शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

आयुक्तांकडे जि.प. सीईओंची तक्रार

By admin | Updated: November 25, 2014 22:59 IST

जि.प.चे नवनिर्वाचित अध्यक्ष चित्रा रणनवरे आणि उपाध्यक्ष विलास कांबळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांची नागपूर विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्याकडे तक्रार केल्यामुळे

वर्धा : जि.प.चे नवनिर्वाचित अध्यक्ष चित्रा रणनवरे आणि उपाध्यक्ष विलास कांबळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांची नागपूर विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्याकडे तक्रार केल्यामुळे जि.प.तील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या तक्रारींच्या माध्यमातून सीईओ मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप केला आहे. महामहीम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या वर्धा दौऱ्यानिमित्त विभागीय आयुक्त बुधवारी वर्धेत दाखल झाले. दरम्यान त्यांनी जि.प.चा आढावा घेतला. यावेळी सदर तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीवर पुढे काय होते, याकडे आता जि.प. वर्तुळाचे लक्ष लागले आहे.अध्यक्ष रणनवरे यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये अध्यक्षाची निवड झाल्यापासून शिष्टाचार म्हणून सीईओ यांनी अद्यापही अध्यक्षाला कक्षात भेट दिली नाही, तर अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या तक्रारींमध्ये इतर सात बाबी समान असल्याचे दिसून येते. यामध्ये जि.प. मध्ये घेतलेल्या ठरावाची वेळीच अंमलबजावणी न केल्यामुळे विकास कामांना खीळ बसली आहे. निधी खर्च न झाल्यामुळे परत गेला. विकास कामांबाबत सीईओ अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती यांच्याशी समन्यवय ठेवत नाही. विश्वासात घेत नाही. परिषदेतील पदे भरतीत गोंधळ झाल्याच्या तक्रारी प्राप्त असल्याचेही नमूद केले आहे. पदाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देणे, हेकेखोर प्रवृत्ती व विकास कामांबाबतची माहिती न पुरविणे, कोणत्याही प्रकरणाची गांभिर्याने दखल न घेणे, चर्चा टाळणे, वारंवार अवमान करणे, भ्रमणध्वनीवर संपर्क साधला तर प्रतिसाद न देणे, अशा गंभीर तक्रारी केलेल्या आहेत. याप्रकरणी आपल्या स्तरावरुन चौकशी करुन तात्काळ बदली करण्याची शिफारस करण्याची मागणीही सदर तक्रारीच्या माध्यमातून विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे.(जिल्हा प्रतिनिधी)