शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

जिल्ह्याचा कोविड दुपटीचा दर 89.5

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 05:00 IST

१८ ते २२ फेब्रुवारी या पाच दिवसांच्या काळात जिल्ह्यात तब्बल ४५१ नवीन कोविड बाधित सापडले. त्यापैकी तब्बल २७५ नवीन रुग्ण हे वर्धा तालुक्यातील रहिवासी असून वर्धा तालुक्यात कोरोनाचा प्रसार झपाट्यानेच वाढत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात १९ फेब्रुवारीला १०८ तर २१ फेब्रुवारीला तब्बल १५३ नवीन कोविड बाधित सापडल्याने येत्या पंधरा दिवसांत पुन्हा लॉकडाऊन तर जाहीर होणार नाही ना याबाबतची भीती जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणाऱ्यांकडून व्यक्त केली जात होती.

ठळक मुद्देमृत्यूदर २.५३ च्या घरात : ९० दिवसांनी रुग्ण संख्या होते दुप्पट, दररोज पडतेय रुग्णांची भर

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आवठड्यात जिल्ह्यात कोरोनाने उच्चांकी गाठण्याचा प्रयत्न केला. याच काळात भविष्यातील धोका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात ३६ तासांसाठी सक्तीची संचारबंदी लागू केली होती. याच संचारबंदीच्या काळात जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या ग्रामपंचायत, नगरपंचायत तसेच नगरपालिकांनी सार्वजनिक स्थळ निर्जंतुक केली. असे असले तरी सध्या जिल्ह्याचा कोविड दुपटीचा दर ८९.५ च्या घरात असून ९० दिवसानंतर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होत असल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे.प्राप्त माहितीनुसार, १८ ते २२ फेब्रुवारी या पाच दिवसांच्या काळात जिल्ह्यात तब्बल ४५१ नवीन कोविड बाधित सापडले. त्यापैकी तब्बल २७५ नवीन रुग्ण हे वर्धा तालुक्यातील रहिवासी असून वर्धा तालुक्यात कोरोनाचा प्रसार झपाट्यानेच वाढत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात १९ फेब्रुवारीला १०८ तर २१ फेब्रुवारीला तब्बल १५३ नवीन कोविड बाधित सापडल्याने येत्या पंधरा दिवसांत पुन्हा लॉकडाऊन तर जाहीर होणार नाही ना याबाबतची भीती जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणाऱ्यांकडून व्यक्त केली जात होती. पुन्हा लॉकडाऊन काय ही भीती कायम असतानाच २२ फेब्रुवारीला जिल्ह्यात तब्बल ४५ नवीन कोविड बाधित सापडल्याने लस आली; पण कोरोनाचा धोका अजूनही कायम असल्याची जाण अनेकांना झाली आहे. त्यामुळे सध्याच्या कोरोनायनात प्रत्येक नागरिकाने जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे कटाक्षाने पालन करणे गरजेचे आहे. 

रिकव्हरी दर पोहोचला ९२.५७ टक्क्यांवरवर्धा जिल्ह्यात सध्या ९० दिवसानंतर कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट होत आहे. असे असले तरी जिल्ह्याचा रिकव्हरी दर हा ९२.५७ इतका असल्याचे सांगण्यात आले.

सध्या जिल्ह्यात कोविड बाधितांची संख्या ९० दिवसांनी दुप्पट होत आहे. शिवाय जिल्ह्यातील १३ केंद्रांवरून पहिल्या फळीतील कोविड योद्धांना कोरोनाची प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. असे असले तरी अजूनही वर्धा जिल्ह्यावरील कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक वर्धेकराने जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावेच.- डॉ. प्रभाकर नाईक,                                              

 अति. जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या