शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

जिल्हाधिकाऱ्यांची भेट नगर प्रशासनाची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 22:27 IST

डेंग्यू सदृश्य आजाराचे वाढते प्रमाण व शहरातील स्वच्छता मोहीम याकडे नगर प्रशासनासोबतच सर्वसामान्य नागरिकांनाही आपले कर्तव्य म्हणून लक्ष देणे गरजेचे आहे. केवळ नगर प्रशासनाचीच ही जबाबदारी नव्हे, शहरातील अनेक भागात नगर प्रशासनाने भूमीगत नाल्या बांधून गल्ली बोळात स्वच्छतेच्या व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता अभियान राबविण्याचा प्रयत्न केला आहे.

ठळक मुद्देशैलेश नवाल : स्वच्छता अभियान लोक चळवळ व्हावी

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : डेंग्यू सदृश्य आजाराचे वाढते प्रमाण व शहरातील स्वच्छता मोहीम याकडे नगर प्रशासनासोबतच सर्वसामान्य नागरिकांनाही आपले कर्तव्य म्हणून लक्ष देणे गरजेचे आहे. केवळ नगर प्रशासनाचीच ही जबाबदारी नव्हे, शहरातील अनेक भागात नगर प्रशासनाने भूमीगत नाल्या बांधून गल्ली बोळात स्वच्छतेच्या व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता अभियान राबविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु नागरिकांनी आपल्या कर्तव्याचा व जबाबदारीचा विसर पडत असल्याचे चित्र काही गल्ली बोळातून दिसून आले. स्वच्छता अभियान हे केवळ अभियान न राहता लोकचळवळ व्हावी, असा मौलीक सल्ला जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शहरात दिलेल्या अचानक भेटी दरम्यान दिला.शहरातील डेंग्यू सदृश्य आजाराचे प्रमाण वाढत असून आतापर्यंत ५ बालक या रोगाचे बळी पडले आहेत. ज्या ज्या भागात या घटना घडल्या त्या त्या भागात गुरूवारी सकाळीच जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले व अनेक अधिकारी शहरात अचानक दाखल झाल्यामुळे स्थानिक नगर प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. जिल्हाधिकारी, अधिकारी, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष यांचा आलेला ताफा पाहून शहरवासियांनी अनेक समस्यांचा पाढा त्यांचे समोर मांडला.जिल्हाधिकाºयांनी नगर परिषदेच्या स्वच्छता अभियानाची काही ठिकाणी प्रशंसा केली तर काही ठिकाणी तीव्र नाराजी नोंदविली. नागरिकांनी नगर परिषदेच्या घंटागाड्या नियमीतपणे येत नाही. गल्लीबोळातील वाढते अतिक्रमण या बाबत नगर परिषदेत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे तक्रारी केल्या असता पत्रकारांशी बोलताना व मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांना सूचना देताना ते म्हणाले ‘स्वच्छता अभियान राबविताना संत गाडगेबाबा व राष्टÑसंत तुकडोजी महाराज यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून कार्य करा, सार्वजनिक आरोग्य व लोकहीत महत्वाचे आहे. त्यात ते काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे की नगर परिषदेचे हा विचार न करता सार्वजनिक आरोग्याला महत्व द्या, लोकहिताच्या कार्यात गल्लीबोळातील अतिक्रमण आड येत असेल तर महाराष्ट्र नगर परिषद अधिनियमातील कायद्याचा वापर करा, अशा सूचनाही त्यांनी नगर प्रशासनाला दिल्या.शहरातील काही गल्लीबोळातील नाल्या मोठा नाला, स्वच्छता पाहत त्यांनी नगर परिषद व ग्रामीण रुग्णालयास प्रत्यक्ष भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांचे सोबत डॉ. सचिन पावडे, कारंजा नगर पंचायत मुख्याधिकारी पल्लवी राऊत, देवळी न.प. मुख्याधिकारी जाधव, वर्धा तहसीलदार बांबोर्डे, नायब तहसीलदार वरपे, नायब तहसीलदार उल्हास राठोड, नगराध्यक्षा शितल गाते, उपाध्यक्ष आशिष गांधी, संजय गाते, नितीन बडगे, कॉँग्रेस शहराध्यक्ष रमेश सावरकर, शिवसेनेचे बाळू शहागडकर, अ‍ॅड. माथने, भाजपा शहराध्यक्ष मंगेश झाडे, नागरिक सेवा समितीचे गिरीष चौधरी, डॉ. प्रमोद नितनवरे, नगरसेवक गौरव दांडेकर, माधुरी इंगळे, काळे यांचेसह नगरसेवक मोठ्या संख्येत नागरिकही सहभागी होते. याप्रसंगी ग्राम पंचायत नाचणगावातही तक्रारी करण्यात आल्या.गल्लीतही पोहचले ेजिल्हाधिकारीसकाळी शहरातील इंदिरा नगर, सुदर्शन नगर, गांधीनगर, हरिरामनगर आदीसह काही भागात जिल्हाधिकारी व इतर अधिकाºयांनी स्वच्छता अभियान डेंग्यू सदृश्य आजाराबाबत आरोग्य यंत्रणा स्वच्छता अभियान याबाबत पाहणी केली. पत्रकारांनी प्रश्नाचा केलेला भडीमार नागरिकांनी केलेल्या तक्रारी याबाबत शांतपणे जिल्हाधिकाºयांनी सर्वांशी सुसंवाद साधता नगर प्रशासनाला व ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. गोपाळ नारलवार यांनाही सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता अभियानाबाबत सूचना दिल्या.