शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवा, नाहीतर युक्रेनला टॉमहॉक मिसाईल देईन"; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा
2
"माझ्या मुलीला प्रचंड वेदना होताहेत...", वडिलांचा टाहो; पीडितेची प्रकृती गंभीर, मित्रावर संशय
3
सोने-चांदीच्या भावात बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढ; महाराष्ट्रातील सराफा व्यापारी म्हणतात, आणखी वाढणार....
4
दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरण: "माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, चुकीचा अर्थ काढला गेला", 'त्या' विधानावर ममतांचं स्पष्टिकरण
5
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२५ : वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस धनलाभाचा, पण इतर राशींना...
6
बिहारमध्ये एनडीएचे ठरले; भाजप-जदयूला समान जागा, 'लोजपा'ला २९ तर 'रालोमो'ला ६ जागा
7
राज ठाकरे सहकुटुंब पोहचले मातोश्रीवर; चर्चा राजकीय? निमित्त स्नेहभोजनाचे, तीन महिन्यात दोघांची सातवी भेट 
8
भारताच्या सरन्यायाधीशांच्या अवमानाचा प्रयत्न निंदनीय, अपमानाच्या अपराधावर काही गंभीर प्रश्न...
9
मुंबई महापालिकेत सध्याचे आरक्षित प्रभाग बदलणार; चक्राकार पद्धतीने सोडत; इच्छुकांना संधीची आशा
10
अत्यंत लाजिरवाणी घटना, भारताच्या भूमीत हे घडावे...?
11
अखेर महिला पत्रकारांना अफगाणिस्तानचे निमंत्रण
12
Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
13
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
14
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
15
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
16
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
17
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
18
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
19
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
20
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल

जिल्ह्याची पैसेवारी ५० च्यावर

By admin | Updated: March 13, 2016 02:24 IST

जिल्ह्यातील अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांची पिके गेली. यामुळे सुधारित पैसेवारीत जिल्ह्याची पैसेवारी ५० च्या आत असल्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांनी जाहीर केले.

शासनाचे आदेश : दुष्काळाच्या सावटात शेतकरी वाऱ्यावर वर्धा: जिल्ह्यातील अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांची पिके गेली. यामुळे सुधारित पैसेवारीत जिल्ह्याची पैसेवारी ५० च्या आत असल्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांनी जाहीर केले. जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेला अहवाल शासनाने अमान्य करीत जिल्ह्यातील १,३४० गावांची पैसेवारी ५० च्यावर असल्याचे जाहीर केले. यामुळे दुष्काळाच्या छायेत असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाने वाऱ्यावर सोडल्याच्या प्रतिक्रीया उमटत आहेत. नागपूर विभागात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असलेला जिल्हा म्हणून वर्धेची ओळख आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर शासनाकडून करण्यात आलेला हा आघात त्यांचे जीवन संपविणारा आहे. शासनाच्या या आदेशामुळे कुठल्याही योजनेचा लाभ या शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचे बोलले जात आहे. यामुळे जिल्ह्यातील गावात अल्पमुदती कर्जाचे मध्यम मुदत कर्जात पुनर्गठन करण्यास मान्यता, शेतीशी निगडीत कर्जवसुलीस स्थगिती अशा सवलतीमधून, संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वगळ्यात येत असल्याचे काढण्यात आलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. या शासन निर्णयाप्रमाणे जिल्ह्यातील शेतकरी हे दुष्काळ सवलतीस पात्र नाहीत. यामुळे आता या शेतकऱ्यांवर विविध बँकाकडून कर्जवसुलीचा वरवंटा फिरणार असल्याचे दिसते. पावसाळ्याच्या दिवसात पावसात सातत्य नसल्याने पिकांचे नुकसान झाले. यात शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी झाले. त्याची भरपाई रबी हंगामात करण्याची शेतकऱ्यांची तयारी असताना अचानक आलेला वादळी पाऊस व गारपीटीमुळे तोंडचा घास गेला. जिल्ह्यात आठवडाभर आलेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यात शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा होती. अशात पावसाळ्याच्या दिवसात दुष्काळी परिस्थिती असताना जिल्ह्याची पैसेवारी शासनाने ५० च्यावर जाहीर केली. यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीच्या आशा आता पुरत्या मावळल्या आहेत. यामुळे काय करावे, येता हंगाम कसा करावा या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. पैसेवारीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन वर्धा : शासनाच्या पैसेवारीच्या निर्णयाविरूद्ध १७ मार्च रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याचे महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने कळविण्यात आले आहे. तसे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. निवेदनातून जिल्हा हा ५० पैशांच्या आत असल्याच्या पैसेवारीचा शासन निर्णय काढून, कर्जवसुली स्थगिती व इतर मदत सवलती शेतकऱ्यांना द्या, अशी मागणी करण्यात आल्याची माहिती परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, जिल्हा संघटक विनय डहाके, विजय मुळे, निळकंठ राऊत, संजय म्हस्के, निळकंठ पिसे, केशव तितरे, सुरेश सातोकर, प्रदीप डगवार, संजय भगत, अभय पुसदकर, भरत चौधरी, अंबादास चौधरी, चंद्रकांत भोयर, सुनील पाटील आदींनी दिली आहे.(प्रतिनिधी)