयाबीन विक्रीची घाई शेतकऱ्यांनी करू नये. बाजारभाव वधारण्याची दाट शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.वर्धा जिल्ह्यात खरीपात कापूस व सोयाबीन हे दोन प्रमुख पीके आहे. सुरुवातीला लागवड केलेले सोयाबीन निघण्यास सुरुवात झाली असून जिल्ह्याच्या विविध बाजारपेठेत सोयाबीनचे दर हे तीन हजाराच्यावर आहेत. हिंगणघाट बाजार पेठेत १५ आॅक्टोबरला सोयाबीन ३ हजार १५५, सेलू बाजारपेठेत ३ हजार ७० रूपये भाव होता तर समुद्रपूर येथे मंगळवारी सोयाबीन खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. तेथे ३ हजार ८५ रूपये भाव सोयाबीनला देण्यात आला. ही बहुतांश खरेदी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांकडून केली जात आहे. शासनाच्या नाफेडमार्फत अजूनही सोयाबीन खरेदीला सुरुवात झालेली नाही. केवळ आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली आहे. यंदा राज्यात सोयाबीनचे उत्पादन कमी असल्याने सोयाबीनचे भाव वधारण्याची शक्यता आहे. सोयाबीनचे हमीभाव ३ हजार ३९९ झाले आहे. केंद्रसरकारने सोयाबीनवर आयात शुल्क ४४ टक्के केले असून सोयाबीनच्या निर्यातीवर १० टक्के सबसीडी जाहीर केली आहे. राज्य सरकारने ४० लाख मॅट्रीक टन, सोयापेंड निर्यात करण्याचा करार चीन सोबत केल्याने सोयाबीनला भाव मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तारण योजनेचा लाभ घ्यावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.उतारा कमीयंदा वर्धा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. केवळ ७७ टक्केच पाऊस झाल्याने सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी एकरी अडीच पोत्यांचाच उतारे आले आहेत. त्यामुळे सोयाबीनचे भाव वधारण्याची शक्यता आहे. जागतीक बाजारपेठेतही सोयाबीनची मागणी तेजीत राहण्याची शक्यता असून दिवाळीनंतरही सोयाबीनचे मार्केट टाईट राहिल, असे जाणकार सांगतात.यावर्षी केंद्रसरकारने सोयाबीन, कापूस, चना याच्या हमीभावात वाढ केली आहे. याचा निश्चितपणे फायदा शेतकºयांना होणार आहे. कापसाचे हमीभाव ४ हजार २०० वरून ५ हजार ४५० करण्यात आले. सोयाबीनचे हमीभाव ३ हजार ३९९ करण्यात आले. शेतकऱ्यांना नाफेडला माल विकत यावा म्हणून आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया १ ते ३१ आॅक्टोबर या काळात सुरू आहे. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.- प्रशांत इंगळे तिगावकर, सदस्य राज्य कृषीमूल्य आयोग.वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी हितार्थ विविध निर्णय घेत असून मागील काही वर्षांपासून शेतमाल तारण योजना येथे राबविली जात आहे. यंदा या योजनेचा शुभारंभ सोमवारी झाला. सुमारे ५ हजार पोते सोयाबीन शेतकरी शेतमाल तारण योजनेच्या माध्यमातून आमच्याकडे ठेवतील यासाठी आम्ही १० हजार पोते शेतमाल साठवणूक क्षमतेची दोन गोदाम सज्ज केले आहेत.- श्याम कार्लेकर, सभापती कृउबा समिती, वर्धा.