शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

दुभाजकाची माती रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 00:34 IST

वर्धा शहरातील बॅचलर रस्त्याचे नुकतेच रूंदीकरण व सिमेंटीकरण करण्यात आले. यात रस्ता निर्मिती करताना दुभाजक सोडण्यात आले. रस्ता सुरू झाल्यानंतर बांधकाम विभागाकडून आता दुभाजकाचे काम सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देरस्ता झाला अर्धा : वाहतुकीस अडथळा, अपघाताची शक्यता बळावली

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा शहरातील बॅचलर रस्त्याचे नुकतेच रूंदीकरण व सिमेंटीकरण करण्यात आले. यात रस्ता निर्मिती करताना दुभाजक सोडण्यात आले. रस्ता सुरू झाल्यानंतर बांधकाम विभागाकडून आता दुभाजकाचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम करताना रस्ता दुभाजकाकरिता तयार करण्यात आलेल्या खड्ड्यातील माती रस्त्यावर येत असल्याने वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. या मातीमुळे वाहने घसरल्याने येथे किरकोळ अपघात झाले आहे. यामुळे बांधकाम विभागाकडून ही माती त्वरीत उचलण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.खड्ड्यातील माती रस्त्याच्या मधोमध आल्याने रस्त्याची रूंदी कमी झाली आहे. यामुळे येथून वाहने चालवितानाही मोठी अडचण निर्माण होत आहे. येथून वाहने नेताना पुरेशी जागा मिळत नसल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. या रस्त्याने मोठे महविद्यालय, दवाखाना, मंगलकार्यालय आहे. शिवाय शहरातील सर्वाधिक शिकवणी वर्ग याच मार्गावर असल्याने येथे वाहनांची गर्दी होते. यामुळे अपघाताची समस्या निर्माण झाली आहे. रस्त्यावर असलेली माती बांधकाम विभागाने उचलाची किंवा दुभाजकात भरावी अशी मागणी होत आहे.रस्त्याच्या मधोमध असलेल्या या मातीच्या ढिगाऱ्यामुळे रात्रीच्यावेळी येथून चारचाकी वाहने चालविणे कठीण झाले आहे. रस्त्याच्या मधोमध माती आणि रस्त्याच्या कडेला खचका तयार झाल्याने वाहन रस्त्याच्या खाली जाण्याची शक्यता आहे. या मातीच्या ढिगावरून वाहन नेल्यास ते दुभाजकाला लावण्याकरिता तयार केलेल्या सिमेंटच्या प्लेटांवर जाण्याची शक्यता आहे. तसे प्रकार येथे घडलेही आहेत. नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्याच घरासमोर एक कार रस्त्याच्या कडेला घसरल्याचे दिसून आले. तर लोक महाविद्यालयाजवळ रस्ता दुभाजकाच्या खड्ड्यांत वाहन उतरल्याचा प्रकारही येथे घडला आहे. यात मोठा अपघात झाला नसला तरी यातून मोठी घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याकडे बांधकाम विभागाच्यावतीने लक्ष देत कार्यवाही करून ही माती उचलण्याची गरज आहे. अन्यथा येथे मोठी घटना घडण्याची शक्यता आहे.मातीमुळे उडत असलेल्या धुळीमुळे आसपासच्या नागरिकांसह व्यावसायिक त्रस्तरस्त्यावर असलेल्या माहितीमुळे येथून वाहन जाताच धूळ मोठ्या प्रमाणात उघते. ही धूळ येथे आसपासच्या दुकानात उघडत असल्याने येथील व्यावसायिक यामुळे त्रस्त झाले आहे. केवळ व्यावसायिकच नाही तर या भागातील नागरिकही त्रस्त झाले आहे. दारे खिडक्या बंद असल्या तरी नकळत मोठ्या प्रमाणात धूळ घरात येते. घरातील महागड्या वस्तुंवरही धुळाचा थर साचत असल्याचे दिसून आले आहे. या धुळामुळे घरातील वस्तू खराब होत असून नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. नागरिकांची ही समस्या टाळण्याकरिता माती उचलण्याची मागणी आहे.