शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कामचुकार कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांचा बडगा

By admin | Updated: June 7, 2015 02:18 IST

कामात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही, हे नव्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रारंभीच दाखवून दिले आहे.

एक बडतर्फ तर दुसऱ्यावर निलंबनाची कारवाईवर्धा : कामात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही, हे नव्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रारंभीच दाखवून दिले आहे. कामचुकारपणाकरित शिस्तभंग करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांवर शनिवारी कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारताच केलेल्या या कारवाईमुळे शासकीय कर्मचाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. यात हिंगणघाट तहसील कार्यालयाचा लिपिक आर.बी. काशीनिवास याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले, तर सेलू तहसील कार्यालयाचा वाहन चालक आर. व्ही. पानपाटील याच्यावर निलंंबनाची कारवाई करण्यात आली. हिंगणघाट तहसील कार्यालयातील लिपिक आर.बी. काशीनिवास याला महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपिल नियमाच्या तरतुदीनुसार सेवेतून काढून टाकण्याची शिक्षा बजावण्यात आली आहे. यासंबंधीचे आदेश जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी शनिवारी निर्गमित केले आहेत. आर.बी. काशीनिवास हिंगणघाट तहसील कार्यालयात कार्यरत असून त्याच्याविरूद्धचे दोषारोप पूर्णत: सिद्ध झाले आहेत. हे आरोप गैरवर्तन या स्वरूपाचे असल्यामुळे त्यांनी शासकीय कामात कर्तव्यपरायणता न ठेवल्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ चे नियम ५ मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र ठरत असल्यामुळे त्याला सेवेतून काढून टाकण्याची शिक्षा बजावण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या कारवाईने कामचुकार कर्मचाऱ्यांवर जरब बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.(प्रतिनिधी)सेलू तहसीलचा वाहनचालक निलंबितरजेचा अर्ज सादर न करता वा कुणालाही सूचना न करता गैरहजर राहून शासकीय कामात व्यत्यय आणणाऱ्या सेलू तहसील कार्यालयातील वाहनचालक आर.व्ही. पानपाटील याला निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियमाच्या अंतर्गत करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी यासंबंधीचे आदेश शनिवारी पारीत केले आहेत.वाहनचालक आर.व्ही. पानपाटील याच्या वारंवार गैरहजेरीमुळे शासकीय कामात अडथळा निर्माण होत असल्याचे सिद्ध होत आहे. शासकीय कर्तव्य बजावताना त्याने गैरवर्तन केले असून कर्तव्य परायनता दाखविली नाही. त्यामुळे त्याच्याकडून महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) १९७९ चे नियम ३ चा भंग झाला आहे. शासकीय महत्त्वाचे काम करीत असताना वारंवार पूर्वपरवानगी न घेता रजेचा अर्ज सादर न करता कार्यालयात गैरहजर राहत असल्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील अन्वये शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्यास पात्र ठरत आहे. यामुळे जिल्हाधिकारी यांनी विभागीय चौकशीच्या अधीन राहून पानपाटील याच्यावर निलंबिनाची कारवाई केली आहे.