शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

जिल्ह्याचा कोरोना दुपटीचा दर १०.१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 05:00 IST

कोरोनाचा मोठा उद्रेक झाल्यास जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडणार असली तरी सध्या आरोग्य विभागाने एकूण २ हजार ९७ खाटांची व्यवस्था केली आहे. त्यापैकी कोविड संशयितांसाठी १ हजार २०० खाटा, कोविड अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांसाठी ८९७ खाटा, गंभीर रुग्णांसाठी १७९ खाटा तर ऑक्सिजनची गरज असलेल्या कोविड बाधितांसाठी १ हजार २९ खाटांची व्यवस्था केली आहे.

ठळक मुद्देमृत्यूदर १.८ : कोविडमुक्तीचा दर ६० टक्के, प्रत्येक नागरिकाने दक्ष राहण्याची गरज

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविड विषाणू सध्या जिल्ह्यात थैमानच घालून पाहत आहे. इतकेच नव्हे तर जिल्ह्याचा कोरोना दुपटीचा दर १०.१, मृत्यू दर १.८ आणि कोविडमुक्तीचा दर ६० टक्केवर असल्याचे आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात पुढे आले आहे. परिणामी, वर्धेकरांनी आता आणखी दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १,००३ कोविड बाधितांनी कोरोनावर विजय मिळविला असला तरी कोरोना दुपटीचा दर १०.१ आहे. इतकेच नव्हे तर मृत्यू दरही १.८ झाला आहे. राज्याच्या मृत्यू दराच्या तुलनेत हा कमी असला तरी वर्धा जिल्ह्यातील नागरिकांचे हृदयाचे ठोके वाढविणाराच आहे. तर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण ७.५५ टक्के असल्याचे आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात पुढे आले आहे.मंगळवारी आढळले नवे १५१ कोविड बाधितमंगळवारी ७४९ व्यक्तींचे कोविड चाचणी अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले. त्यापैकी १५१ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे.एकूण २०९७ खाटांची व्यवस्थाकोरोनाचा मोठा उद्रेक झाल्यास जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडणार असली तरी सध्या आरोग्य विभागाने एकूण २ हजार ९७ खाटांची व्यवस्था केली आहे. त्यापैकी कोविड संशयितांसाठी १ हजार २०० खाटा, कोविड अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांसाठी ८९७ खाटा, गंभीर रुग्णांसाठी १७९ खाटा तर ऑक्सिजनची गरज असलेल्या कोविड बाधितांसाठी १ हजार २९ खाटांची व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी सेवाग्राम येथील कस्तुरबा कोविड रुग्णालयाला आणखी १०० खाटा वाढविण्याच्या सूचना केल्या आहेत. लवकरच येथे रुग्ण खाटा वाढेल.सारीचे २२५ रुग्ण आढळलेजिल्ह्यात कोरोना पाय पसरवित असतानाच आरोग्य विभागाकडून गृहभेटी देऊन विशेष सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणादरम्यान जिल्ह्यात सारीचे एकूण २२५ रुग्ण आढळून आले. त्यांच्यावर सध्या उपचार केले जात आहेत.१३ हजार ४२८ व्यक्तींना सर्दी, ताप, खोकलाआरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील १३ हजार ४२८ व्यक्तींना सर्दी, ताप, खोकल्याची लागण झाल्याचे पुढे आले आहे. या व्यक्तींना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापैकी बहूतांश व्यक्ती रोगमुक्तही झाले आहेत.आरोग्य यंत्रणा हायअर्लटवर असली तरी कोरोना मला होणारच नाही असा गैरसमज कुठल्याही नागरिकाने मनात बाळगू नये. सध्याची परिस्थिती बघता प्रत्येक व्यक्तीने स्वत:सह स्वत:च्या कुटुंबीयांची दक्ष राहून काळजी घ्यावी. मी सुरक्षित तर माझे कुटुंबीय सुरक्षित हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. शिवाय जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे.- विवेक भीमनवार, जिल्हाधिकारी, वर्धा.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या