शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

तीन वर्षे बदली करु नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 22:06 IST

शिक्षकांच्या बदल्या संदर्भातील २८ मे २०१९ च्या शासन निर्णयामुळे अनेक शिक्षकांवर अन्याय होणार असल्याने हा शासन निर्णय रद्द करण्यात यावा तसेच मागील वर्षी पतीपत्नी एकत्रिकरणातून झालेल्या बदलीतील जोडीदारास बदलीस पात्र ठरवू नये आणि दोघांचीही तीन वर्ष बदली करुन नये यासह अनेक मागण्यांचे निवेदन राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांना निवेदन : ग्रामीण विकास सचिवांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शिक्षकांच्या बदल्या संदर्भातील २८ मे २०१९ च्या शासन निर्णयामुळे अनेक शिक्षकांवर अन्याय होणार असल्याने हा शासन निर्णय रद्द करण्यात यावा तसेच मागील वर्षी पतीपत्नी एकत्रिकरणातून झालेल्या बदलीतील जोडीदारास बदलीस पात्र ठरवू नये आणि दोघांचीही तीन वर्ष बदली करुन नये यासह अनेक मागण्यांचे निवेदन राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे.पतीपत्नी एकत्रिकरण व मागील वर्षी झालेल्या बदल्यामधील विस्थापित आणि रॅडम राऊंडमधील शिक्षक तसेच एकल शिक्षक या सर्वांच्या सोयीच्या बदल्या व्हाव्या. मूळ शासन निर्णयातील तरतुदी प्रमाणे टप्याटप्याने बदली करावी, त्यामुळे एकल शिक्षकाला न्याय मिळेल. अशा समस्यांसदर्भात प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने पालकमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. यावेळी खासदार रामदास तडस यांनाही निवेदन देण्यात आले. पालकमंत्री मुनगंटीवार यांनी शिक्षकांच्या या निवदेनाची दखल घेऊन ग्रामीण विकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या सोबत संपर्क साधून चर्चा केली. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात झालेल्या चर्चेदरम्यान आमदार समीर कुणावार, आमदार रामदास आंबटकर, माजी आमदार दादाराव केचे व जि.प. अध्यक्ष नितीन मडावी व सभापती जयश्री गफाट व मुकेश भिसे, भाजपा जिल्हा सरचिटणीस सुनिल गफाट, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने उपस्थिती होते. शिक्षक संघाच्या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष लोमेश वºहाडे, विभागीय अध्यक्ष अरुण झोटिंग, अजय गावंडे, सुनिल कोल्हे, अनिल पवार, पंढरी तडस, मोहन कोठे, दीप नाखले, आशिष सोनटके, प्रफुल्ल लिखार, गोविंद वाटगुळे, अरविंद बगडे, संजय भगत, दिलीप झाडे, गजानन सोरट, उल्हास शेळके, किशोर बोरकुटे, सुनिल देवढे, मनवरे आदी उपस्थित होते.बदली प्रक्रियेवरून गोंधळाची स्थिती कायमवर्धा जिल्हा परिषदेत गेल्या वर्षी करण्यात आलेल्या बदल्यामध्ये मोठा घोळ झाला आहे. यात अनेक शिक्षकांवर अन्याय झाला आहे. आंतर जिल्हा बदलीत अनेक शिक्षक दुसऱ्या जिल्ह्यातून बदलून आलेत त्यामुळे अनेक जण अतिरिक्त ठरले. त्यांना न्याय देण्यात आला नाही, अशी स्थिती आहे.