शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

जिल्ह्याचा कोरोना दुपटीचा दर १०.१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 05:00 IST

कोरोनाचा मोठा उद्रेक झाल्यास जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडणार असली तरी सध्या आरोग्य विभागाने एकूण २ हजार ९७ खाटांची व्यवस्था केली आहे. त्यापैकी कोविड संशयितांसाठी १ हजार २०० खाटा, कोविड अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांसाठी ८९७ खाटा, गंभीर रुग्णांसाठी १७९ खाटा तर ऑक्सिजनची गरज असलेल्या कोविड बाधितांसाठी १ हजार २९ खाटांची व्यवस्था केली आहे.

ठळक मुद्देमृत्यूदर १.८ : कोविडमुक्तीचा दर ६० टक्के, प्रत्येक नागरिकाने दक्ष राहण्याची गरज

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविड विषाणू सध्या जिल्ह्यात थैमानच घालून पाहत आहे. इतकेच नव्हे तर जिल्ह्याचा कोरोना दुपटीचा दर १०.१, मृत्यू दर १.८ आणि कोविडमुक्तीचा दर ६० टक्केवर असल्याचे आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात पुढे आले आहे. परिणामी, वर्धेकरांनी आता आणखी दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १,००३ कोविड बाधितांनी कोरोनावर विजय मिळविला असला तरी कोरोना दुपटीचा दर १०.१ आहे. इतकेच नव्हे तर मृत्यू दरही १.८ झाला आहे. राज्याच्या मृत्यू दराच्या तुलनेत हा कमी असला तरी वर्धा जिल्ह्यातील नागरिकांचे हृदयाचे ठोके वाढविणाराच आहे. तर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण ७.५५ टक्के असल्याचे आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात पुढे आले आहे.मंगळवारी आढळले नवे १५१ कोविड बाधितमंगळवारी ७४९ व्यक्तींचे कोविड चाचणी अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले. त्यापैकी १५१ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे.एकूण २०९७ खाटांची व्यवस्थाकोरोनाचा मोठा उद्रेक झाल्यास जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडणार असली तरी सध्या आरोग्य विभागाने एकूण २ हजार ९७ खाटांची व्यवस्था केली आहे. त्यापैकी कोविड संशयितांसाठी १ हजार २०० खाटा, कोविड अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांसाठी ८९७ खाटा, गंभीर रुग्णांसाठी १७९ खाटा तर ऑक्सिजनची गरज असलेल्या कोविड बाधितांसाठी १ हजार २९ खाटांची व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी सेवाग्राम येथील कस्तुरबा कोविड रुग्णालयाला आणखी १०० खाटा वाढविण्याच्या सूचना केल्या आहेत. लवकरच येथे रुग्ण खाटा वाढेल.सारीचे २२५ रुग्ण आढळलेजिल्ह्यात कोरोना पाय पसरवित असतानाच आरोग्य विभागाकडून गृहभेटी देऊन विशेष सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणादरम्यान जिल्ह्यात सारीचे एकूण २२५ रुग्ण आढळून आले. त्यांच्यावर सध्या उपचार केले जात आहेत.१३ हजार ४२८ व्यक्तींना सर्दी, ताप, खोकलाआरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील १३ हजार ४२८ व्यक्तींना सर्दी, ताप, खोकल्याची लागण झाल्याचे पुढे आले आहे. या व्यक्तींना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापैकी बहूतांश व्यक्ती रोगमुक्तही झाले आहेत.आरोग्य यंत्रणा हायअर्लटवर असली तरी कोरोना मला होणारच नाही असा गैरसमज कुठल्याही नागरिकाने मनात बाळगू नये. सध्याची परिस्थिती बघता प्रत्येक व्यक्तीने स्वत:सह स्वत:च्या कुटुंबीयांची दक्ष राहून काळजी घ्यावी. मी सुरक्षित तर माझे कुटुंबीय सुरक्षित हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. शिवाय जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे.- विवेक भीमनवार, जिल्हाधिकारी, वर्धा.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या