शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

वॉटर कप स्पर्धेचा जिल्हास्तरीय निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 23:04 IST

उन्हाळ्याच्या दिवसात ४५ दिवस वर्धा जिल्ह्यातील अनेक गावात नागरिकांनी आपले गाव पाणी दार बनविण्यासाठी श्रमदान केले. नागरिकांच्या या श्रमदानाला ११० अधिक स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा हात दिला. त्यामुळे अनेक गावात पहिल्याच पावसात केलेल्या श्रमदानातील कामात जलसंचय निर्माण झाला आहे. या वॉटर कप स्पर्धेअंतर्गत जिल्हास्तरीय निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. चार तालुक्यातील प्रत्येक तीन गावांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे१२ गावांना पुरस्कार : गावकऱ्यांच्या श्रमदानाने झाली जलक्रांती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : उन्हाळ्याच्या दिवसात ४५ दिवस वर्धा जिल्ह्यातील अनेक गावात नागरिकांनी आपले गाव पाणी दार बनविण्यासाठी श्रमदान केले. नागरिकांच्या या श्रमदानाला ११० अधिक स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा हात दिला. त्यामुळे अनेक गावात पहिल्याच पावसात केलेल्या श्रमदानातील कामात जलसंचय निर्माण झाला आहे. या वॉटर कप स्पर्धेअंतर्गत जिल्हास्तरीय निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. चार तालुक्यातील प्रत्येक तीन गावांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा -३, २०१८ मध्ये जिल्ह्यात ९६ वर अधिक गावे सहभागी झाले होते. त्यानंतर काही गावांनी माघार घेतली. परंतु अनेक गावांनी ४५ दिवस श्रमदान करून आपले गाव पाणीदार बनविण्याचा वसा उचलला. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून आर्वी तालुक्यातील पिंपळधरीबाई या गावाला तालुका स्तरावरचा पहिला पुरस्कार जाहीर झाला आहे. द्वितीय पुरस्कार बोदड तर तृतीय पुरस्कार हिवरा गावाला देण्यात येणार आहे. कारंजा (घाडगे) तालुक्यातील लिंगा मंडवी ला प्रथम, किन्हाळ्याला द्वितीय तर नांदोरा या गावाला तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे. सेलू तालुक्यात खडका गावाला प्रथम, गायमुखला द्वितीय तर पिंपळगावला तृतीय पुरस्कार मिळाला आहे. देवळी तालुक्यात तळणी (भागवत) ला प्रथम, फत्तेपुरला द्वितीय तर कविटगावला तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यस्तरीय वॉटर कप स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभही पुणे येथे रविवारी पार पडला. या जिल्ह्यातील एकाही गावाला पुरस्कार मिळाला नाही.अनेकांचे हात लागले श्रमदानातगावकºयांच्या मदतीला वैद्यकीय जनजागृती मंच यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी श्रमदानासाठी सहकार्य केले. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी अनेक गावात जाऊन श्रमदान करून नागरिकांचा उत्साह वाढविला.