शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

जिल्ह्याचा कोविड दुपटीचा दर 89.5

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 05:00 IST

१८ ते २२ फेब्रुवारी या पाच दिवसांच्या काळात जिल्ह्यात तब्बल ४५१ नवीन कोविड बाधित सापडले. त्यापैकी तब्बल २७५ नवीन रुग्ण हे वर्धा तालुक्यातील रहिवासी असून वर्धा तालुक्यात कोरोनाचा प्रसार झपाट्यानेच वाढत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात १९ फेब्रुवारीला १०८ तर २१ फेब्रुवारीला तब्बल १५३ नवीन कोविड बाधित सापडल्याने येत्या पंधरा दिवसांत पुन्हा लॉकडाऊन तर जाहीर होणार नाही ना याबाबतची भीती जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणाऱ्यांकडून व्यक्त केली जात होती.

ठळक मुद्देमृत्यूदर २.५३ च्या घरात : ९० दिवसांनी रुग्ण संख्या होते दुप्पट, दररोज पडतेय रुग्णांची भर

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आवठड्यात जिल्ह्यात कोरोनाने उच्चांकी गाठण्याचा प्रयत्न केला. याच काळात भविष्यातील धोका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात ३६ तासांसाठी सक्तीची संचारबंदी लागू केली होती. याच संचारबंदीच्या काळात जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या ग्रामपंचायत, नगरपंचायत तसेच नगरपालिकांनी सार्वजनिक स्थळ निर्जंतुक केली. असे असले तरी सध्या जिल्ह्याचा कोविड दुपटीचा दर ८९.५ च्या घरात असून ९० दिवसानंतर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होत असल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे.प्राप्त माहितीनुसार, १८ ते २२ फेब्रुवारी या पाच दिवसांच्या काळात जिल्ह्यात तब्बल ४५१ नवीन कोविड बाधित सापडले. त्यापैकी तब्बल २७५ नवीन रुग्ण हे वर्धा तालुक्यातील रहिवासी असून वर्धा तालुक्यात कोरोनाचा प्रसार झपाट्यानेच वाढत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात १९ फेब्रुवारीला १०८ तर २१ फेब्रुवारीला तब्बल १५३ नवीन कोविड बाधित सापडल्याने येत्या पंधरा दिवसांत पुन्हा लॉकडाऊन तर जाहीर होणार नाही ना याबाबतची भीती जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणाऱ्यांकडून व्यक्त केली जात होती. पुन्हा लॉकडाऊन काय ही भीती कायम असतानाच २२ फेब्रुवारीला जिल्ह्यात तब्बल ४५ नवीन कोविड बाधित सापडल्याने लस आली; पण कोरोनाचा धोका अजूनही कायम असल्याची जाण अनेकांना झाली आहे. त्यामुळे सध्याच्या कोरोनायनात प्रत्येक नागरिकाने जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे कटाक्षाने पालन करणे गरजेचे आहे. 

रिकव्हरी दर पोहोचला ९२.५७ टक्क्यांवरवर्धा जिल्ह्यात सध्या ९० दिवसानंतर कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट होत आहे. असे असले तरी जिल्ह्याचा रिकव्हरी दर हा ९२.५७ इतका असल्याचे सांगण्यात आले.

सध्या जिल्ह्यात कोविड बाधितांची संख्या ९० दिवसांनी दुप्पट होत आहे. शिवाय जिल्ह्यातील १३ केंद्रांवरून पहिल्या फळीतील कोविड योद्धांना कोरोनाची प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. असे असले तरी अजूनही वर्धा जिल्ह्यावरील कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक वर्धेकराने जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावेच.- डॉ. प्रभाकर नाईक,                                              

 अति. जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या