शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळझरीच्या नुकसानग्रस्तांची जिल्हाधिकाऱ्यांनी जाणली व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 22:31 IST

अवकाळी पाऊस व गारपिटीने बेघर झालेल्या पिंपळझरी येथे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी भेट देऊन समस्या जाणुन घेतल्या. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यासह १४ फेब्रुवारीला दिलेल्या भेटीत येथील पीडितांसोबत संवाद साधुन त्यांनी अडचणी जाणून घेतल्या.

ठळक मुद्देबेघरांना मिळणार घरकूल योजनेतून घर : शेतशिवाराची केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : अवकाळी पाऊस व गारपिटीने बेघर झालेल्या पिंपळझरी येथे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी भेट देऊन समस्या जाणुन घेतल्या. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यासह १४ फेब्रुवारीला दिलेल्या भेटीत येथील पीडितांसोबत संवाद साधुन त्यांनी अडचणी जाणून घेतल्या. तसेच पिंपळझरीतील बेघर झालेल्या सर्व कुटुंबांना ‘खास शबरी घरकूल’ योजनेतून घरे बांधून देण्याचा प्रस्ताव पाठविण्याचे सांगितले.मार्च अखेरपर्यंत सर्व पीडित कुटुंबियांना पक्की घरे बांधून देण्याचे आदेश तहसीलदार, नायब तहसीलदार, आर्वी उपविभागीय अधिकारी यांना ग्रामस्थांसमोर दिले. तसेच शेतीच्या नुकसानीचे देखील त्वरित सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. याच दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी रोहणा येथील अविनाश कहाते यांच्या नुकसानग्रस्त शेताला भेट दिली. कहाते यांना प्रगत व तांत्रिक शेतीसाठी स्व. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार शासनाने प्रदान केला आहे. त्यांची पिंपळझरी नजीक २२ एकर शेती असून त्या शेतीत शेडनेट व ठिबक सिंचनाची सोय केली आहे. तिखट मिरची, सिमला मिरची, कोबी, हरभरा, कापूस व हळदीचे पीक होते. हळद जमिनीत असल्याने ते पीक सोडून इतर सर्व पिके जमीनदोस्त झालीआहे. शिवाय शेडनेट देखील नेस्तनाबुत झाले. नैसर्गिक आपत्तीत कहाते यांचे २० ते २५ लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या भेटीत वाईचे माजी सरपंच गणेश गजकेश्वर, सरपंच चंदा दौलत कुंडी, संजय बोंदरे, मयूर बुरघाटे, शेतकरी अविनाश कहाते यांच्यासह गावकऱ्यांनी समस्या मांडल्या.संकटाचा सामना करण्यासाठी दिले भावनिक बळपिंपळझरी गावाला गारपिटीचा आणि वादळाचा चांगलाच तडाखा बसला. येथील बहुतांश नागरिक बेघर झाले. लोकप्रतिनिधी तसेच शासकीय स्तरावर अधिकारी वर्गाने गावाला भेट देऊन ग्रामस्थांचे सांत्वन केले. तसेच त्यांना लागणारी मदत तात्काळ पुरविली.पिंपळझरीतील बेघर झालेल्या सर्व कुटुंबांना ‘खास शबरी घरकुल’ योजनेतून घरे बांधून देण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. पीडितांना मदतीचे आश्वासन देवून भावनिक बळ दिले.