शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळझरीच्या नुकसानग्रस्तांची जिल्हाधिकाऱ्यांनी जाणली व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 22:31 IST

अवकाळी पाऊस व गारपिटीने बेघर झालेल्या पिंपळझरी येथे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी भेट देऊन समस्या जाणुन घेतल्या. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यासह १४ फेब्रुवारीला दिलेल्या भेटीत येथील पीडितांसोबत संवाद साधुन त्यांनी अडचणी जाणून घेतल्या.

ठळक मुद्देबेघरांना मिळणार घरकूल योजनेतून घर : शेतशिवाराची केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : अवकाळी पाऊस व गारपिटीने बेघर झालेल्या पिंपळझरी येथे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी भेट देऊन समस्या जाणुन घेतल्या. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यासह १४ फेब्रुवारीला दिलेल्या भेटीत येथील पीडितांसोबत संवाद साधुन त्यांनी अडचणी जाणून घेतल्या. तसेच पिंपळझरीतील बेघर झालेल्या सर्व कुटुंबांना ‘खास शबरी घरकूल’ योजनेतून घरे बांधून देण्याचा प्रस्ताव पाठविण्याचे सांगितले.मार्च अखेरपर्यंत सर्व पीडित कुटुंबियांना पक्की घरे बांधून देण्याचे आदेश तहसीलदार, नायब तहसीलदार, आर्वी उपविभागीय अधिकारी यांना ग्रामस्थांसमोर दिले. तसेच शेतीच्या नुकसानीचे देखील त्वरित सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. याच दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी रोहणा येथील अविनाश कहाते यांच्या नुकसानग्रस्त शेताला भेट दिली. कहाते यांना प्रगत व तांत्रिक शेतीसाठी स्व. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार शासनाने प्रदान केला आहे. त्यांची पिंपळझरी नजीक २२ एकर शेती असून त्या शेतीत शेडनेट व ठिबक सिंचनाची सोय केली आहे. तिखट मिरची, सिमला मिरची, कोबी, हरभरा, कापूस व हळदीचे पीक होते. हळद जमिनीत असल्याने ते पीक सोडून इतर सर्व पिके जमीनदोस्त झालीआहे. शिवाय शेडनेट देखील नेस्तनाबुत झाले. नैसर्गिक आपत्तीत कहाते यांचे २० ते २५ लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या भेटीत वाईचे माजी सरपंच गणेश गजकेश्वर, सरपंच चंदा दौलत कुंडी, संजय बोंदरे, मयूर बुरघाटे, शेतकरी अविनाश कहाते यांच्यासह गावकऱ्यांनी समस्या मांडल्या.संकटाचा सामना करण्यासाठी दिले भावनिक बळपिंपळझरी गावाला गारपिटीचा आणि वादळाचा चांगलाच तडाखा बसला. येथील बहुतांश नागरिक बेघर झाले. लोकप्रतिनिधी तसेच शासकीय स्तरावर अधिकारी वर्गाने गावाला भेट देऊन ग्रामस्थांचे सांत्वन केले. तसेच त्यांना लागणारी मदत तात्काळ पुरविली.पिंपळझरीतील बेघर झालेल्या सर्व कुटुंबांना ‘खास शबरी घरकुल’ योजनेतून घरे बांधून देण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. पीडितांना मदतीचे आश्वासन देवून भावनिक बळ दिले.