शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
6
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
7
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
8
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
9
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
10
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
11
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
12
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
13
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
14
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
15
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
16
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
17
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
18
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
19
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
20
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

बांधकाम विभागाला पडला क्षेत्राचा विसर

By admin | Updated: May 25, 2015 02:12 IST

शासकीय कामकाज पारदर्शकपणे चालावे, नागरिकांना माहिती मिळावी म्हणून २००५ मध्ये माहिती अधिकार कायदा पारित झाला;

प्रशांत हेलोंडे वर्धाशासकीय कामकाज पारदर्शकपणे चालावे, नागरिकांना माहिती मिळावी म्हणून २००५ मध्ये माहिती अधिकार कायदा पारित झाला; पण शासकीय कार्यालये या कायद्याला बगल देत असल्याचे दिसते. सार्वजनिक बांधकाम विभागात आरटीआय कार्यकर्त्याने एका रस्त्याची माहिती मागितली; पण सदर रस्ता वर्धा विभागातच येत नसल्याचा जावईशोध लावत तब्बल तीन वेळा अर्ज परत केला. अर्जदाराने पाठपुरावा केल्यानंतर माहिती देण्यात आली. यामुळे बांधकाम विभागाला आपल्या क्षेत्राचाच तर विसर पडला नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आरटीआय कार्यकर्ते चिंतामण शंभरकर रा. स्रेहलनगर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धा यांच्याकडे १८ मार्च रोजी माहिती अधिकाराचा अर्ज सादर केला. यात वर्धा विभागांतर्गत येणाऱ्या खरांगणा (गोडे) येथून कांढळीकडे जाणाऱ्या रस्त्याचा दर्जा काय आणि त्याची रूंदी किती आहे, याबाबत माहिती मागितली होती. खरांगणा (गोडे) हे गाव वर्धा तालुक्यातील असल्याने ते वर्धा विभागांतर्गतच येणे अपेक्षित आहे. ही बाब अधिकाऱ्यांना माहिती असणेही गरजेचेच आहे; पण बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनाच हे गाव माहिती नसल्याचे आढळून आले. शंभरकर यांचा १८ मार्च रोजी केलेला अर्ज परत करून तो आर्वी उपविभागात सादर करण्यास सांगण्यात आले. याबाबत उपविभागीय अभियंत्याने संबंधित कर्मचाऱ्याला पत्रही दिले. २४ मार्च रोजी दिलेल्या या पत्रामध्ये माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या; पण माहिती देण्यात आली नाही. माहिती प्राप्त न झाल्याने शंभरकर यांनी बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता अजब प्रकार समोर आला. माहितीबाबत स्मरणपत्र देताच खरांगणा (गोडे) ते कांढळी रस्ता वर्धा विभागात येत नसल्याचा जावईशोध लावण्यात आला.याबाबत १० एप्रिल रोजी बांधकाम विभागातील जनमाहिती अधिकाऱ्यांनी आर्वी उपविभागाला पत्रही दिले. पत्रात अर्जात मागणी केलेली माहिती या कार्यालयाशी संबंधित नसल्याने ती उपलब्ध नाही. ती माहिती आपल्या प्राधिकरणाशी संबंधित असल्याने कलम ६ (३) अन्वये मूळ अर्ज हस्तांतरित करण्यात येत आहे. या अर्जावर उचित कारवाई करून अर्जदारास कळवावे, असे नमूद करण्यात आले आहे. हा प्रकार एकदा नव्हे तर तब्बल तीन वेळ करण्यात आला. या प्रकारामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला आपले क्षेत्रही माहिती नाही काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वर्धा तालुक्यातील गावेही बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना माहिती नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कार्यकारी अभियंत्यांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अधिकार, कर्मचाऱ्यांना वर्धा विभागात येणाऱ्या क्षेत्राचा परिचय करण्याची वेळ आहे.