शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन विकण्याची घाई करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:04 IST

खरीप हंगामातील सोयाबीन निघण्यास सुरुवात झाली आहे. अनेक शेतकरी शेतातून निघालेले सोयाबीन थेट बाजारात विक्रीसाठी आणत आहे. मात्र, सोयाबीन विक्रीची घाई शेतकऱ्यांनी करू नये. बाजारभाव वधारण्याची दाट शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देभाव वधारण्याची शक्यता : चीनसोबत भारताचा करार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरीप हंगामातील सोयाबीन निघण्यास सुरुवात झाली आहे. अनेक शेतकरी शेतातून निघालेले सोयाबीन थेट बाजारात विक्रीसाठी आणत आहे. मात्र, सोयाबीन विक्रीची घाई शेतकऱ्यांनी करू नये. बाजारभाव वधारण्याची दाट शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.वर्धा जिल्ह्यात खरीपात कापूस व सोयाबीन हे दोन प्रमुख पीके आहे. सुरुवातीला लागवड केलेले सोयाबीन निघण्यास सुरुवात झाली असून जिल्ह्याच्या विविध बाजारपेठेत सोयाबीनचे दर हे तीन हजाराच्यावर आहेत. हिंगणघाट बाजार पेठेत १५ आॅक्टोबरला सोयाबीन ३ हजार १५५, सेलू बाजारपेठेत ३ हजार ७० रूपये भाव होता तर समुद्रपूर येथे मंगळवारी सोयाबीन खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. तेथे ३ हजार ८५ रूपये भाव सोयाबीनला देण्यात आला. ही बहुतांश खरेदी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांकडून केली जात आहे. शासनाच्या नाफेडमार्फत अजूनही सोयाबीन खरेदीला सुरुवात झालेली नाही. केवळ आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली आहे. यंदा राज्यात सोयाबीनचे उत्पादन कमी असल्याने सोयाबीनचे भाव वधारण्याची शक्यता आहे. सोयाबीनचे हमीभाव ३ हजार ३९९ झाले आहे. केंद्रसरकारने सोयाबीनवर आयात शुल्क ४४ टक्के केले असून सोयाबीनच्या निर्यातीवर १० टक्के सबसीडी जाहीर केली आहे. राज्य सरकारने ४० लाख मॅट्रीक टन, सोयापेंड निर्यात करण्याचा करार चीन सोबत केल्याने सोयाबीनला भाव मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तारण योजनेचा लाभ घ्यावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.उतारा कमीयंदा वर्धा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. केवळ ७७ टक्केच पाऊस झाल्याने सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी एकरी अडीच पोत्यांचाच उतारे आले आहेत. त्यामुळे सोयाबीनचे भाव वधारण्याची शक्यता आहे. जागतीक बाजारपेठेतही सोयाबीनची मागणी तेजीत राहण्याची शक्यता असून दिवाळीनंतरही सोयाबीनचे मार्केट टाईट राहिल, असे जाणकार सांगतात.यावर्षी केंद्रसरकारने सोयाबीन, कापूस, चना याच्या हमीभावात वाढ केली आहे. याचा निश्चितपणे फायदा शेतकºयांना होणार आहे. कापसाचे हमीभाव ४ हजार २०० वरून ५ हजार ४५० करण्यात आले. सोयाबीनचे हमीभाव ३ हजार ३९९ करण्यात आले. शेतकऱ्यांना नाफेडला माल विकत यावा म्हणून आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया १ ते ३१ आॅक्टोबर या काळात सुरू आहे. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.- प्रशांत इंगळे तिगावकर, सदस्य राज्य कृषीमूल्य आयोग.वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी हितार्थ विविध निर्णय घेत असून मागील काही वर्षांपासून शेतमाल तारण योजना येथे राबविली जात आहे. यंदा या योजनेचा शुभारंभ सोमवारी झाला. सुमारे ५ हजार पोते सोयाबीन शेतकरी शेतमाल तारण योजनेच्या माध्यमातून आमच्याकडे ठेवतील यासाठी आम्ही १० हजार पोते शेतमाल साठवणूक क्षमतेची दोन गोदाम सज्ज केले आहेत.- श्याम कार्लेकर, सभापती कृउबा समिती, वर्धा.