शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

निसर्गसंहारक विकास नकोच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 05:00 IST

वर्धा ते सेवाग्राम या मार्गावर रुंदीकरण व सौंदर्यीकरणाच्या नावावर राष्ट्रपिता महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी आणि त्यांच्या काळात लावलेली ७० ते ८० जुनी डेरेदार वृक्ष तोडले जात आहे. गेल्या दोन दशकांपासून लावलेल्या वृक्षांची कत्तल सुरू असल्याने ही वृक्षतोड न करता वृक्ष सुरक्षित ठेवून विकास कामे करावी, अशी मागणी शनिवारी सायंकाळी पर्यावरणप्रेमी व वर्धेकरांनी पालकमंत्री सुनील केदार यांना निवेदनातून केली.

ठळक मुद्देक्रांतिदिनी पर्यावरणप्रेमींचा एल्गार : वृक्षतोड थांबवा, अन्यथा चिपको आंदोलनाचा निवेदनातून इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम/वर्धा : महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त सेवाग्राम विकास आराखड्यातील कामांना गती दिल्या जात आहे. यातूनच रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी परिसरातील डेरेदार वृक्ष आडवे केले जात आहेत. जवळपास ७० वृक्ष जमीनदोस्त केले असून १७० वृक्ष तोडण्याची तयारी सुरू असल्याने ‘हा निसर्गसंहारक विकास नकोच’ अशी भूमिका घेत क्रांतिदिनी वर्ध्यातील पर्यावरणप्रेमी एकत्र आले. त्यांनी ही वृक्ष तोड थांबवा, अन्यथा चिपको आंदोलन करू, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.वर्धा ते सेवाग्राम या मार्गावर रुंदीकरण व सौंदर्यीकरणाच्या नावावर राष्ट्रपिता महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी आणि त्यांच्या काळात लावलेली ७० ते ८० जुनी डेरेदार वृक्ष तोडले जात आहे. गेल्या दोन दशकांपासून लावलेल्या वृक्षांची कत्तल सुरू असल्याने ही वृक्षतोड न करता वृक्ष सुरक्षित ठेवून विकास कामे करावी, अशी मागणी शनिवारी सायंकाळी पर्यावरणप्रेमी व वर्धेकरांनी पालकमंत्री सुनील केदार यांना निवेदनातून केली. यादरम्यान चर्चा करण्यात आली; पण त्यावर समाधानकारक तोडगा निघाला नाही. रविवारी सकाळी या मार्गावर पुन्हा वृक्षतोड सुरूच असल्याचे निदर्शनास आल्याने सर्वांनी धाव घेत वृक्षतोड थांबविली. यावेळी डॉ. उल्हास जाजू, करुणा फुटाणे, सुषमा शर्मा, संजय इंगळे तिगावकर, डॉ. नितीन गगणे, सुचि सिन्हा, डॉ. विठ्ठल साळवे, डॉ. अजित प्रसाद जैन, डॉ. ओमप्रकाश गुप्ता, ओजस सु.वि., मुरलीधर बेलखोडे, डॉ. विभा गुप्ता, डॉ. सचिन पावडे, अशोक बंग, सुधीर पांगूळ, प्रा. किरण जाजू, प्रदीप दासगुप्ता, डॉ. लोकेश तमगिरे, डॉ. सोनू मोर, डॉ. प्रणाली कोठेकर, डॉ. सुमेध जाजू, मालती देशमुख, अव्दैत देशपांडे, प्रभाकर पुसदकर, डॉ. आलोक बंग, डॉ. अनुपमा गुप्ता, दिलीप विरखडे, राहुल तेलरांधे, सचिन घोडे, अतुल शर्मा, अनिल फरसोले, निरंजना मारु, अ‍ॅड. पूजा जाधव, अ‍ॅड. कपिलवृक्ष गोडघाटे, मुकेश लुतडे, जीवन अवथरे, किशोर अमृतकर, शरद ताकसांडे, भाग्यश्री उगले, मोहित सहारे, गुरुराज राऊत, वरुडचे सरपंच वासुदेव देवढे याच्यासह असंख्य नागरिकांची उपस्थिती होती.रस्ता रुंदिकरणाकरिता १६० वृक्ष तोडायची आहेत. रस्त्याच्या मधात झाड राहिले तर ते अपघातास कारण ठरु शकते. पर्यावरणप्रेमींच्या भावना समजून घेत पुन्हा पाहणी करुन किती वृक्ष वाचविता येतात, हे बघून पुढील कार्यवाही करणार. तसेच तोडलेल्या वृक्षांच्या तुलनेत अधिक वृक्ष लावली जातील.गजानन टाके, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागशनिवारला मोठ्या प्रमणावर झाडे तोडण्यात आली. पर्यावरणाच्या दृष्टीने हे योग्य नाही. पालकमंत्री सुनील केदार यांना निवेदन दिले आणि झाडे तोडण्याची प्रक्रिया थांबविण्यास सांगितले. तसेच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्या स्वीय सहाय्यकाने याबाबत आश्वस्त केले.सुषमा शर्मा, संचालिका आनंद निकेतन, सेवाग्रामबापू कुटी-सेवाग्राम आश्रमाला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणी पर्यावरण प्रेमी व सामाजिक संघटना सातत्याने करीत आहेत. मात्र, प्रशासन वृक्षतोड करुन जागतिक वारसा स्थळासाठी आवश्यक निकषांना तिलांजली देत आहे. ज्या महात्मा गांधींनी अतिरेकी विकासाला नाकारत वृक्ष संवर्धनाला प्राधान्य दिले, त्याच महात्म्याचा १५० वा जयंती महोत्सव वृक्षांची कत्तल करुन साजरा करण्यात येतो, ही अत्यंत खेदाची बाब आहे.संजय इंगळे तिगावकर, बहार नेचर फाउंडेशनसेवाग्राम परिसरातील दीर्घजीवी वृक्षांची होणारी कत्तल ही अस्वस्थ करणारी आहे. वीस वर्षांपूर्वी निसर्ग सेवा समिती व बापूराव देशमुख स्मारक समिती द्वारे लावलेल्या असंख्य वृक्षांची एकाच दिवशी कत्तल करण्यात आली. ही झाडे जगविण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागले. या वृक्षतोडीमुळे पक्षांचा अधिवास धोक्यात आला आहे. जैव विविधता, वन, वन्यप्राणी यांच्या संवर्धनासाठी आम्ही विकासाच्या मॉडेल पुढे कमी पडतो आहे.मुरलीधर बेलखोडे, अध्यक्ष निसर्ग सेवा समिती

टॅग्स :environmentपर्यावरणSewagramसेवाग्राम