शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

तीन वर्षे बदली करु नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 22:06 IST

शिक्षकांच्या बदल्या संदर्भातील २८ मे २०१९ च्या शासन निर्णयामुळे अनेक शिक्षकांवर अन्याय होणार असल्याने हा शासन निर्णय रद्द करण्यात यावा तसेच मागील वर्षी पतीपत्नी एकत्रिकरणातून झालेल्या बदलीतील जोडीदारास बदलीस पात्र ठरवू नये आणि दोघांचीही तीन वर्ष बदली करुन नये यासह अनेक मागण्यांचे निवेदन राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांना निवेदन : ग्रामीण विकास सचिवांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शिक्षकांच्या बदल्या संदर्भातील २८ मे २०१९ च्या शासन निर्णयामुळे अनेक शिक्षकांवर अन्याय होणार असल्याने हा शासन निर्णय रद्द करण्यात यावा तसेच मागील वर्षी पतीपत्नी एकत्रिकरणातून झालेल्या बदलीतील जोडीदारास बदलीस पात्र ठरवू नये आणि दोघांचीही तीन वर्ष बदली करुन नये यासह अनेक मागण्यांचे निवेदन राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे.पतीपत्नी एकत्रिकरण व मागील वर्षी झालेल्या बदल्यामधील विस्थापित आणि रॅडम राऊंडमधील शिक्षक तसेच एकल शिक्षक या सर्वांच्या सोयीच्या बदल्या व्हाव्या. मूळ शासन निर्णयातील तरतुदी प्रमाणे टप्याटप्याने बदली करावी, त्यामुळे एकल शिक्षकाला न्याय मिळेल. अशा समस्यांसदर्भात प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने पालकमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. यावेळी खासदार रामदास तडस यांनाही निवेदन देण्यात आले. पालकमंत्री मुनगंटीवार यांनी शिक्षकांच्या या निवदेनाची दखल घेऊन ग्रामीण विकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या सोबत संपर्क साधून चर्चा केली. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात झालेल्या चर्चेदरम्यान आमदार समीर कुणावार, आमदार रामदास आंबटकर, माजी आमदार दादाराव केचे व जि.प. अध्यक्ष नितीन मडावी व सभापती जयश्री गफाट व मुकेश भिसे, भाजपा जिल्हा सरचिटणीस सुनिल गफाट, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने उपस्थिती होते. शिक्षक संघाच्या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष लोमेश वºहाडे, विभागीय अध्यक्ष अरुण झोटिंग, अजय गावंडे, सुनिल कोल्हे, अनिल पवार, पंढरी तडस, मोहन कोठे, दीप नाखले, आशिष सोनटके, प्रफुल्ल लिखार, गोविंद वाटगुळे, अरविंद बगडे, संजय भगत, दिलीप झाडे, गजानन सोरट, उल्हास शेळके, किशोर बोरकुटे, सुनिल देवढे, मनवरे आदी उपस्थित होते.बदली प्रक्रियेवरून गोंधळाची स्थिती कायमवर्धा जिल्हा परिषदेत गेल्या वर्षी करण्यात आलेल्या बदल्यामध्ये मोठा घोळ झाला आहे. यात अनेक शिक्षकांवर अन्याय झाला आहे. आंतर जिल्हा बदलीत अनेक शिक्षक दुसऱ्या जिल्ह्यातून बदलून आलेत त्यामुळे अनेक जण अतिरिक्त ठरले. त्यांना न्याय देण्यात आला नाही, अशी स्थिती आहे.