शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

कामचुकार कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांचा बडगा

By admin | Updated: June 7, 2015 02:18 IST

कामात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही, हे नव्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रारंभीच दाखवून दिले आहे.

एक बडतर्फ तर दुसऱ्यावर निलंबनाची कारवाईवर्धा : कामात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही, हे नव्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रारंभीच दाखवून दिले आहे. कामचुकारपणाकरित शिस्तभंग करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांवर शनिवारी कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारताच केलेल्या या कारवाईमुळे शासकीय कर्मचाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. यात हिंगणघाट तहसील कार्यालयाचा लिपिक आर.बी. काशीनिवास याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले, तर सेलू तहसील कार्यालयाचा वाहन चालक आर. व्ही. पानपाटील याच्यावर निलंंबनाची कारवाई करण्यात आली. हिंगणघाट तहसील कार्यालयातील लिपिक आर.बी. काशीनिवास याला महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपिल नियमाच्या तरतुदीनुसार सेवेतून काढून टाकण्याची शिक्षा बजावण्यात आली आहे. यासंबंधीचे आदेश जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी शनिवारी निर्गमित केले आहेत. आर.बी. काशीनिवास हिंगणघाट तहसील कार्यालयात कार्यरत असून त्याच्याविरूद्धचे दोषारोप पूर्णत: सिद्ध झाले आहेत. हे आरोप गैरवर्तन या स्वरूपाचे असल्यामुळे त्यांनी शासकीय कामात कर्तव्यपरायणता न ठेवल्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ चे नियम ५ मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र ठरत असल्यामुळे त्याला सेवेतून काढून टाकण्याची शिक्षा बजावण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या कारवाईने कामचुकार कर्मचाऱ्यांवर जरब बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.(प्रतिनिधी)सेलू तहसीलचा वाहनचालक निलंबितरजेचा अर्ज सादर न करता वा कुणालाही सूचना न करता गैरहजर राहून शासकीय कामात व्यत्यय आणणाऱ्या सेलू तहसील कार्यालयातील वाहनचालक आर.व्ही. पानपाटील याला निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियमाच्या अंतर्गत करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी यासंबंधीचे आदेश शनिवारी पारीत केले आहेत.वाहनचालक आर.व्ही. पानपाटील याच्या वारंवार गैरहजेरीमुळे शासकीय कामात अडथळा निर्माण होत असल्याचे सिद्ध होत आहे. शासकीय कर्तव्य बजावताना त्याने गैरवर्तन केले असून कर्तव्य परायनता दाखविली नाही. त्यामुळे त्याच्याकडून महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) १९७९ चे नियम ३ चा भंग झाला आहे. शासकीय महत्त्वाचे काम करीत असताना वारंवार पूर्वपरवानगी न घेता रजेचा अर्ज सादर न करता कार्यालयात गैरहजर राहत असल्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील अन्वये शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्यास पात्र ठरत आहे. यामुळे जिल्हाधिकारी यांनी विभागीय चौकशीच्या अधीन राहून पानपाटील याच्यावर निलंबिनाची कारवाई केली आहे.