शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

केंद्र सरकारच्या योजना अंमलबजावणीत जिल्हा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:56 IST

केंद्र सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात वर्धा जिल्हा आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनातून जिल्ह्याच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ पोहचविण्याच्या कामात....

ठळक मुद्देलोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचा पुढाकार : पहिल्यांदाच ३ हजार ५०० वर उपकरणांचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्र सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात वर्धा जिल्हा आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनातून जिल्ह्याच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ पोहचविण्याच्या कामात लोकप्रनिधिनीसह जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचाही मोठा पुढाकार आहे. केंद्र सरकारच्या सामाजिक व न्याय अधिकार मंत्रालयाच्या एडीफ योजनेअंतर्गत दिव्यागांना वर्धा जिल्ह्यात पहिल्यांदाच ३ हजार ५४२ विविध उपकरणे २ हजार १२१ दिव्यागांना वितरीत करण्यात आले आहेत.जिल्हा प्रशासनाने १ ते ९ जुलै व ३ ते ५ आॅगस्ट या कालावधीत तालुका स्तरावर दिव्यांगांचे शिबिर आयोजित करून त्यातून त्यांना कोणत्या वस्तूंची गरज आहे, याची माहिती जाणली व त्यानंतर दिव्यागांसाठी ते उपकरण उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे केंद्र सरकारच्या या योजनेतून दिव्यांगांना चांगला दिलासा मिळाला आहे. अशीच परिस्थिती उज्ज्वला योजनेचीही आहे. जिल्ह्यात २८ हजार ९६० कुटूंबाला या योजनेचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यात ३६ हजार ६९१ कुटूंबांनी या योजनेच्या लाभासाठी अर्ज केले होते. त्यापैकी २८ हजार ९६० कुटूंबांना लाभ देण्यात आला. १६०० रूपयात गॅस शेगडी उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे तेवढे कुटूंब आता चुलमूक्त झाले आहे. वर्धा जिल्ह्यात या योजनेच्या अंमलबजावणीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देवळी तालुक्यातील पिंपळगाव (लुटे) च्या लाभार्थ्याला पत्र पाठवून त्याचे कौतुक केले. एकूणच केंद्र सरकारच्या योजनेच्या अंमलबजावणीत वर्धा जिल्ह्याची आघाडी सरस ठरली आहे.जिल्हाधिकारी व यंत्रणांचा पुढाकार महत्त्वाचावर्धेचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेला सोबत घेवून विविध योजनांच्या अंमलबजावणीत पुढाकार घेतला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनीही आरोग्य शिबिराच्या आयोजनात मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे दिव्यांगांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाभ मिळवून देण्यात यश आले असल्याचे सांगण्यात येते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या योजना राबविल्या जात आहे. त्यातील बºयाच योजनांच्या अंमलबजावणीवर थेट पंतप्रधान कार्यालय लक्ष ठेवून आहे. वेळोवेळी केंद्र सरकारचे विविध मंत्रालय व थेट जिल्हा प्रशासन यांच्यात चांगला समन्वय आहे. लोकप्रतिनिधी म्हणूनही आम्ही या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करीत आहो. त्यामुळे अंमलबजावणी प्रभावीपणे होत असल्याचे दिसून येत आहे.- रामदास तडस, खासदार, वर्धा लोकसभा क्षेत्र.