शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
5
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
6
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
7
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
8
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
9
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
10
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
11
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
12
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
13
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
14
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
15
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
16
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
17
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
18
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
19
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
20
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो

केंद्र सरकारच्या योजना अंमलबजावणीत जिल्हा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:56 IST

केंद्र सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात वर्धा जिल्हा आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनातून जिल्ह्याच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ पोहचविण्याच्या कामात....

ठळक मुद्देलोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचा पुढाकार : पहिल्यांदाच ३ हजार ५०० वर उपकरणांचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्र सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात वर्धा जिल्हा आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनातून जिल्ह्याच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ पोहचविण्याच्या कामात लोकप्रनिधिनीसह जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचाही मोठा पुढाकार आहे. केंद्र सरकारच्या सामाजिक व न्याय अधिकार मंत्रालयाच्या एडीफ योजनेअंतर्गत दिव्यागांना वर्धा जिल्ह्यात पहिल्यांदाच ३ हजार ५४२ विविध उपकरणे २ हजार १२१ दिव्यागांना वितरीत करण्यात आले आहेत.जिल्हा प्रशासनाने १ ते ९ जुलै व ३ ते ५ आॅगस्ट या कालावधीत तालुका स्तरावर दिव्यांगांचे शिबिर आयोजित करून त्यातून त्यांना कोणत्या वस्तूंची गरज आहे, याची माहिती जाणली व त्यानंतर दिव्यागांसाठी ते उपकरण उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे केंद्र सरकारच्या या योजनेतून दिव्यांगांना चांगला दिलासा मिळाला आहे. अशीच परिस्थिती उज्ज्वला योजनेचीही आहे. जिल्ह्यात २८ हजार ९६० कुटूंबाला या योजनेचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यात ३६ हजार ६९१ कुटूंबांनी या योजनेच्या लाभासाठी अर्ज केले होते. त्यापैकी २८ हजार ९६० कुटूंबांना लाभ देण्यात आला. १६०० रूपयात गॅस शेगडी उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे तेवढे कुटूंब आता चुलमूक्त झाले आहे. वर्धा जिल्ह्यात या योजनेच्या अंमलबजावणीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देवळी तालुक्यातील पिंपळगाव (लुटे) च्या लाभार्थ्याला पत्र पाठवून त्याचे कौतुक केले. एकूणच केंद्र सरकारच्या योजनेच्या अंमलबजावणीत वर्धा जिल्ह्याची आघाडी सरस ठरली आहे.जिल्हाधिकारी व यंत्रणांचा पुढाकार महत्त्वाचावर्धेचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेला सोबत घेवून विविध योजनांच्या अंमलबजावणीत पुढाकार घेतला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनीही आरोग्य शिबिराच्या आयोजनात मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे दिव्यांगांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाभ मिळवून देण्यात यश आले असल्याचे सांगण्यात येते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या योजना राबविल्या जात आहे. त्यातील बºयाच योजनांच्या अंमलबजावणीवर थेट पंतप्रधान कार्यालय लक्ष ठेवून आहे. वेळोवेळी केंद्र सरकारचे विविध मंत्रालय व थेट जिल्हा प्रशासन यांच्यात चांगला समन्वय आहे. लोकप्रतिनिधी म्हणूनही आम्ही या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करीत आहो. त्यामुळे अंमलबजावणी प्रभावीपणे होत असल्याचे दिसून येत आहे.- रामदास तडस, खासदार, वर्धा लोकसभा क्षेत्र.