शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
3
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
4
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
5
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
6
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
7
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
8
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
9
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
10
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
11
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
12
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
13
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
14
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
15
Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
16
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
17
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
18
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
19
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
20
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

सुसुंदच्या ग्रामस्थांची जिल्हा कचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 22:10 IST

सुसुंद परिसरात वन्य प्राण्यांचा वावर असून वाघाच्या हल्ल्यात आमगाव (जं.) येथील एक युवक ठार झाल्याची घटना ताजी आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांसह हैदोसामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देयुवा परिवर्तनच्या नेतृत्वात मोर्चा काढून रेटली पुनर्वसनची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सुसुंद परिसरात वन्य प्राण्यांचा वावर असून वाघाच्या हल्ल्यात आमगाव (जं.) येथील एक युवक ठार झाल्याची घटना ताजी आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांसह हैदोसामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे सुसुंद या गावाचे पुनर्वसन करण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवारी युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्वात पोस्ट आॅफिस चौक येथून जिल्हा कचेरीपर्यंत मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनादरम्यान सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.सुसुंद गावाला लागून बोर व्याघ्र प्रकल्प आहे. या प्रकल्पात वाघ, अस्वल, बिबट, रोही आदी वन्य प्राणी आहेत. यात वनविभागाकडून मिळणारी मदत तोकडीच आहे. दरम्यान, आमगाव (ज.) येथील घटनेनंतर पोलीस, वन विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी आणि संतप्त ग्रामस्थांमध्ये वाद झाला होता. यावेळी ग्रामस्थांची गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. सुसुंद या गावातील नागरिकांना सध्या दहशतीच्या वातावरणात जगावे लागत असल्याने या गावाचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणीही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.स्थानिक पोस्ट आॅफिस चौक येथून काढण्यात आलेला मोर्चा सुरुवातीला पोलिसांनी न्यायालयाच्या मुख्य द्वारासमोर अडविला; परंतु, यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या काहींनी पोलिसांना एवढ्या उन्हात आम्ही येथे कसे थांबणार, असे म्हणत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जावू देण्याची विनंती केली. त्यावर बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी संमती दर्शविल्याने मोर्चा जिल्हाकचेरीपर्यंत पोहोचला. याप्रसंगी पुन्हा एकदा पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यद्वारावर अडविले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. आंदोलनाचे नेतृत्व युवा परिवर्तन की आवाजचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे, जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार, समीर गिरी यांनी केले. मोर्चात युवा परिवर्तनच्या सदस्यांसह गावकरी सहभागी झाले होते.जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापुढे ठिय्याजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन चर्चा करण्यासाठी पोलिसांनी मोजक्याच व्यक्तींना दालनात सोडले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन चर्चेदरम्यान इतर आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या दिला.पोलीस आंदोलकात शाब्दीक चकमकपुनर्वसनच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चाला पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य द्वारासमोर अडविले. संपूर्ण आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी न जाता केवळ पाच जणांनीच जावे असे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले. त्यावर निवेदन देण्यासाठी जाणाऱ्या शिष्टमंडळात कमीत कमी दहा व्यक्तींना जिल्हाधिकारी कार्यालयात जावू द्यावे, अशी विनंती याप्रसंगी प्रशांत पवार यांनी केली. या मुद्दावर आंदोलक आणि पोलिसांत चांगलीच शाब्दीक चकमक उडाली होती.

टॅग्स :Morchaमोर्चा