शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा केंद्रावर क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवू नका!

By admin | Updated: March 4, 2017 00:45 IST

राज्य शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला सुरूवात झाली आहे.

परीक्षार्थ्यांचे हीत जोपासा : दक्षता समिती सदस्यांची मागणी पुलगाव : राज्य शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला सुरूवात झाली आहे. शहरातील दोन केंद्रांवरून शेकडो परीक्षार्थी बारावीचे पेपर देत आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन परीक्षा केंद्रावर क्षमतेपेक्षा जास्त परिक्षार्थी शिक्षण मंडळाने देवू नयेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. परीक्षा काळात विद्यार्थ्यांना शांत चित्ताने व एकाग्रपणे परीक्षा देता यावी यासाठी सर्व परीक्षा केंद्रावर पत्रकार, नगरसेवक, पोलीस प्रशासन यांचा समावेश असलेली दक्षता कमिटी असते. परीक्षापुर्वी या कमिटीची सभा घेण्यात येते. या कमिटीने परीक्षा केंद्रावर क्षमतेपेक्षा जास्त परीक्षार्थी शिक्षण मंडळाने देवू नये, अशी मागणी अनेकदा केली आहे; पण शिक्षण मंडळ या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. फोफावलेल्या शिक्षण संस्था, वाढलेली विद्यार्थी संख्या यामुळे पर्यायाने दहावी, बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढली. वाढलेल्या परीक्षार्थी संख्या व वाढलेले परीक्षा शुल्क यामुळे परीक्षा मंडळ आर्थिक दृष्टीने विचार करून परीक्षा केंद्राची संख्या कमी क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी देणे, कॅशलेस आर्थिक व्यवहाराचे नावावर परीक्षा केंद्रासाठी अग्रिम राशी न देणे, इत्यादी कामे लादत आहेत. पुर्वी शहरात ३-४ परीक्षा केंद्रातून विद्यार्थी परीक्षा देत होते. परीक्षेत १ आसन १ परीक्षार्थी असा नियम आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या क्षमतेनुसार विद्यार्थी संख्याही राहत असे. मागील काही वर्षापासून शहरात बारावी व दहावीच्या परीक्षेकरिता केवळ दोनच केंद्र राहत असल्यामुळे या केंद्रावर क्षमतेपेक्षा जास्त परीक्षार्थी येत आहे. परिणामी, परीक्षा मंडळाच्या नियमाला फाटा मिळत आहे. एका बाकावर दोन विद्यार्थी परीक्षा देत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचण होत असल्याचे दिसून आल्याने दक्षता समितीच्या सदस्यांनी केंद्राच्या क्षमते इतकीच परीक्षार्थी संख्या देण्याची मागणी केली आहे. तसेच या वर्षी कॅशलेस व्यवहाराचे नावावर परीक्षा केंद्राच्या खर्चासाठी अग्रिम राशी देण्यात आली नसल्याने बँकेतून चारदा होणारे आर्थिक व्यवहार त्यानंतर पडणारा भूर्दंड याचाही विचार करण्याची केंद्र संचालकावर वेळ आली आहे. राज्य परीक्षा मंडळाने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)