शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

परीक्षा केंद्रावर क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवू नका!

By admin | Updated: March 4, 2017 00:45 IST

राज्य शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला सुरूवात झाली आहे.

परीक्षार्थ्यांचे हीत जोपासा : दक्षता समिती सदस्यांची मागणी पुलगाव : राज्य शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला सुरूवात झाली आहे. शहरातील दोन केंद्रांवरून शेकडो परीक्षार्थी बारावीचे पेपर देत आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन परीक्षा केंद्रावर क्षमतेपेक्षा जास्त परिक्षार्थी शिक्षण मंडळाने देवू नयेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. परीक्षा काळात विद्यार्थ्यांना शांत चित्ताने व एकाग्रपणे परीक्षा देता यावी यासाठी सर्व परीक्षा केंद्रावर पत्रकार, नगरसेवक, पोलीस प्रशासन यांचा समावेश असलेली दक्षता कमिटी असते. परीक्षापुर्वी या कमिटीची सभा घेण्यात येते. या कमिटीने परीक्षा केंद्रावर क्षमतेपेक्षा जास्त परीक्षार्थी शिक्षण मंडळाने देवू नये, अशी मागणी अनेकदा केली आहे; पण शिक्षण मंडळ या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. फोफावलेल्या शिक्षण संस्था, वाढलेली विद्यार्थी संख्या यामुळे पर्यायाने दहावी, बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढली. वाढलेल्या परीक्षार्थी संख्या व वाढलेले परीक्षा शुल्क यामुळे परीक्षा मंडळ आर्थिक दृष्टीने विचार करून परीक्षा केंद्राची संख्या कमी क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी देणे, कॅशलेस आर्थिक व्यवहाराचे नावावर परीक्षा केंद्रासाठी अग्रिम राशी न देणे, इत्यादी कामे लादत आहेत. पुर्वी शहरात ३-४ परीक्षा केंद्रातून विद्यार्थी परीक्षा देत होते. परीक्षेत १ आसन १ परीक्षार्थी असा नियम आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या क्षमतेनुसार विद्यार्थी संख्याही राहत असे. मागील काही वर्षापासून शहरात बारावी व दहावीच्या परीक्षेकरिता केवळ दोनच केंद्र राहत असल्यामुळे या केंद्रावर क्षमतेपेक्षा जास्त परीक्षार्थी येत आहे. परिणामी, परीक्षा मंडळाच्या नियमाला फाटा मिळत आहे. एका बाकावर दोन विद्यार्थी परीक्षा देत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचण होत असल्याचे दिसून आल्याने दक्षता समितीच्या सदस्यांनी केंद्राच्या क्षमते इतकीच परीक्षार्थी संख्या देण्याची मागणी केली आहे. तसेच या वर्षी कॅशलेस व्यवहाराचे नावावर परीक्षा केंद्राच्या खर्चासाठी अग्रिम राशी देण्यात आली नसल्याने बँकेतून चारदा होणारे आर्थिक व्यवहार त्यानंतर पडणारा भूर्दंड याचाही विचार करण्याची केंद्र संचालकावर वेळ आली आहे. राज्य परीक्षा मंडळाने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)