शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

वॉटर कप स्पर्धेचा जिल्हास्तरीय निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 23:04 IST

उन्हाळ्याच्या दिवसात ४५ दिवस वर्धा जिल्ह्यातील अनेक गावात नागरिकांनी आपले गाव पाणी दार बनविण्यासाठी श्रमदान केले. नागरिकांच्या या श्रमदानाला ११० अधिक स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा हात दिला. त्यामुळे अनेक गावात पहिल्याच पावसात केलेल्या श्रमदानातील कामात जलसंचय निर्माण झाला आहे. या वॉटर कप स्पर्धेअंतर्गत जिल्हास्तरीय निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. चार तालुक्यातील प्रत्येक तीन गावांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे१२ गावांना पुरस्कार : गावकऱ्यांच्या श्रमदानाने झाली जलक्रांती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : उन्हाळ्याच्या दिवसात ४५ दिवस वर्धा जिल्ह्यातील अनेक गावात नागरिकांनी आपले गाव पाणी दार बनविण्यासाठी श्रमदान केले. नागरिकांच्या या श्रमदानाला ११० अधिक स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा हात दिला. त्यामुळे अनेक गावात पहिल्याच पावसात केलेल्या श्रमदानातील कामात जलसंचय निर्माण झाला आहे. या वॉटर कप स्पर्धेअंतर्गत जिल्हास्तरीय निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. चार तालुक्यातील प्रत्येक तीन गावांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा -३, २०१८ मध्ये जिल्ह्यात ९६ वर अधिक गावे सहभागी झाले होते. त्यानंतर काही गावांनी माघार घेतली. परंतु अनेक गावांनी ४५ दिवस श्रमदान करून आपले गाव पाणीदार बनविण्याचा वसा उचलला. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून आर्वी तालुक्यातील पिंपळधरीबाई या गावाला तालुका स्तरावरचा पहिला पुरस्कार जाहीर झाला आहे. द्वितीय पुरस्कार बोदड तर तृतीय पुरस्कार हिवरा गावाला देण्यात येणार आहे. कारंजा (घाडगे) तालुक्यातील लिंगा मंडवी ला प्रथम, किन्हाळ्याला द्वितीय तर नांदोरा या गावाला तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे. सेलू तालुक्यात खडका गावाला प्रथम, गायमुखला द्वितीय तर पिंपळगावला तृतीय पुरस्कार मिळाला आहे. देवळी तालुक्यात तळणी (भागवत) ला प्रथम, फत्तेपुरला द्वितीय तर कविटगावला तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यस्तरीय वॉटर कप स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभही पुणे येथे रविवारी पार पडला. या जिल्ह्यातील एकाही गावाला पुरस्कार मिळाला नाही.अनेकांचे हात लागले श्रमदानातगावकºयांच्या मदतीला वैद्यकीय जनजागृती मंच यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी श्रमदानासाठी सहकार्य केले. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी अनेक गावात जाऊन श्रमदान करून नागरिकांचा उत्साह वाढविला.