शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

तीन वर्षे बदली करु नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 22:06 IST

शिक्षकांच्या बदल्या संदर्भातील २८ मे २०१९ च्या शासन निर्णयामुळे अनेक शिक्षकांवर अन्याय होणार असल्याने हा शासन निर्णय रद्द करण्यात यावा तसेच मागील वर्षी पतीपत्नी एकत्रिकरणातून झालेल्या बदलीतील जोडीदारास बदलीस पात्र ठरवू नये आणि दोघांचीही तीन वर्ष बदली करुन नये यासह अनेक मागण्यांचे निवेदन राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांना निवेदन : ग्रामीण विकास सचिवांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शिक्षकांच्या बदल्या संदर्भातील २८ मे २०१९ च्या शासन निर्णयामुळे अनेक शिक्षकांवर अन्याय होणार असल्याने हा शासन निर्णय रद्द करण्यात यावा तसेच मागील वर्षी पतीपत्नी एकत्रिकरणातून झालेल्या बदलीतील जोडीदारास बदलीस पात्र ठरवू नये आणि दोघांचीही तीन वर्ष बदली करुन नये यासह अनेक मागण्यांचे निवेदन राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे.पतीपत्नी एकत्रिकरण व मागील वर्षी झालेल्या बदल्यामधील विस्थापित आणि रॅडम राऊंडमधील शिक्षक तसेच एकल शिक्षक या सर्वांच्या सोयीच्या बदल्या व्हाव्या. मूळ शासन निर्णयातील तरतुदी प्रमाणे टप्याटप्याने बदली करावी, त्यामुळे एकल शिक्षकाला न्याय मिळेल. अशा समस्यांसदर्भात प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने पालकमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. यावेळी खासदार रामदास तडस यांनाही निवेदन देण्यात आले. पालकमंत्री मुनगंटीवार यांनी शिक्षकांच्या या निवदेनाची दखल घेऊन ग्रामीण विकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या सोबत संपर्क साधून चर्चा केली. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात झालेल्या चर्चेदरम्यान आमदार समीर कुणावार, आमदार रामदास आंबटकर, माजी आमदार दादाराव केचे व जि.प. अध्यक्ष नितीन मडावी व सभापती जयश्री गफाट व मुकेश भिसे, भाजपा जिल्हा सरचिटणीस सुनिल गफाट, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने उपस्थिती होते. शिक्षक संघाच्या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष लोमेश वºहाडे, विभागीय अध्यक्ष अरुण झोटिंग, अजय गावंडे, सुनिल कोल्हे, अनिल पवार, पंढरी तडस, मोहन कोठे, दीप नाखले, आशिष सोनटके, प्रफुल्ल लिखार, गोविंद वाटगुळे, अरविंद बगडे, संजय भगत, दिलीप झाडे, गजानन सोरट, उल्हास शेळके, किशोर बोरकुटे, सुनिल देवढे, मनवरे आदी उपस्थित होते.बदली प्रक्रियेवरून गोंधळाची स्थिती कायमवर्धा जिल्हा परिषदेत गेल्या वर्षी करण्यात आलेल्या बदल्यामध्ये मोठा घोळ झाला आहे. यात अनेक शिक्षकांवर अन्याय झाला आहे. आंतर जिल्हा बदलीत अनेक शिक्षक दुसऱ्या जिल्ह्यातून बदलून आलेत त्यामुळे अनेक जण अतिरिक्त ठरले. त्यांना न्याय देण्यात आला नाही, अशी स्थिती आहे.