शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

वॉटर कप स्पर्धेचा जिल्हास्तरीय निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 23:04 IST

उन्हाळ्याच्या दिवसात ४५ दिवस वर्धा जिल्ह्यातील अनेक गावात नागरिकांनी आपले गाव पाणी दार बनविण्यासाठी श्रमदान केले. नागरिकांच्या या श्रमदानाला ११० अधिक स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा हात दिला. त्यामुळे अनेक गावात पहिल्याच पावसात केलेल्या श्रमदानातील कामात जलसंचय निर्माण झाला आहे. या वॉटर कप स्पर्धेअंतर्गत जिल्हास्तरीय निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. चार तालुक्यातील प्रत्येक तीन गावांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे१२ गावांना पुरस्कार : गावकऱ्यांच्या श्रमदानाने झाली जलक्रांती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : उन्हाळ्याच्या दिवसात ४५ दिवस वर्धा जिल्ह्यातील अनेक गावात नागरिकांनी आपले गाव पाणी दार बनविण्यासाठी श्रमदान केले. नागरिकांच्या या श्रमदानाला ११० अधिक स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा हात दिला. त्यामुळे अनेक गावात पहिल्याच पावसात केलेल्या श्रमदानातील कामात जलसंचय निर्माण झाला आहे. या वॉटर कप स्पर्धेअंतर्गत जिल्हास्तरीय निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. चार तालुक्यातील प्रत्येक तीन गावांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा -३, २०१८ मध्ये जिल्ह्यात ९६ वर अधिक गावे सहभागी झाले होते. त्यानंतर काही गावांनी माघार घेतली. परंतु अनेक गावांनी ४५ दिवस श्रमदान करून आपले गाव पाणीदार बनविण्याचा वसा उचलला. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून आर्वी तालुक्यातील पिंपळधरीबाई या गावाला तालुका स्तरावरचा पहिला पुरस्कार जाहीर झाला आहे. द्वितीय पुरस्कार बोदड तर तृतीय पुरस्कार हिवरा गावाला देण्यात येणार आहे. कारंजा (घाडगे) तालुक्यातील लिंगा मंडवी ला प्रथम, किन्हाळ्याला द्वितीय तर नांदोरा या गावाला तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे. सेलू तालुक्यात खडका गावाला प्रथम, गायमुखला द्वितीय तर पिंपळगावला तृतीय पुरस्कार मिळाला आहे. देवळी तालुक्यात तळणी (भागवत) ला प्रथम, फत्तेपुरला द्वितीय तर कविटगावला तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यस्तरीय वॉटर कप स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभही पुणे येथे रविवारी पार पडला. या जिल्ह्यातील एकाही गावाला पुरस्कार मिळाला नाही.अनेकांचे हात लागले श्रमदानातगावकºयांच्या मदतीला वैद्यकीय जनजागृती मंच यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी श्रमदानासाठी सहकार्य केले. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी अनेक गावात जाऊन श्रमदान करून नागरिकांचा उत्साह वाढविला.