शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

दिव्यांग बांधवांनी दिली तहसीलदारांना गाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:13 IST

दिव्यांगांच्या समस्या अनेक दिवसांपासून तशाच पडून आहेत. या समस्या मार्गी लावण्याकरिता अनेकवेळा आंदोलने झाली. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. यामुळे शुक्रवारी प्रहारच्यावतीने देवळी तहसील कार्यालय गाठून अनोखे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देप्रहारचे आंदोलन : त्वरित मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिव्यांगांच्या समस्या अनेक दिवसांपासून तशाच पडून आहेत. या समस्या मार्गी लावण्याकरिता अनेकवेळा आंदोलने झाली. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. यामुळे शुक्रवारी प्रहारच्यावतीने देवळी तहसील कार्यालय गाठून अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी दिव्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जास्तीचे काम करावे लागत असल्यास आर्थिक नुकसान होवू नये, शिवाय आपणस जोडधंदा करता यावा, असे म्हणत आंदोलकांनी तहसीलदारांना चक्क गाय भेट दिली.देवळी तालुक्यात दिव्यांगांच्या कोणत्याही समस्यांचे निराकरण झाले नाही. याबाबत विचारणा केली असता कर्मचारी नसल्यामुळे अडचणी जात असल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे. यामुळे दिव्यांगांच्या समस्यांचा डोंगर दिवसेंदिवस मोठा होत आहे. आपणास वारंवार माहिती मागुनही पं.स. व ग्रामपंचायत स्थरावरील ३ टक्के निधीचा खर्च करण्यात येत नाही. अपंगांना घरकूलमध्ये प्राधान्य दिले जात नाही. जि.प. अथवा शासनाच्या विविध योजना ग्रामपंचायत स्तरावर सचिव दिव्यांगापर्यंत पोहचवित नाही. १४ व्या वित्त आयोगांतर्गत आराखडा मंजूर करतेवेळी दिव्यांगांना गृहीत धरुन एकही योजना तयार करण्यात आली नाही. पं.स. अंतर्गत येणाऱ्या विविध योजनामध्ये दिव्यांगाना त्यांच्या आरक्षणानुसार समावून घेत नाही. अशा असंख्य अडचणी आहेत. शासकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग आम्हाला सकारात्मक निर्णय घेण्याच्या आश्वासनापलीकडे काहीही करीत नाही. शासन शेतकरी व गरिबांना शेतीला जोडधंदा नफ्याचा व्हावा म्हणून शेतकºयांना गाय, म्हैस, बकऱ्या व कोंबड्या देतात. त्याच धर्तीवर अपंगांच्या समस्या सोडविण्यासाठी जास्त वेळ जर काम करावे लागत असेल तर संघटना आपले आर्थिक नुकसान टाळण्यासाठी गाय भेट देत असल्याचे आंदोलकांनी यावेळी सांगितले. गायीमुळे आपणही जोडधंदा करून जास्तीचे उत्पन्न मिळवाल व दिव्यांगांच्या समस्यांची देऊन सोडवणूक कराल, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.